शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

थेंबे थेंबे तळे साचत' नीरा खोऱ्यातील धरणांनी पाणीसाठा ओलांडला पंचाहत्तरी

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 1, 2023 18:39 IST

सिंचनाचा प्रश्न मिटला : नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे

सोलापूर : पुरंदर, भोर, वेल्ह्याच्या धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नीरा खोऱ्यातील धरणं हळूहळू पूर्ण क्षमतेने भरण्याची वाटचाल सुरू झाली आहे. 'थेंबे थेंबे तळे साचे' म्हणीप्रमाणे मंगळवारी नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणांनी सरासरी पंचाहत्तर टक्के ओलांडली.

धरणाच्या कालव्यावर अवलंबून असणा-या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा पिण्याचा व सिंचनाचा पाणीप्रश्न सुटला आहे. पंधरवड्यापासून  या चार धरणांच्या पातळीत वाढ होत आहे.२० जुलै २०२२ ला चारही धरणांचा पाणीसाठा ४० टक्के म्हणजे १९ द.ल.घ.मी. होता. त्यानंतर २५ जुलैला तो ६० टक्के म्हणजे २९ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होता. मंगळवारी सकाळी ७६.३६ टक्के म्हणजे ३६.८९७ द.ल.घ.मी. झाला. असाच पाऊस राहिला तर १० ऑगस्टपर्यंत चारही धरणांची पातळी १०० टक्के होईल.

३१ जुलै २०२२ पर्यंत नीरेच्या वीर धरणातून दोनवेळा विसर्ग केला होता. यावर्षी मात्र अजून दहा ते पंधरा दिवस नदीत विसर्ग होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. गतवर्षी ३१ जुलै २०२२ रोजी चारही धरणांतील पाणीसाठा ३७.६६७ द.ल.घ.मी. ७७.९४ टक्के होता. १ आगस्ट २०२३ रोजी ३६,८९७ द.ल.घ.मी. ७६:३६ टक्के आहे.

हवामान विभागाकडून पुढील आठ दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आहे. आता धरणातून पाण्याचा विसर्ग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या शेतक-यांचे वीर धरणाच्या विसर्गाकडे डोळे लागले आहेत.बंधाऱ्याची दर्पे काढली..

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नीरा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दर्पे लावलेली होती. त्यामुळे नदी पात्रात मुबलक पाणी होते. आता सर्व दर्पे काढली आहेत.१ ऑगस्ट २०२३ सकाळची टक्केवारी

भाटघर : ७८.३५ टक्के, निरा देवघर : ८६.९४ टक्के, वीर : ८०.५६ टक्के, गुंजवणी : ७०.०५ टक्के गतवर्षी १ ऑगस्ट २०२२ रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा ३७.६७९ टीएमसी व टक्केवारी ७७.९६ एवढा होता. आज १ ऑगस्ट २०२३ रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८७९ टीएमसी व ७६.६३ टक्के एवढा आहे.