शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पथकानं बांधावर येऊन केली पाहणी.. तीन महिने विलंबानं बळीराजा नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, ...

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, सुरवसे वस्ती (भंडीशेगाव), उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पूल, वीज वितरण आदी शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यशपाल व मुख्य अभियंता (एन.एफ.एस.जी) तुषार व्यास यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार विवेक साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, जिल्हा उपनिंबधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यांच्या बांधावर जाऊन पाहणी अन्‌ संवाद साधला

केंद्रीय पथकाने अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधांवर जाउन पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. भंडीशेगाव येथील शेतकरी विठ्ठल यलमार यांनी पीक नुकसानीची माहिती दिली, तर मोहन आप्पा कवडे यांनी घरात पाणी आल्याने झालेली पडझड व पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे याबाबत माहिती दिली तसेच सुनील सुरवसे यांनी पुरामुळे शेतजमिनीसह डाळिंब पीक वाहून गेल्याचे सांगितले. उपरी येथील शेतकरी शहाजी गव्हाणे यांच्या उसाच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी उपरी ग्रामस्थांनी पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी केली, तर टाकळीच्या महादेव काशीद व लालासो देशमुख यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली.

तालुक्यात ६९ हजार शेतकऱ्यांचे ६५ जार हेक्टरचे नुकसान

यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी तालुक्यातील अतिवष्टीमुळे व पुरामुळे ६९,५०० शेतकऱ्यांचे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, मका बाजरी, भुईमूग, ज्वारी, कांदा, सोयाबीन, फळबाग, घरांची पडझड, आदींचा समावेश आहे. तसेच रस्ते, पूल, वीज, बंधारे या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे यावेळी केंद्रीय पथकाला सांगितले.

पथक उशिरा आल्याने शेतकरी संतप्त

तीन महिन्यांपूर्वी पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टी, महापुरामुळे शेती, फळबागा, पिके, जनावरे, घरे, रस्ते, वीज, पुलाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तातडीने पंचनामे करून मदत मिळणे गरजेच होत. मात्र केंद्राचे पथकच तब्बल तीन महिन्यांनी नुकसानीची पहाणी करण्यासाठी येत असेल तर नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांसमोर मांडला.

-----

फोटो ओळी -

उपरी व भंडी शेगाव परिसरांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.

===Photopath===

221220\22sol_6_22122020_4.jpg

===Caption===

उपरी व भंडी शेगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथक.