शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जिल्ह्यात तीन महिन्यात ४६९ जण झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर ...

सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर शहरात १२८ तर ग्रामीण भागात ३४१ असे ४६९ जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी महिन्याला शंभराच्यावर तर दररोज पाच व्यक्ती हरवत असल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत. छोट्या-छोट्या कारणांवरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्षभरात घरगुती भांडणे, आर्थिक विवचंना, प्रेमप्रकरण, आजारपण, विकृती, पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कलह, अपयशाने खचून गेलेले, एखाद्या गोष्टीला कुटुंबाकडून होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे, अभ्यासाचे टेंशन तर कधी प्रेम प्रकरण अशा अनेक कारणांनी घर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण १३०० वर पोहोचले आहे. सोलापूर जिल्ह्यात महिन्याकाठी हे प्रमाण सरासरी शंभरावर आहे. बऱ्याचदा बेपत्ता झालेले काही दिवसांनी पुन्हा घरी परततात. घरी परतणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के असले, तरी उर्वरित २० टक्के लोक जातात कुठे? हा संशोधनाचा विषय आहे.

सोलापूर शहरात सात तर ग्रामीण भागात २५ अशी ३२ पोलीस ठाणी जिल्ह्यात कार्यरत आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च या कालावधीत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यात ५४ पुरुष व ७४ महिला असे १२८ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील २५ पोलीस ठाण्यात १३० पुरुष व २११ महिला असे ३४१ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

---

महिला आणि अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक

गेल्या तीन महिन्यात बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात बेपत्ता महिलांची संख्या जास्त असल्याने मिसिंग नोंद झालेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. अनेकदा छोट्या घटनांमुळे मुले-मुली नाराज होऊन घरातून पळून जातात. घरगुती ताण-तणावांमुळे बिघडलेली मानसिक स्थिती वृद्ध आणि महिलांच्या बेपत्ता होण्यास कारणीभूत असल्याचे मत पोलिसांकडून व्यक्त केले आहे.

---

२८५ महिला व १८४ पुरुष बेपत्ता

सोलापूर शहरात जानेवारी महिन्यात १९ महिला आणि १६ पुरुष असे ३५, फेब्रुवारीत २५ महिला आणि १५ पुरुष असे एकूण ४० व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. मार्च महिन्यात २५ महिला आणि २३ पुरुष ४८ अशी एकूण १२८ जणांची तर ग्रामीण भागात जानेवारी महिन्यात ५७ महिला आणि ५१ पुरुष असे १०८ बेपत्ता आहेत. फेब्रुवारीत ७७ महिला आणि ४० पुरुष असे एकूण ११७ लोक बेपत्ता झाले. मार्च महिन्यात ७६ महिला आणि ३९ पुरुष असे ११५ जण बेपत्ता झाले. अशा प्रकारे २८५ महिला व १८४ पुरुष मिळून ४६९ व्यक्ती बेपत्ता नोंद झाली आहे.