शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

मोहोळमध्ये उड्डाण पूल होणार, विद्यार्थी-नागरिकांचा धोका टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST

चौपदरीकरणाच्या हायवेनंतर शहराजवळील कन्या प्रशाला चौकामध्ये सातत्याने हायवेवर होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांना अपंगत्व आले. ...

चौपदरीकरणाच्या हायवेनंतर शहराजवळील कन्या प्रशाला चौकामध्ये सातत्याने हायवेवर होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांना अपंगत्व आले. कन्या प्रशालेजवळून हायवे ओलांडणे म्हणजे मृत्यूला सामोरेेे जाणे, अशी भीती निर्माण झाली होती. या ठिकाणी भुयारी मार्गाची मागणी केली होती. त्यानुसार २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी व नागरिकांचा धोका टळणार आहे.

कन्या प्रशाला चौकात भुयारी मार्गासाठी २००८ पासून गेल्या १४ वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व परिसरातील शैक्षणिक संस्थांनी आंदोलने केली होती. या सर्वांच्या मागणीला अखेर यश आले आहे. केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून मोहोळ येथील कन्या प्रशालेजवळील उड्डाण पुलास २० कोटी ६३ लाख रुपयांंच्या कामाची मंजुरी दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने शहर व तालुक्यातील असंख्य विद्यार्थी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोहोळमध्ये अनेक शैक्षणिक संकुले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे.

शहरातील कन्या प्रशाला चौकालगतच पाच शाळा आहेत. हा रहदारीचा रस्ता असून, या ठिकाणी चौपदरीकरणावरूनच रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह दुचाकीस्वार व नागरिकांना ये-जा करताना

आजतागायत अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जणांना गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलेले आहे. हे अपघात रोखण्यासाठी कन्या प्रशाला चौकामध्ये भुयारी मार्ग व्हावा, यासाठी भीम प्रतिष्ठान, ज्योती क्रांती परिषद, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला यासह विविध सामाजिक संघटनांनी विद्यार्थ्यांसह आंदोलने केली होती.

सहा तास हायवे बंद

२००८ साली नेताजी प्रशालेतील विद्यार्थी भानवसे याच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल ६ तास हायवे बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये २२ शिक्षकांसह अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल झाले होते. १४ वर्षांनंतर त्या केसचा निकाल लागला आहे. ही सर्व आंदोलने प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी या उड्डाण पुलास २० कोटी ६३ लाख रुपयांंच्या कामाची मंजुरी दिल्याचे ट्यूटरवरून सांगितले.