शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हरणांच्या सुरक्षेसाठी हायवेवर दहा फूट जाळीचे आवरण; धरणे आंदोलनानंतर घेतली दखल

By विलास जळकोटकर | Updated: March 24, 2023 15:57 IST

एक काळविटावर पुण्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचे सोलापूर व राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.

सोलापूर - विजयपूर महामार्गावर दोन महिन्यापूर्वी १२ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतरही दखल घेतली नसल्याने धरणे आंदोलन छेडताच हायवेवर पुलाच्या दोन्ही बाजूस दोन फूट कठडा आणि आठ फूट आवरण असलेली जाळी बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

सोलापूर - विजयपूर महामार्गावर पूणेरोड केगाव ते हत्तूर बायपास चार पदरी रिंगरोड तयार करण्यात आला आहे. या महामार्गावर केगाव येथील देशमुख वस्तीजवळ अंडरपासवर २८ जानेवारी रोजी संध्याकाळी १५ काळवीट पुलावरून खाली पडून १२ काळविटांचा जागीच मृत्यू तर दोन काळविटांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. एक काळविटावर पुण्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचे सोलापूर व राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. सोलापुरातील विविध पर्यावरण संस्थांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता. तर नागरिकांनी चौकाचौकात श्रद्धांजली सभा घेतल्या होत्या. घटनेची चौकशी करुन कारवाई करन्यासाठी जीआयबी फाउंडेशन आणि डब्लूसीएएस या संस्थाकडून जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन देण्यात आले होते. धरणे आंदोलनानंतर दखल

घटनेची चौकशी करुन तातडीने केद्रसरकारच्या वने व हवामानबदल विभागास अहवाल सादर करणे करीता अप्पर प्रधान वन्यजीवरक्षक पश्चिम विभाग मुंबईचे श्री बेन यांनी घटना स्थळी भेट दिली होती. या घटनेनंतर दोन महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचे ठोस कारवाई किंवा उपाययोजना झाली नसल्याने  १५ मार्च २०२३ रोजी जे आयबी फाउंडेशनच्या वतीने उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग प्रादेशीक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात डब्लू सी ए एस, वाईल्डलाईफ केअर संस्थेच्या सदस्स्यांनी भाग घेतला होता.

या आंदोलनाची दखल घेऊन चारच दिवसात धरणे आंदोलनात मागणी केलेल्या हरणांच्या मृत्यू घडलेल्या ठिकाणी पुलावर जाळीचे आवरण उभारण्याचे काम एन एच ए आय च्या वतीने आयबीएम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरु झाले. 

पुलाच्या दोन्ही बाजूने दहा फूट आवरण

दोन फूट उंचीचा कठडा आणि आठ फूट जाळीचे असे एकूणदहा फूट आवरण पूलाच्या दोन्ही बाजूने उभारण्यात येत आहे. या काममाची सुरूवात आज  वनपरीक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षीअभयारण्य नान्नज याच्या हस्ते करण्यात आले. हे काम येत्या २५ ते ३० दिवसात पुर्ण करण्याची योजना आहे.