शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतकऱ्यांना पुढे करतात, मागून नेत्यांचा दबाव, सांगा काम कसं करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ...

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ऐकून शेतकरीही भूसंपादनाला विरोध करीत आहेत. त्यामुळे मुदतीत काम होत नाही. आडकाठी आणणाऱ्यांना आवरा आणि सहकार्याची भावना ठेवा, अशी मागणी अधिकाऱ्यांमधून होत आहे.

महामार्गाच्या कामांमध्ये काही शिवसैनिक अडथळा आणत आहेत. त्यांना समज द्या, असे पत्र केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्यभरातील महामार्गांच्या कामांत येत असलेल्या अडचणी समोर येऊ लागल्या. सोलापुरात सध्या तीन महामार्गांची कामे सुरू आहेत. त्यातील सोलापूर-मंगळवेढा महामार्गाच्या कामात अडथळे येत आहेत. कामती बु., खुपसंगी, आंधळगाव या ठिकाणी कामे रखडली आहेत. सततच्या अडथळ्यामुळे एकही रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही. त्यांना आता डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

............

सोलापूर-विजयपूर

या ११० किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प १५७६ कोटींचा असून भूसंपादनासाठी २५० कोटी गेले आहेत. ९४.५६ किलोमीटरचा रस्ता झालेला आहे.

..........

सोलापूर-अक्कलकोट

या ३८ किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ८०७ कोटींचा असून, भूसंपादनासाठी १९८ कोटी दिले आहेत. ३३ किलाेमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे. सोलापूर शहरातील काही भाग संपादित न झाल्याने काम थांबले आहे.

.........

सोलापूर-सांगली

हा १६६ किलोमीटरचा प्रकल्प असून सोलापूर ते मंगळवेढा, मंगळवेढा ते वाटंबरे, वाटंबरे ते बोरगाव असे विभाजन करून काम सुरू आहे. तीन हजार कोटींचा हा प्रकल्प असून मे २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. १५४ किलोमीटर रस्त्यांपैकी १४० किलाेमीटरचा रस्ता झालेला आहे.

......

माउलीच्या मार्गातही अडथळा

पंढरपूर ते आळंदी हा ज्ञानेश्वर पालखी महामार्ग एकूण १९५ किलोमीटरचा रस्ता आहे. सोलापूर जिल्ह्यातून ११९ किलोमीटरचा रस्ता जातो. डिसेंबर २०२० मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालेले आहे. १२०० कोटींचा प्रकल्प आहे. माळशिरस बाह्यवळण रस्त्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी रस्ता अडवला आहे.

..................

राजकारणी काय म्हणतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना समज देणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी एका अभियंत्याच्या कामावर चिखलफेक केली. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनाही त्यांनी समज द्यावी.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

........

सोलापूर जिल्ह्यातील कामांबाबत कुठे तक्रार नाही. अडथळा आणण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांना मोबदलाही चांगला मिळालेला आहे. त्यामुळे ओरडही नाही. राष्ट्रवादीकडून तरी कुठेही अडवणूक होत नाही.

- बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

......

महामार्गाच्या कामांमध्ये कोणीही अडवणूक करीत नाही. माळशिरस तालुक्यात ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या विषय मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला आहे. त्यात राजकीय लोकांचा संबंध येत नाही.

- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.