शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार, उद्योग ठप्प झालेत; नऊ दिवसांची संचारबंदी तीन दिवसांवर आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आषाढी यात्रा भरवण्याबाबत निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै अशी ...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आषाढी यात्रा भरवण्याबाबत निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै अशी नऊ दिवस पंढरपूर शहर व आजूबाजूच्या दहा गांवात संचारबंदी जाहीर केली आहे. ही संचारबंदी अन्यायकारक आहे.

आषाढी यात्रा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवणार आहे. त्यामुळे बाहेर गावचे लोक पंढरपूर शहरात येऊ शकणार नाहीत, त्यामुळे पंढरपूर शहर व बाजूच्या दहा गावांत जाहीर केलेली संचारबंदीमुळे सर्वच व्यापार ठप्प होऊन व्यापारी वर्गाच नुकसान होणार असून, हे अन्यायकारक आहे. तरी केवळ १९, २० व २१ जुलै असे तीनच दिवस संचारबंदी जाहीर करावी. नऊ दिवसांच्या संचारबंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले आले. यावेळी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, वैभव येवनकर, भूषण मोहोळकर, हेमंत विभुते, घोडके, मोरे इत्यादी व्यापारी उपस्थित होते.

कोट ::::::::::::::::::::

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संचारबंदी केली आहे. व्यापाऱ्यांकडून संचारबंदीचा कालावधी कमी करण्याबाबत मागणी होत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा झाली आहे. परंतु १७ जुलैपासूनच संचारबंदी करणे आवश्यक आहे. १७ जुलैच्या सायंकाळी ४ वाजल्यापासून ही संचारबंदी सुरु होणार आहे. २५ जुलैपर्यंत मानाच्या पालाख्या पंढरपुरात राहणार आहेत. यामुळे संचारबंदीचा कालावधी कमी करता येणार नाही.

- तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक

फोटो : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याबरोबर चर्चा करताना महासंघाचे उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, वैभव येवनकर, भूषण मोहोळकर, हेमंत विभुते.