शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीपूर्वीच दररोज हजारो भाविक पांडुरंग चरणी लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST

त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रमुख संतांच्या पालख्या व दिंड्यांसोबत चालणाऱ्या लाखो भाविकांची सलग दुसऱ्या वर्षी यात्रा हुकणार आहे. तरीही काही ...

त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रमुख संतांच्या पालख्या व दिंड्यांसोबत चालणाऱ्या लाखो भाविकांची सलग दुसऱ्या वर्षी यात्रा हुकणार आहे. तरीही काही भाविक यात्रा चुकविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. म्हणून १० जुलैपासून पालख्यांसोबत चालणारे भाविक वारकरी दररोज बस, खासगी वाहनाने पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीसह कळसाचे दर्शन घेऊन वारी पोहोच करून परतत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पहाटेपासून संध्याकाळी ४ पर्यंत मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

व्यावसायिकांची लगबग

कोरोनामुळे सलग दुसरी आषाढी यात्रा रद्द झाली आहे. वर्षभरात भरणाऱ्या प्रमुख यात्रांवरही शासनाचे कठोर निर्बंध आहेत. विठ्ठल मंदिरही मागील वर्षी जवळपास आठ महिन्यांपेक्षा जास्त व यावर्षीही तब्बल चार महिन्यांपासून मंदिर बंद आहे. त्यामुळे मंदिर परिसरात तुळशीची माळ, प्रसाद, हार, तुरे, मूर्ती, कळस, फोटो, पेढे, खेळणी, कपडे, अगरबत्ती आदी प्रासादिक साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षीची वारी झालीच पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य वारकरी, व्यापाऱ्यांमधून होत होती. मात्र यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यात्रा झाली, पंढरपुरात पुन्हा संचारबंदी लावली असली तरी आषाढी यात्रा सोहळ्यापूर्वी पंढरपुरात वारी पोहोच करण्यासाठी दररोज येत असलेल्या हजारो भाविकांमुळे या व्यावसायिकांची लगबग पुन्हा सुरू झाली असल्याचे चित्र आहे.

पोलीस बंदोबस्तात वाढ

आषाढी यात्रा सोहळा आणखी पाच दिवसानंतर असला तरी दररोज वारी पोहोच करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दाखल होत आहेत. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनानेही बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. हे पोलीस चंद्रभागा वाळवंट, पंढरपूर शहरातील प्रमुख मार्ग, मंदिर परिसरात तळ ठोकून आहेत. ते भाविकांना फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, कोरोनाच्या नियमांचे पालन करा, पुढे लावलेली संचारबंदी याविषयी माहिती देताना दिसत आहेत.

नामदेव पायरी, कळसाच्या दर्शनावरही भाविक समाधानी

मागील एक वर्षभरापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे वारी करणारे भाविक दर्शनासाठी येणारे वारकरी व्याकूळ आहेत. प्रत्येकवर्षी आषाढीला विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग जवळपास १० कि.मी. पेक्षा जास्त लांब असते. त्यावेळी ज्यांना पदस्पर्श दर्शन घेणे शक्य नाही, ते भाविक नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानताना दिसतात. मात्र गेल्या वर्षीपासून आषाढी यात्रा सोहळाच रद्द होता. याशिवाय पंढरपुरात भरणाऱ्या कार्तिकी, चैत्री, माघी या यात्राही रद्द झाल्याने पदस्पर्श दर्शन घेणे जवळपास दुरापास्त झाले आहे. त्यामुळे जे भाविक येतील ते नामदेव पायरी व कळसाचे मिळणारे दर्शनही थोडे थोडके नसे म्हणत यावरच समाधान मानताना दिसत आहेत.