शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पुढे करतात, मागून नेत्यांचा दबाव, सांगा काम कसं करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ...

सोलापूर : मोबादल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पुढे करतात. त्यामागून राजकीय नेत्यांचा दबाव येतो, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. नेत्यांचे ऐकून शेतकरीही भूसंपादनाला विरोध करीत आहेत. त्यामुळे मुदतीत काम होत नाही. आडकाठी आणणाऱ्यांना आवरा आणि सहकार्याची भावना ठेवा, अशी मागणी अधिकाऱ्यांमधून होत आहे.

महामार्गाच्या कामांमध्ये काही शिवसैनिक अडथळा आणत आहेत. त्यांना समज द्या, असे पत्र केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर राज्यभरातील महामार्गांच्या कामांत येत असलेल्या अडचणी समोर येऊ लागल्या. सोलापुरात सध्या तीन महामार्गांची कामे सुरू आहेत. त्यातील सोलापूर-मंगळवेढा महामार्गाच्या कामात अडथळे येत आहेत. कामती बु., खुपसंगी, आंधळगाव या ठिकाणी कामे रखडली आहेत. सततच्या अडथळ्यामुळे एकही रस्ता वेळेत पूर्ण झालेला नाही. त्यांना आता डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

............

सोलापूर-विजयपूर

या ११० किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प १५७६ कोटींचा असून भूसंपादनासाठी २५० कोटी गेले आहेत. ९४.५६ किलोमीटरचा रस्ता झालेला आहे.

..........

सोलापूर-अक्कलकोट

या ३८ किलोमीटर महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ८०७ कोटींचा असून, भूसंपादनासाठी १९८ कोटी दिले आहेत. ३३ किलाेमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे. सोलापूर शहरातील काही भाग संपादित न झाल्याने काम थांबले आहे.

.........

सोलापूर-सांगली

हा १६६ किलोमीटरचा प्रकल्प असून सोलापूर ते मंगळवेढा, मंगळवेढा ते वाटंबरे, वाटंबरे ते बोरगाव असे विभाजन करून काम सुरू आहे. तीन हजार कोटींचा हा प्रकल्प असून मे २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. १५४ किलोमीटर रस्त्यांपैकी १४० किलाेमीटरचा रस्ता झालेला आहे.

......

माउलीच्या मार्गातही अडथळा

पंढरपूर ते आळंदी हा ज्ञानेश्वर पालखी महामार्ग एकूण १९५ किलोमीटरचा रस्ता आहे. सोलापूर जिल्ह्यातून ११९ किलोमीटरचा रस्ता जातो. डिसेंबर २०२० मध्ये कामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झालेले आहे. १२०० कोटींचा प्रकल्प आहे. माळशिरस बाह्यवळण रस्त्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी रस्ता अडवला आहे.

..................

राजकारणी काय म्हणतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना समज देणार असल्याचे सांगितले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आ. नितेश राणे यांनी एका अभियंत्याच्या कामावर चिखलफेक केली. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनाही त्यांनी समज द्यावी.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

........

सोलापूर जिल्ह्यातील कामांबाबत कुठे तक्रार नाही. अडथळा आणण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांना मोबदलाही चांगला मिळालेला आहे. त्यामुळे ओरडही नाही. राष्ट्रवादीकडून तरी कुठेही अडवणूक होत नाही.

- बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

......

महामार्गाच्या कामांमध्ये कोणीही अडवणूक करीत नाही. माळशिरस तालुक्यात ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या विषय मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी अडवला आहे. त्यात राजकीय लोकांचा संबंध येत नाही.

- प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.