शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

टाकळी सिकंदर ग्रामपंचायतीत त्रिशंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST

मोहोळ : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील मोठ्या व प्रमुख असणाऱ्या खंडाळी, अंकोली, टाकळी ...

मोहोळ : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील मोठ्या व प्रमुख असणाऱ्या खंडाळी, अंकोली, टाकळी सिकंदर व आष्टी या चार ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीप्रणित आघाडींनी झेंडा फडकवला आहे. ढोक बाभळगाव ग्रामपंचायतीवर मात्र शिवसेनाप्रणित आघाडीला पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. टाकळी सिकंदरमधे जरी राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या असल्या तरी तेथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. हा तिढा सरपंचपदाच्या आरक्षणा नंतरच सुटणार आहे.

टाकळी सिकंदर येथे १५ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भीमा परिवाराच्या पॅनलला धक्का दिला. राष्ट्रवादीप्रणित टाकळी सिकंदर ग्राम विकास पॅनलचे प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आघाडीला सात जागा मिळाल्या. भीमा परिवार प्रणित आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. सिकंदर परिवर्तन पॅनलला सहा जागा मिळाल्या. येथे भीमा परिवाराची सत्ता गेली तरी टाकळी ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायतीच्या १५ जागेसाठी दोन पॅनल उभे होते. यामधे राष्ट्रवादीचे राजाभाऊ गुंड-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रणित ग्राम विकास महाआघाडीला ८ जागा मिळाल्या. विजयराज डोंगरे प्रणित ग्रामविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. आष्टी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता राखण्यात राजाभाऊ गुंड पाटील, मदन पाटील यांना यश आले आहे.

बिनविरोध होणार म्हणून गेली चार महिने गाजलेल्या खंडाळी ग्रामपंचायतीसाठी अखेर निवडणूक लागली. या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित स्वर्गीय प्रभाकर मुळे, ग्राम विकास पॅनलचे प्रमुख सचिन बाबर, व श्यामराव शिरसाट यांच्या गटाला १२ जागा मिळाल्या. त्यांच्या विरोधात माऊली ग्रामविकास पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

अंकोली ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी लागलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित भैरवनाथ ग्राम विकास आघाडीचे पॅनल प्रमुख अशोक क्षीरसागर यांच्या गटाला ८ जागा मिळाल्या. भीमा परिवार प्रणित लोकनेते साहेबराव पवार पॅनलला तीन जागा मिळाल्या. अंकोली ग्रामपंचायतीमधे पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता राखण्यात अशोक क्षीरसागर यांना यश आले आहे. ढोकबाभळगाव येथे पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवण्यात शिवसेनेला यश आले. येथे एकूण ११ जागेसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये दादाराव पवार यांच्या रेणुका देवी परिवर्तन विकास आघाडीला चार जागा मिळाल्या तर यल्लमा देवी विकास आघाडीचे प्रमुख भीमराव मुळे , बंडू मुळे यांच्या आघाडीला सात जागा मिळाल्या.