शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पथकानं बांधावर येऊन केली पाहणी.. तीन महिने विलंबानं बळीराजा नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, ...

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, वीज वितरण आदी शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यशपाल व मुख्य अभियंता (एन.एफ.एस.जी) तुषार व्यास यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार विवेक साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, जिल्हा उपनिंबधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यांच्या बांधावर जाऊन पाहणी अन्‌ संवाद साधला

केंद्रीय पथकाने अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधांवर जाउन पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. भंडीशेगाव येथील शेतकरी विठ्ठल यलमार यांनी पीक नुकसानीची माहिती दिली, तर मोहन आप्पा कवडे यांनी घरात पाणी आल्याने झालेली पडझड व पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे याबाबत माहिती दिली तसेच सुनील सुरवसे यांनी पुरामुळे शेतजमिनीसह डाळिंब पीक वाहून गेल्याचे सांगितले. उपरी येथील शेतकरी शहाजी गव्हाणे यांच्या उसाच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी उपरी ग्रामस्थांनी पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी केली, तर टाकळीच्या महादेव काशीद व लालासो देशमुख यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली.

तालुक्यात ६९ हजार शेतकऱ्यांचे ६५ जार हेक्टरचे नुकसान

यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी तालुक्यातील अतिवष्टीमुळे व पुरामुळे ६९,५०० शेतकऱ्यांचे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, मका बाजरी, भुईमूग, ज्वारी, कांदा, सोयाबीन, फळबाग, घरांची पडझड, आदींचा समावेश आहे. तसेच रस्ते, पूल, वीज, बंधारे या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे यावेळी केंद्रीय पथकाला सांगितले.

पथक उशिरा आल्याने शेतकरी संतप्त

तीन महिन्यांपूर्वी पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी, महापुरामुळे शेती, फळबागा, पिके, जनावरे, घरे, रस्ते, वीज, पुलाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तातडीने पंचनामे करून मदत मिळणे गरजेच होत. मात्र केंद्राचे पथकच तब्बल तीन महिन्यांनी नुकसानीची पहाणी करण्यासाठी येत असेल तर नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांसमोर मांडला.

-----

फोटो ओळी -

उपरी व भंडी शेगाव परिसरांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.

===Photopath===

221220\22sol_6_22122020_4.jpg

===Caption===

उपरी व भंडी शेगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.