शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

खोबरे तिकडे नाही बरे!

By admin | Updated: August 5, 2014 23:39 IST

सातारा बाजारपेठ : वर्षभरात दर चौपट,

सातारा : महागाईच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल मे महिन्यापर्यंत साठ रूपये किलो असणारे खोबऱ्याच्या दरात तब्बल चौपट वाढ झाली आहे. बाजारपेठेत खोबऱ्याची आवक कमी असल्याने हे दरवाढ झाली असल्याचा कयास व्यापारी लावत आहेत. साताऱ्याच्या बाजारपेठेत केरळ आणि कर्नाटक या दोन भागांतून मोठ्या प्रमाणावर सुक्या खोबऱ्याची आवक होते. महिन्यातून किमान दोनदा ट्रकद्वारे वाहतुकीने हे खोबरे बाजारपेठेत दाखल होते. पण गेल्या काही दिवसांत धुवाँधार पावसामुळे ट्रक साताऱ्यात येण्यास उशीर होत असल्यामुळे बाजारपेठेत याचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.सुक्या खोबऱ्या प्रमाणेच नारळानेही पंधरा रूपयांचा दर गाठला आहे. याबरोबरचं मसाल्यातील ... या वस्तुंचे दर चांगलेच वाढले आहेत. श्रावण महिन्यात मांसाहार बंद असल्यामुळे खोबऱ्याचा स्वयंपाकघरातील वापर कमी असतो. पण दुसरीकडे शरिराचे तापमान टिकविण्यासाठी आवश्यक असणारे पौष्टिक डिंकाचे लाडु, पावसाळ्यात मुलांना आवडतो तो चिवडा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोबऱ्याचा वापर होतो. रोजच्या स्वयंपकातही लसुण खोबरे यांची गट्टी असते. पण वाढत्या दरामुळे खोबऱ्याचे स्वयंपाकघरातील अस्तित्व मर्यादित झाले आहे. पोहे, उपीट, आंबट वडी, थापी वडी, वडी सजुरी हे काही पदार्थ केल्यानंतर त्याच्यावर सजावटीसाठी वापरण्यात येणारे खोबरे आता नैवेद्यासारखे वापरले जात असल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यात हे दर असेच राहिले तर बिनफोडणीच्या वरणाप्रमाणेच बिनफोडणीची आमटी खाण्याची वेळ सामान्यांवर येणार आहे. पावसाळ्यानंतर दर कमी होण्याचा अंदाज आहे. पण हे दर अगदी दहा वीस रूपयांनी कमी होतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांत सौदा बाजारपेठेत खोबऱ्याबरोबरच सुपारी आणि मेथ्यांचाही भाव वाढला आहे. १८० रूपये किलो दराची सुपारी आता साडे तीनशे रूपयांपर्यंत पोहोचली आहे. तर चाळीस रूपये किलो दराची मेथी तब्बल ऐंशी रूपयांपर्यंत गेली आहे. बाजारपेठेतील महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.गेल्या काही दिवसांत सौदा बाजारपेठेत खोबऱ्याबरोबरच सुपारी आणि मेथ्यांचाही भाव वाढला आहे. १८० रूपये किलो दराची सुपारी आता साडे तीनशे रूपयांपर्यंत पोहोचली आहे. तर चाळीस रूपये किलो दराची मेथी तब्बल ऐंशी रूपयांपर्यंत गेली आहे. बाजारपेठेतील महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.