शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

...तर कृषी केंद्रांना टाळे ठोकणार : श्रीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST

सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून खरिप पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणांची मागणी वाढली ...

सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून खरिप पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणांची मागणी वाढली आहे. या काळात कृषी दुकानदार रासायनिक खते, बियाणांची चढ्यादराने विक्री करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येऊ लागल्या आहेत. १९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला १४ हजार ७७५ कोटींच्या रासायनिक खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे खतांचे दर कमी झाले आहेत; परंतु खुल्या बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून खते व बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून येऊ लागल्या आहेत.

शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती देताना एमआरपी किमतीची पावती दिली जात आहे. मात्र, पैसे घेताना चढ्या दराने घेत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. चढ्या दराची पावती मागितल्यास शेतकऱ्यांना दिली जात नाही. अगोदरच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कृषी विभागाकडून फिरते भरारी पथक नेमून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे. यावेळी भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, बार्शी तालुकाध्यक्ष मदन दराड, अक्कलकोट तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, जिल्हा परिषदेचे भाजप पक्षनेते आण्णाराव बाराचारे आदी उपस्थित होते.