शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन महिन्यात ४६९ जण झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर ...

सोलापूर : शहर व ग्रामीणमधून व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन महिन्यात ४६९ लोक बेपत्ता झाले आहेत. सोलापूर शहरात १२८ तर ग्रामीण भागात ३४१ असे ४६९ जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी महिन्याला शंभराच्यावर तर दररोज पाच व्यक्ती हरवत असल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत. छोट्या-छोट्या कारणांवरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्षभरात घरगुती भांडणे, आर्थिक विवचंना, प्रेमप्रकरण, आजारपण, विकृती, पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कलह, अपयशाने खचून गेलेले, एखाद्या गोष्टीला कुटुंबाकडून होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे, अभ्यासाचे टेंशन तर कधी प्रेम प्रकरण अशा अनेक कारणांनी घर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण १३०० वर पोहोचले आहे. सोलापूर जिल्ह्यात महिन्याकाठी हे प्रमाण सरासरी शंभरावर आहे. बऱ्याचदा बेपत्ता झालेले काही दिवसांनी पुन्हा घरी परततात. घरी परतणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के असले, तरी उर्वरित २० टक्के लोक जातात कुठे? हा संशोधनाचा विषय आहे.

सोलापूर शहरात सात तर ग्रामीण भागात २५ अशी ३२ पोलीस ठाणी जिल्ह्यात कार्यरत आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च या कालावधीत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यात ५४ पुरुष व ७४ महिला असे १२८ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील २५ पोलीस ठाण्यात १३० पुरुष व २११ महिला असे ३४१ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

---

महिला आणि अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक

गेल्या तीन महिन्यात बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात बेपत्ता महिलांची संख्या जास्त असल्याने मिसिंग नोंद झालेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. अनेकदा छोट्या घटनांमुळे मुले-मुली नाराज होऊन घरातून पळून जातात. घरगुती ताण-तणावांमुळे बिघडलेली मानसिक स्थिती वृद्ध आणि महिलांच्या बेपत्ता होण्यास कारणीभूत असल्याचे मत पोलिसांकडून व्यक्त केले आहे.

---

२८५ महिला व १८४ पुरुष बेपत्ता

सोलापूर शहरात जानेवारी महिन्यात १९ महिला आणि १६ पुरुष असे ३५, फेब्रुवारीत २५ महिला आणि १५ पुरुष असे एकूण ४० व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. मार्च महिन्यात २५ महिला आणि २३ पुरुष ४८ अशी एकूण १२८ जणांची तर ग्रामीण भागात जानेवारी महिन्यात ५७ महिला आणि ५१ पुरुष असे १०८ बेपत्ता आहेत. फेब्रुवारीत ७७ महिला आणि ४० पुरुष असे एकूण ११७ लोक बेपत्ता झाले. मार्च महिन्यात ७६ महिला आणि ३९ पुरुष असे ११५ जण बेपत्ता झाले. अशा प्रकारे २८५ महिला व १८४ पुरुष मिळून ४६९ व्यक्ती बेपत्ता नोंद झाली आहे.