शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा

By admin | Updated: January 25, 2017 18:16 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा

दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा सोलापूर आॅनलाईन लोकमतकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आघाडी करण्याला दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी स्पष्ट नकार दिला आहे. तरीही मंद्रुप गटासाठी आघाडी करण्याची तयारी काँग्रेस वर्तुळात सुरू आहे. गेली कित्येक वर्षे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणात काँग्रेसला राष्ट्रवादीनेच सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने होते. थोडक्यात राष्ट्रवादीची संधी हुकली. यंदा तालुक्यात भाजपाची ताकद वाढत असल्याने दोन्ही काँग्रेससमोर आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेस सत्तेबाहेर गेली आहे तर राष्ट्रवादीचे नेतेच पक्षातून बाहेर पडून काँग्रेसच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची स्थिती तशी भक्कम राहिली नाही. म्हणूनच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपाला थोपविण्यासाठी आघाडीचा पर्याय पुढे आला होता. त्याला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी खो घातला आहे. राष्ट्रवादीचे जि. प. कृषी समिती सभापती आप्पाराव कोरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची तयारी केली आहे. काँग्रेस नेतृत्वाने मंद्रुप जि. प. गट आणि पंचायत समिती गण कोरे यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा आहे. आप्पाराव कोरे यांनी या चर्चेला दुजोरा दिला; मात्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांनी एका बाजूने स्वतंत्र लढण्याची घोषणा करीत काही अटींवर काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आहे. आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्याच्या अक्कलकोट मतदारसंघातील कुंभारी, वळसंग, बोरामणी गटात काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद कमी होण्याची शक्यता आहे.-----------------------------समान वाटा हवा...दक्षिण सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे सध्या दोन जि. प. सदस्य आणि चार पंचायत समिती सदस्य आहेत. पक्षाची ताकद काँग्रेस बरोबरीने असल्याने आगामी निवडणुकीत ३ जि. प. गट, ७ पंचायत समिती गण सोडण्याची तयारी असेल तरच काँग्रेससोबत चर्चेला बसणार असल्याचे सांगत, आघाडीसाठी होऊ घातलेल्या बैठकीलाच बगले यांनी खो घातला आहे. -------------------------राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी माजी आमदार दिलीप माने यांची चर्चा झाली आहे. माजी जि. प. अध्यक्ष बळीराम साठे यांची भूमिका मध्यस्थाची राहणार आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक बँकेऐवजी काँग्रेस भवन अथवा राष्ट्रवादी कार्यालयात घेतल्यास आपण चर्चेला जाऊ, असा पवित्रा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवराज बगले यांनी घेतला आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रबळ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षच संपला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मंद्रुप गट आणि गणात काँग्रेसची ताकद आहे. तो तर मुळीच सोडणार नाही. -गुरुसिद्ध म्हेत्रे, सभापती तथा तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी---------------ज्यांनी परस्पर काँग्रेस नेत्यांशी संधान बांधून आघाडी करण्याचा घाट घातला असेल तर त्यांनी खुशाल आघाडी करावी. त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. दोन्ही तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी सन्मानपूर्वक बोलावले तरच चर्चेला जाऊ. - डॉ. बसवराज बगलेतालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस