शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पाणी नसलेल्या ठिकाणी वन विभाग टँकरने जगविणार झाडे

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 25, 2023 13:36 IST

३० सप्टेंबरपर्यंत होणार १०० टक्के वृक्षारोपण

सोलापूर : वन विभागाकडून जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात येत आहे. सध्या 90 टक्के वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के वृक्षारोपण पूर्ण होणार आहे. ज्या पाऊस नसलेल्या ठिकाणची झाडे टँकरने पाणी देऊन जगविण्यात येत आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

मागील तीन वर्षांशी तुलना करता यावर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी आहे. तरीदेखील शासनाने ठरवून दिलेले उद्दीष्ट वन विभागाकडून पूर्ण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाऊ पडला तिथे वृक्षारोपण होत आहे. ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे टँकरद्वारे झाड जगविण्यात येत आहे.

जिल्हा नियोजनमधून 1.80 एकर मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात येत आहे. 10 एकरामध्ये देशी झाडे लावण्यात येत आहेत. एकूण 400 हेक्टरवर वृक्ष लागवड होत आहे. चरे आणि आणि बांध यांच्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम चांगला आहे. जिल्हातील सर्वच वनक्षेत्रात सध्या वृक्षारोपण सुरु आहे.

दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी वृक्षलागवडीचे लक्ष कमी आहे. यंदा पाऊस कमी असला तरी वृक्षलागवडीचे लक्ष आम्ही पूर्ण करणार आहोत. 30 सप्टेंबरपर्यंत वृक्षारोपण पूर्ण होईल. त्यानंतर झाडे जगविण्यासाठी गरज असलेल्या ठिकाणी टँकरने पाणी देण्यात येणार आहे. - धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग