शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आषाढीपूर्वीच दररोज हजारो भाविक पांडुरंग चरणी लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST

त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रमुख संतांच्या पालख्या व दिंड्यांसोबत चालणाऱ्या लाखो भाविकांची सलग दुसऱ्या वर्षी यात्रा हुकणार आहे. तरीही काही ...

त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रमुख संतांच्या पालख्या व दिंड्यांसोबत चालणाऱ्या लाखो भाविकांची सलग दुसऱ्या वर्षी यात्रा हुकणार आहे. तरीही काही भाविक यात्रा चुकविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. म्हणून १० जुलैपासून पालख्यांसोबत चालणारे भाविक वारकरी दररोज बस, खासगी वाहनाने पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीसह कळसाचे दर्शन घेऊन वारी पोहोच करून परतत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पहाटेपासून संध्याकाळी ४ पर्यंत मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

व्यावसायिकांची लगबग

कोरोनामुळे सलग दुसरी आषाढी यात्रा रद्द झाली आहे. वर्षभरात भरणाऱ्या प्रमुख यात्रांवरही शासनाचे कठोर निर्बंध आहेत. विठ्ठल मंदिरही मागील वर्षी जवळपास आठ महिन्यांपेक्षा जास्त व यावर्षीही तब्बल चार महिन्यांपासून मंदिर बंद आहे. त्यामुळे मंदिर परिसरात तुळशीची माळ, प्रसाद, हार, तुरे, मूर्ती, कळस, फोटो, पेढे, खेळणी, कपडे, अगरबत्ती आदी प्रासादिक साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षीची वारी झालीच पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य वारकरी, व्यापाऱ्यांमधून होत होती. मात्र यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यात्रा झाली, पंढरपुरात पुन्हा संचारबंदी लावली असली तरी आषाढी यात्रा सोहळ्यापूर्वी पंढरपुरात वारी पोहोच करण्यासाठी दररोज येत असलेल्या हजारो भाविकांमुळे या व्यावसायिकांची लगबग पुन्हा सुरू झाली असल्याचे चित्र आहे.

पोलीस बंदोबस्तात वाढ

आषाढी यात्रा सोहळा आणखी पाच दिवसानंतर असला तरी दररोज वारी पोहोच करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दाखल होत आहेत. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनानेही बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. हे पोलीस चंद्रभागा वाळवंट, पंढरपूर शहरातील प्रमुख मार्ग, मंदिर परिसरात तळ ठोकून आहेत. ते भाविकांना फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, कोरोनाच्या नियमांचे पालन करा, पुढे लावलेली संचारबंदी याविषयी माहिती देताना दिसत आहेत.

नामदेव पायरी, कळसाच्या दर्शनावरही भाविक समाधानी

मागील एक वर्षभरापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे वारी करणारे भाविक दर्शनासाठी येणारे वारकरी व्याकूळ आहेत. प्रत्येकवर्षी आषाढीला विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग जवळपास १० कि.मी. पेक्षा जास्त लांब असते. त्यावेळी ज्यांना पदस्पर्श दर्शन घेणे शक्य नाही, ते भाविक नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानताना दिसतात. मात्र गेल्या वर्षीपासून आषाढी यात्रा सोहळाच रद्द होता. याशिवाय पंढरपुरात भरणाऱ्या कार्तिकी, चैत्री, माघी या यात्राही रद्द झाल्याने पदस्पर्श दर्शन घेणे जवळपास दुरापास्त झाले आहे. त्यामुळे जे भाविक येतील ते नामदेव पायरी व कळसाचे मिळणारे दर्शनही थोडे थोडके नसे म्हणत यावरच समाधान मानताना दिसत आहेत.