शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

व्यापार, उद्योग ठप्प झालेत; नऊ दिवसांची संचारबंदी तीन दिवसांवर आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आषाढी यात्रा भरवण्याबाबत निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै अशी ...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आषाढी यात्रा भरवण्याबाबत निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै अशी नऊ दिवस पंढरपूर शहर व आजूबाजूच्या दहा गांवात संचारबंदी जाहीर केली आहे. ही संचारबंदी अन्यायकारक आहे.

आषाढी यात्रा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवणार आहे. त्यामुळे बाहेर गावचे लोक पंढरपूर शहरात येऊ शकणार नाहीत, त्यामुळे पंढरपूर शहर व बाजूच्या दहा गावांत जाहीर केलेली संचारबंदीमुळे सर्वच व्यापार ठप्प होऊन व्यापारी वर्गाच नुकसान होणार असून, हे अन्यायकारक आहे. तरी केवळ १९, २० व २१ जुलै असे तीनच दिवस संचारबंदी जाहीर करावी. नऊ दिवसांच्या संचारबंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले आले. यावेळी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, वैभव येवनकर, भूषण मोहोळकर, हेमंत विभुते, घोडके, मोरे इत्यादी व्यापारी उपस्थित होते.

कोट ::::::::::::::::::::

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संचारबंदी केली आहे. व्यापाऱ्यांकडून संचारबंदीचा कालावधी कमी करण्याबाबत मागणी होत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा झाली आहे. परंतु १७ जुलैपासूनच संचारबंदी करणे आवश्यक आहे. १७ जुलैच्या सायंकाळी ४ वाजल्यापासून ही संचारबंदी सुरु होणार आहे. २५ जुलैपर्यंत मानाच्या पालाख्या पंढरपुरात राहणार आहेत. यामुळे संचारबंदीचा कालावधी कमी करता येणार नाही.

- तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक

फोटो : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याबरोबर चर्चा करताना महासंघाचे उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, वैभव येवनकर, भूषण मोहोळकर, हेमंत विभुते.