शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय क्षेत्रात कष्टाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: June 28, 2014 00:44 IST

प्रकट मुलाखत : मृण्मयी देशपांडे यांचे मत

सोलापूर : सध्या चित्रपट, नाटक आदी क्षेत्रात अनेक चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढीने कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, त्याला पर्याय नाही, करण्यासारखे खूप काही आहे, असे आवाहन सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केले. शिवछत्रपती रंगभवन येथे जनसेवा संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या प्रतापसिंह मोहिते-पाटील सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘प्रकट मुलाखत’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मनपाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, प्रयोग परिनिरीक्षक मंडळ सदस्य शिवानंद चलवादी, महिबूब तांबोळी, अभिराज शिंदे, निखिल सावंत, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर जन्मले, बिरू मोटे, तुकाराम बिराजदार, मैनुद्दीन मुलाणी, बापू सलवदे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, अभिनय क्षेत्र खूप चांगले आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की आपण अभिनय करू शकतो का? स्वत: आपण या क्षेत्राकडे कोणत्या नजरेने पाहतो. जेव्हा स्वत:ला विश्वास बसेल की आपण हे करू शकतो तेव्हा कष्टाची तयारी ठेवून या क्षेत्रात आले पाहिजे. मनापासून जितके काम कराल तितके आपल्यासाठी कमी आहे. दिग्दर्शन करायला आवडेल का? या प्रश्नावर बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, एखाद्या चित्रपटाला, नाटकाला रसिकांसमोर घेऊन जात असताना मोठी कसरत करावी लागते. मात्र दिग्दर्शकाच्या नजरेतूनच एका दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होते. त्यामुळे मला अभिनयापेक्षा दिग्दर्शक म्हणून काम करायला जास्त आवडेल. अभिनयाला शेवट असतो का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, अभिनेत्याला शेवट असतो, मात्र अभिनयाला नाही. प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो त्यामुळे कुठून सुरूवात करायची आणि कोठे थांबायचे हे कळले पाहिजे. उत्तम अभिनयासाठी कोणते गुण असावेत? यावर बोलताना मृण्मयीने भाषेवर प्रभुत्व पाहिजे, निरीक्षणाची क्षमता आणि विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचेही सांगितले. संपूर्ण प्रकट मुलाखतीचे संचलन शोभा बोल्ली यांनी केले.---------------------कलेत राजकारण नकोकला आणि राजकारण या प्रश्नावर बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, अनेक कलावंत हे राजकारणाशी निगडीत आहेत. कला क्षेत्रात मोठे झाल्यानंतर लाभलेल्या प्रसिद्धीमुळे अनेक कलावंत राजकारणात येतात. मात्र कलेच्या क्षेत्रात राजकारण नसले पाहिजे, जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे.