शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

टाकळी सिकंदर ग्रामपंचायतीत त्रिशंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST

मोहोळ : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील मोठ्या व प्रमुख असणाऱ्या खंडाळी, अंकोली, टाकळी ...

मोहोळ : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील मोठ्या व प्रमुख असणाऱ्या खंडाळी, अंकोली, टाकळी सिकंदर व आष्टी या चार ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीप्रणित आघाडींनी झेंडा फडकवला आहे. ढोक बाभळगाव ग्रामपंचायतीवर मात्र शिवसेनाप्रणित आघाडीला पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. टाकळी सिकंदरमधे जरी राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या असल्या तरी तेथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. हा तिढा सरपंचपदाच्या आरक्षणा नंतरच सुटणार आहे.

टाकळी सिकंदर येथे १५ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भीमा परिवाराच्या पॅनलला धक्का दिला. राष्ट्रवादीप्रणित टाकळी सिकंदर ग्राम विकास पॅनलचे प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आघाडीला सात जागा मिळाल्या. भीमा परिवार प्रणित आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. सिकंदर परिवर्तन पॅनलला सहा जागा मिळाल्या. येथे भीमा परिवाराची सत्ता गेली तरी टाकळी ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायतीच्या १५ जागेसाठी दोन पॅनल उभे होते. यामधे राष्ट्रवादीचे राजाभाऊ गुंड-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रणित ग्राम विकास महाआघाडीला ८ जागा मिळाल्या. विजयराज डोंगरे प्रणित ग्रामविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. आष्टी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता राखण्यात राजाभाऊ गुंड पाटील, मदन पाटील यांना यश आले आहे.

बिनविरोध होणार म्हणून गेली चार महिने गाजलेल्या खंडाळी ग्रामपंचायतीसाठी अखेर निवडणूक लागली. या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित स्वर्गीय प्रभाकर मुळे, ग्राम विकास पॅनलचे प्रमुख सचिन बाबर, व श्यामराव शिरसाट यांच्या गटाला १२ जागा मिळाल्या. त्यांच्या विरोधात माऊली ग्रामविकास पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

अंकोली ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी लागलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित भैरवनाथ ग्राम विकास आघाडीचे पॅनल प्रमुख अशोक क्षीरसागर यांच्या गटाला ८ जागा मिळाल्या. भीमा परिवार प्रणित लोकनेते साहेबराव पवार पॅनलला तीन जागा मिळाल्या. अंकोली ग्रामपंचायतीमधे पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता राखण्यात अशोक क्षीरसागर यांना यश आले आहे. ढोकबाभळगाव येथे पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले. येथे एकूण ११ जागेसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये दादाराव पवार यांच्या रेणुका देवी परिवर्तन विकास आघाडीला चार जागा मिळाल्या तर यल्लमा देवी विकास आघाडीचे प्रमुख भीमराव मुळे , बंडू मुळे यांच्या आघाडीला सात जागा मिळाल्या.