शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शेतकऱ्यांना पुढे करतात, मागून नेत्यांचा दबाव, सांगा काम कसं करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ...

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ऐकून शेतकरीही भूसंपादनाला विरोध करीत आहेत. त्यामुळे मुदतीत काम होत नाही. आडकाठी आणणाऱ्यांना आवरा आणि सहकार्याची भावना ठेवा, अशी मागणी अधिकाऱ्यांमधून होत आहे.

महामार्गाच्या कामांमध्ये काही शिवसैनिक अडथळा आणत आहेत. त्यांना समज द्या, असे पत्र केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्यभरातील महामार्गांच्या कामांत येत असलेल्या अडचणी समोर येऊ लागल्या. सोलापुरात सध्या तीन महामार्गांची कामे सुरू आहेत. त्यातील सोलापूर-मंगळवेढा महामार्गाच्या कामात अडथळे येत आहेत. कामती बु., खुपसंगी, आंधळगाव या ठिकाणी कामे रखडली आहेत. सततच्या अडथळ्यामुळे एकही रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही. त्यांना आता डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

............

सोलापूर-विजयपूर

या ११० किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प १५७६ कोटींचा असून भूसंपादनासाठी २५० कोटी गेले आहेत. ९४.५६ किलोमीटरचा रस्ता झालेला आहे.

..........

सोलापूर-अक्कलकोट

या ३८ किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ८०७ कोटींचा असून, भूसंपादनासाठी १९८ कोटी दिले आहेत. ३३ किलाेमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे. सोलापूर शहरातील काही भाग संपादित न झाल्याने काम थांबले आहे.

.........

सोलापूर-सांगली

हा १६६ किलोमीटरचा प्रकल्प असून सोलापूर ते मंगळवेढा, मंगळवेढा ते वाटंबरे, वाटंबरे ते बोरगाव असे विभाजन करून काम सुरू आहे. तीन हजार कोटींचा हा प्रकल्प असून मे २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. १५४ किलोमीटर रस्त्यांपैकी १४० किलाेमीटरचा रस्ता झालेला आहे.

......

माउलीच्या मार्गातही अडथळा

पंढरपूर ते आळंदी हा ज्ञानेश्वर पालखी महामार्ग एकूण १९५ किलोमीटरचा रस्ता आहे. सोलापूर जिल्ह्यातून ११९ किलोमीटरचा रस्ता जातो. डिसेंबर २०२० मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालेले आहे. १२०० कोटींचा प्रकल्प आहे. माळशिरस बाह्यवळण रस्त्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी रस्ता अडवला आहे.

..................

राजकारणी काय म्हणतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना समज देणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी एका अभियंत्याच्या कामावर चिखलफेक केली. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनाही त्यांनी समज द्यावी.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

........

सोलापूर जिल्ह्यातील कामांबाबत कुठे तक्रार नाही. अडथळा आणण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांना मोबदलाही चांगला मिळालेला आहे. त्यामुळे ओरडही नाही. राष्ट्रवादीकडून तरी कुठेही अडवणूक होत नाही.

- बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

......

महामार्गाच्या कामांमध्ये कोणीही अडवणूक करीत नाही. माळशिरस तालुक्यात ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या विषय मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला आहे. त्यात राजकीय लोकांचा संबंध येत नाही.

- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.