शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सांडपाणी इंदापूरला न्या.. ४ हजार कोटी निधी द्या, पण उजनीचं पाणी घेऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST

पुढे परिचारक म्हणाले, गत महिन्यापासून हक्काचं उजनीचे पाणी पळवून नेल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे ...

पुढे परिचारक म्हणाले, गत महिन्यापासून हक्काचं उजनीचे पाणी पळवून नेल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुजोरा दिला हाेता. मुख्यमंत्र्यांनी उजनीतून पाणी नेण्याला परवानगी दिली. तसेच त्यासाठी सर्वेक्षण केले, ४०० कोटी रुपयांची तरतूद त्याकामासाठी केल्याची माहिती मुख्यमं‌त्र्यांनी दिली. यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये खदखद होती. यामुळे जिल्ह्यातील आमदार, खासदार व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलाच्या नामदेव पायरीजवळ उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उजनीचे पाणी पुणे जिल्ह्यात देण्याबाबतचा आदेश रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

असे असले तरी, उजनीचे पाणी इंदापूर व पुण्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंजुरी जलसंपदा मंत्री रद्द करु शकतात, असा प्रश्न उपस्थित करत आदेश रद्द केला सांगण्यात येते, त्यात काही तरी लबाडी वाटत असल्याचे आ. परिचारक यांनी सांगितले.

कारण आदेशामध्ये पुण्यातून येणारे सांडपाणी उजनी धरणात मिसळते. ते पाणी उचलून आम्ही इंदापूर तालुक्यतील २२ गावांना देणार आहोत. उजनी धरणामधून पाणी देणार, या शब्दप्रयोगाला आमचा विरोध आहे. पुण्यातून येणारे पाणी उरळी कांचन जवळ पूल बांधून अडवून तेथून पाणी इंदापूरला द्यावे. परंतु पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकांना तुमच्या जिल्ह्याचे पाणी आम्ही घेऊन जाणार नाही, असे लेखी देऊन समजावून सांगणे गरजेचे होते. मात्र, योजना रद्द केली म्हणजे याच्यामागे त्यांच्या मनात काहीतरी पाप आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे मत आ. परिचारक यांनी व्यक्त केले आहे.

८ आमदार, २ खासदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला नाही वेळ

उजनीच्या पाण्याच्या संदर्भात निर्णय झाला. त्यासाठी काय रुपरेषा करायची, असे धोरण ठरले. खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी २ मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली. त्यांना आठ आमदार व २ खासदार भेटायला येणार आहेत. वेळ देण्यात यावी, असा मेसेज पाठवण्यात आला होता. परंतु आठ दिवस झाले तरी वेळ देण्यात आला नाही. भेटी संदर्भात कसलाच निरोप मिळाला नाही. यामुळे संघर्ष करण्यासाठी निर्णय घेतला होता.

...म्हणून बदलला निर्णय

सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी पुणे जिल्ह्याला चाललं आहे, ते पाणी आम्ही वाचवू शकणार नाही. यासाठी श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीसमोर आम्ही आमदार पांडुरंगाची क्षमा मागणार होतो. उजनीचे पाणी पुणे जिल्ह्याला नेण्याच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील उरलेली सत्ता केंद्रे उद्ध्वस्त होतील, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असे आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले.