शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

थेंबे थेंबे तळे साचत' नीरा खोऱ्यातील धरणांनी पाणीसाठा ओलांडला पंचाहत्तरी

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 1, 2023 18:39 IST

सिंचनाचा प्रश्न मिटला : नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे

सोलापूर : पुरंदर, भोर, वेल्ह्याच्या धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नीरा खोऱ्यातील धरणं हळूहळू पूर्ण क्षमतेने भरण्याची वाटचाल सुरू झाली आहे. 'थेंबे थेंबे तळे साचे' म्हणीप्रमाणे मंगळवारी नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणांनी सरासरी पंचाहत्तर टक्के ओलांडली.

धरणाच्या कालव्यावर अवलंबून असणा-या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीप्रश्न सुटला आहे. पंधरवड्यापासून  या चार धरणांच्या पातळीत वाढ होत आहे.२० जुलै २०२२ ला चारही धरणांचा पाणीसाठा ४० टक्के म्हणजे १९ द.ल.घ.मी. होता. त्यानंतर २५ जुलैला तो ६० टक्के म्हणजे २९ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होता. मंगळवारी सकाळी ७६.३६ टक्के म्हणजे ३६.८९७ द.ल.घ.मी. झाला. असाच पाऊस राहिला तर १० ऑगस्टपर्यंत चारही धरणांची पातळी १०० टक्के होईल.

३१ जुलै २०२२ पर्यंत नीरेच्या वीर धरणातून दोनवेळा विसर्ग केला होता. यावर्षी मात्र अजून दहा ते पंधरा दिवस नदीत विसर्ग होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. गतवर्षी ३१ जुलै २०२२ रोजी चारही धरणांतील पाणीसाठा ३७.६६७ द.ल.घ.मी. ७७.९४ टक्के होता. १ आगस्ट २०२३ रोजी ३६,८९७ द.ल.घ.मी. ७६:३६ टक्के आहे.

हवामान विभागाकडून पुढील आठ दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आहे. आता धरणातून पाण्याचा विसर्ग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या शेतक-यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे लागले आहेत.बंधाऱ्याची दर्पे काढली..

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नीरा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दर्पे लावलेली होती. त्यामुळे नदी पात्रात मुबलक पाणी होते. आता सर्व दर्पे काढली आहेत.१ ऑगस्ट २०२३ सकाळची टक्केवारी

भाटघर : ७८.३५ टक्के, निरा देवघर : ८६.९४ टक्के, वीर : ८०.५६ टक्के, गुंजवणी : ७०.०५ टक्के गतवर्षी १ ऑगस्ट २०२२ रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा ३७.६७९ टीएमसी व टक्केवारी ७७.९६ एवढा होता. आज १ ऑगस्ट २०२३ रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८७९ टीएमसी व ७६.६३ टक्के एवढा आहे.