शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसलेल्या ठिकाणी वन विभाग टँकरने जगविणार झाडे

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 25, 2023 13:36 IST

३० सप्टेंबरपर्यंत होणार १०० टक्के वृक्षारोपण

सोलापूर : वन विभागाकडून जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात येत आहे. सध्या 90 टक्के वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 100 टक्के वृक्षारोपण पूर्ण होणार आहे. ज्या पाऊस नसलेल्या ठिकाणची झाडे टँकरने पाणी देऊन जगविण्यात येत आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

मागील तीन वर्षांशी तुलना करता यावर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी आहे. तरीदेखील शासनाने ठरवून दिलेले उद्दीष्ट वन विभागाकडून पूर्ण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाऊ पडला तिथे वृक्षारोपण होत आहे. ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे टँकरद्वारे झाड जगविण्यात येत आहे.

जिल्हा नियोजनमधून 1.80 एकर मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात येत आहे. 10 एकरामध्ये देशी झाडे लावण्यात येत आहेत. एकूण 400 हेक्टरवर वृक्ष लागवड होत आहे. चरे आणि आणि बांध यांच्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम चांगला आहे. जिल्हातील सर्वच वनक्षेत्रात सध्या वृक्षारोपण सुरु आहे.

दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी वृक्षलागवडीचे लक्ष कमी आहे. यंदा पाऊस कमी असला तरी वृक्षलागवडीचे लक्ष आम्ही पूर्ण करणार आहोत. 30 सप्टेंबरपर्यंत वृक्षारोपण पूर्ण होईल. त्यानंतर झाडे जगविण्यासाठी गरज असलेल्या ठिकाणी टँकरने पाणी देण्यात येणार आहे. - धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग