शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

जिल्ह्यात तीन महिन्यात ४६९ जण झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर ...

सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर शहरात १२८ तर ग्रामीण भागात ३४१ असे ४६९ जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी महिन्याला शंभराच्यावर तर दररोज पाच व्यक्ती हरवत असल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत. छोट्या-छोट्या कारणांवरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्षभरात घरगुती भांडणे, आर्थिक विवचंना, प्रेमप्रकरण, आजारपण, विकृती, पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कलह, अपयशाने खचून गेलेले, एखाद्या गोष्टीला कुटुंबाकडून होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे, अभ्यासाचे टेंशन तर कधी प्रेम प्रकरण अशा अनेक कारणांनी घर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण १३०० वर पोहोचले आहे. सोलापूर जिल्ह्यात महिन्याकाठी हे प्रमाण सरासरी शंभरावर आहे. बऱ्याचदा बेपत्ता झालेले काही दिवसांनी पुन्हा घरी परततात. घरी परतणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के असले, तरी उर्वरित २० टक्के लोक जातात कुठे? हा संशोधनाचा विषय आहे.

सोलापूर शहरात सात तर ग्रामीण भागात २५ अशी ३२ पोलीस ठाणी जिल्ह्यात कार्यरत आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च या कालावधीत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यात ५४ पुरुष व ७४ महिला असे १२८ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील २५ पोलीस ठाण्यात १३० पुरुष व २११ महिला असे ३४१ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

---

महिला आणि अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक

गेल्या तीन महिन्यात बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात बेपत्ता महिलांची संख्या जास्त असल्याने मिसिंग नोंद झालेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. अनेकदा छोट्या घटनांमुळे मुले-मुली नाराज होऊन घरातून पळून जातात. घरगुती ताण-तणावांमुळे बिघडलेली मानसिक स्थिती वृद्ध आणि महिलांच्या बेपत्ता होण्यास कारणीभूत असल्याचे मत पोलिसांकडून व्यक्त केले आहे.

---

२८५ महिला व १८४ पुरुष बेपत्ता

सोलापूर शहरात जानेवारी महिन्यात १९ महिला आणि १६ पुरुष असे ३५, फेब्रुवारीत २५ महिला आणि १५ पुरुष असे एकूण ४० व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. मार्च महिन्यात २५ महिला आणि २३ पुरुष ४८ अशी एकूण १२८ जणांची तर ग्रामीण भागात जानेवारी महिन्यात ५७ महिला आणि ५१ पुरुष असे १०८ बेपत्ता आहेत. फेब्रुवारीत ७७ महिला आणि ४० पुरुष असे एकूण ११७ लोक बेपत्ता झाले. मार्च महिन्यात ७६ महिला आणि ३९ पुरुष असे ११५ जण बेपत्ता झाले. अशा प्रकारे २८५ महिला व १८४ पुरुष मिळून ४६९ व्यक्ती बेपत्ता नोंद झाली आहे.