शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सीताफळाचे बियाणे चोरणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST

बार्शी : गोरमळे येथील शेतकऱ्यांनी सीताफळाची रोपे तयार करण्यासाठी आणून ठेवलेले ३२ हजारांचे बियाणे चोरून ...

बार्शी : गोरमळे येथील शेतकऱ्यांनी सीताफळाची रोपे तयार करण्यासाठी आणून ठेवलेले ३२ हजारांचे बियाणे चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी पांगरी पोलिसांनी सहा दिवसात तपास करुन तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली आणि १ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

सागर आनंद खळतकर (३१), सागर संजय झोरी (२६), हनुमंत साधू शिंदे (२७, सर्व रा. गोरमाळे, ता. बार्शी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर करताच तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीत तपास करताच त्यांनी ३२ हजार रुपयांचे १६० किलो बियाणे काढून दिले.

१५ एप्रिल रोजी गोरमळे येथे नितीन रामेशवर गिराम यांच्या शेतातून रोपे तयार करण्यासाठी प्रत्येकी ४० किलो वजनाचे चार कट्टे खोलीत ठेवले होते. रात्री जेवण करण्यासाठी गावात घरी गेले होते. जेवण आटोपून परत आल्यानंतर घराला कुलूप दिसले नाही. संशय आल्याने पाहणी करताच बियाणाचे कट्टे दिसले नाहीत. याबाबत त्यांनी पांगरी पोलिसात १६ एप्रिल रोजी फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक सुधीर तोडरमल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक परबत, पोलीस नाईक मनोज जाधव, पांडुरंग मुंढे, विनोद बांगर, सुनील बोदमवाड, उमेश कोळी व दिगंबर भांडरवड यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.

---

सहा दिवसांत लावला छडा

या तपासात संशयितांची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून त्यांचा शोध सुरू घाला. संशयितांना पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. केवळ सहा दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला.

---

२० पांगरी

गोरमाळेतून पळविलेल्या सीताफळाच्या बियाणासह आरोपींना पांगरी पोलिसांनी ताब्यात घेतले.