शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शेतकऱ्यांना पुढे करतात, मागून नेत्यांचा दबाव, सांगा काम कसं करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ...

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ऐकून शेतकरीही भूसंपादनाला विरोध करीत आहेत. त्यामुळे मुदतीत काम होत नाही. आडकाठी आणणाऱ्यांना आवरा आणि सहकार्याची भावना ठेवा, अशी मागणी अधिकाऱ्यांमधून होत आहे.

महामार्गाच्या कामांमध्ये काही शिवसैनिक अडथळा आणत आहेत. त्यांना समज द्या, असे पत्र केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्यभरातील महामार्गांच्या कामांत येत असलेल्या अडचणी समोर येऊ लागल्या. सोलापुरात सध्या तीन महामार्गांची कामे सुरू आहेत. त्यातील सोलापूर-मंगळवेढा महामार्गाच्या कामात अडथळे येत आहेत. कामती बु., खुपसंगी, आंधळगाव या ठिकाणी कामे रखडली आहेत. सततच्या अडथळ्यामुळे एकही रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही. त्यांना आता डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

............

सोलापूर-विजयपूर

या ११० किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प १५७६ कोटींचा असून भूसंपादनासाठी २५० कोटी गेले आहेत. ९४.५६ किलोमीटरचा रस्ता झालेला आहे.

..........

सोलापूर-अक्कलकोट

या ३८ किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ८०७ कोटींचा असून, भूसंपादनासाठी १९८ कोटी दिले आहेत. ३३ किलाेमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे. सोलापूर शहरातील काही भाग संपादित न झाल्याने काम थांबले आहे.

.........

सोलापूर-सांगली

हा १६६ किलोमीटरचा प्रकल्प असून सोलापूर ते मंगळवेढा, मंगळवेढा ते वाटंबरे, वाटंबरे ते बोरगाव असे विभाजन करून काम सुरू आहे. तीन हजार कोटींचा हा प्रकल्प असून मे २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. १५४ किलोमीटर रस्त्यांपैकी १४० किलाेमीटरचा रस्ता झालेला आहे.

......

माउलीच्या मार्गातही अडथळा

पंढरपूर ते आळंदी हा ज्ञानेश्वर पालखी महामार्ग एकूण १९५ किलोमीटरचा रस्ता आहे. सोलापूर जिल्ह्यातून ११९ किलोमीटरचा रस्ता जातो. डिसेंबर २०२० मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालेले आहे. १२०० कोटींचा प्रकल्प आहे. माळशिरस बाह्यवळण रस्त्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी रस्ता अडवला आहे.

..................

राजकारणी काय म्हणतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना समज देणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी एका अभियंत्याच्या कामावर चिखलफेक केली. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनाही त्यांनी समज द्यावी.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

........

सोलापूर जिल्ह्यातील कामांबाबत कुठे तक्रार नाही. अडथळा आणण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांना मोबदलाही चांगला मिळालेला आहे. त्यामुळे ओरडही नाही. राष्ट्रवादीकडून तरी कुठेही अडवणूक होत नाही.

- बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

......

महामार्गाच्या कामांमध्ये कोणीही अडवणूक करीत नाही. माळशिरस तालुक्यात ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या विषय मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला आहे. त्यात राजकीय लोकांचा संबंध येत नाही.

- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.