शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आगटीतील गरम हुरडा होतोय आता हद्दपार; हात काळे करण्यास तरुणाईचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 20:20 IST

सोलापूर : जिल्ह्यात सध्या हुरडा पार्टी झडत आहेत; पण यावेळेस हुरडा पार्टीचे स्वरूप बदललेले स्पष्टपणे दिसून येत आहे. गरमागरम ...

सोलापूर : जिल्ह्यात सध्या हुरडा पार्टी झडत आहेत; पण यावेळेस हुरडा पार्टीचे स्वरूप बदललेले स्पष्टपणे दिसून येत आहे. गरमागरम आगटीतील हुरड्याची चव चाखण्याची सवय असलेल्यांना आता तव्यावरचा हुरडा खाण्याची वेळ आली आहे.

रब्बी ज्वारीचा जिल्हा म्हणून सोलापूरची महाराष्ट्रात ओळख आहे. मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटच्या बहुतांश क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. जानेवारीपासून ज्वारी हुरड्यास येण्यास सुरुवात होते. शिवारात जमिनीत खड्डा खोदून गोवऱ्याच्या निखाऱ्यावर हुरड्यात आलेली कणसे भाजून अशा गरमागरम हुरड्याची चव चाखण्याची मोठी परंपरा आहे. या काळात शेती नसलेली पाहुणेमंडळी हुरड्याचा आस्वाद चाखण्यासाठी शेतावर जात होती. शेतकरी कुटुंबातील या प्रथेला गेल्या वीस वर्षांत मोठा बदल झाला. राजकीय मंडळींनी हुरड्या पाटर्यांचे स्वरूपच बदलून टाकले. हुरड्याची लज्जत वाढविण्यासाठी वांग्याचे भरीत. शेंगाची चटणी, लसणाची चटणी, गूळ, खारा, मीठ, शेंगाचा कुट, भाजलेल्या शेंगा, शेव, खोबऱ्याचा गोड किस आणि शेवटी ताक अशा पदार्थांची रेलचेल वाढली आहे. बऱ्याच ठिकाणी मार्केटिंग करून पैसाही मिळविला जात आहे. सध्या १२० रुपये किलोने कच्चा हुरडा बाजारात विकला जात आहे. ज्यांना पार्टीला जाणे शक्य नाही असे लोक घरी तव्यावर भाजून हुरड्याची चव चाखताना दिसून येत आहेत.

हुरड्यातही झाला बदल

हुरड्याला पार्टीचे स्वरूप आल्यावर चवीतही बदल होत गेला. मूळ मालदंडी ज्वारीऐवजी खास हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जातीची लागवड वाढली. कुचकुची, गूळभेंडी हुरड्याला मागणी वाढली; पण हा हुरडा फार काळ टिकत नाही. त्यानंतर आता राजहंस हुरड्याची लागवड वाढली आहे. सर्व मोसमात हा हुरडा येतो व खाण्यासठी एकदम मऊ व लुसलुशीत आहे. मात्र, आभाळी वातावरण तयार झाल्यावर या जातीची कणसे लगेच परिपक्व होतात.

आगटीतील हुरडा आता दुर्मीळ

जसे हुरड्याचे प्रकार बदलले, तसे हुरडा भाजण्यातही बदल झाला आहे. शेतात मातीतच खड्डा खोदून गोवऱ्या जाळून फुललेल्या निखाऱ्यावर कणसे भाजली जातात; पण अलीकडे खाणाऱ्यांची संख्या वाढू लागल्यावर लाकडे जाळून कोळशाचे निखारे तयार केले जातात; पण यात भाजलेल्या हुरडा तसाच गरमागरम चोळून देणे जिकिरीचे काम आहे. शेतीत काम केलेल्यांच्या हाताला घट्टे पडलेले असतात; पण आता यांत्रिकीकरणामुळे असे शेतकरी कमी झाले आहेत. त्यामुळे साध्या हाताला आगटीत भाजलेल्या कणसाचे चटके बसतात. त्यामुळे अशी कणसे चोळणारी माणसे भेटत नाहीत. आजची तरुणाई हात काळे होतात म्हणून हे काम करायला तयारी नाही.

या आहेत अडचणी...

हुरडा पौष्टिक आहे. त्यामुळे वरचेवर खाणाऱ्यांची मागणी वाढत आहे; तर दुसरीकडे शिवारात असलेल्या पिकातून हुरड्याची कणसे शोधणे, आगटीत भाजणे अशा लोकांची संख्या कमी होत आहे. हाताला चटके सहन करणे व हात काळे करणे हे आजच्या तरुण पिढीला आवडत नाही. त्यामुळे शेतातून कणसे आणून तव्यात हुरडा भाजून खाल्ला जात आहे; पण आगटीतील हुरडा खाण्याची मजा काही औरच आहे, असा जाणकारांचा अनुभव आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी