शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी इंदापूरला न्या.. ४ हजार कोटी निधी द्या, पण उजनीचं पाणी घेऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST

पुढे परिचारक म्हणाले, गत महिन्यापासून हक्काचं उजनीचे पाणी पळवून नेल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे ...

पुढे परिचारक म्हणाले, गत महिन्यापासून हक्काचं उजनीचे पाणी पळवून नेल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुजोरा दिला हाेता. मुख्यमंत्र्यांनी उजनीतून पाणी नेण्याला परवानगी दिली. तसेच त्यासाठी सर्वेक्षण केले, ४०० कोटी रुपयांची तरतूद त्याकामासाठी केल्याची माहिती मुख्यमं‌त्र्यांनी दिली. यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये खदखद होती. यामुळे जिल्ह्यातील आमदार, खासदार व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलाच्या नामदेव पायरीजवळ उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उजनीचे पाणी पुणे जिल्ह्यात देण्याबाबतचा आदेश रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

असे असले तरी, उजनीचे पाणी इंदापूर व पुण्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंजुरी जलसंपदा मंत्री रद्द करु शकतात, असा प्रश्न उपस्थित करत आदेश रद्द केला सांगण्यात येते, त्यात काही तरी लबाडी वाटत असल्याचे आ. परिचारक यांनी सांगितले.

कारण आदेशामध्ये पुण्यातून येणारे सांडपाणी उजनी धरणात मिसळते. ते पाणी उचलून आम्ही इंदापूर तालुक्यतील २२ गावांना देणार आहोत. उजनी धरणामधून पाणी देणार, या शब्दप्रयोगाला आमचा विरोध आहे. पुण्यातून येणारे पाणी उरळी कांचन जवळ पूल बांधून अडवून तेथून पाणी इंदापूरला द्यावे. परंतु पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकांना तुमच्या जिल्ह्याचे पाणी आम्ही घेऊन जाणार नाही, असे लेखी देऊन समजावून सांगणे गरजेचे होते. मात्र, योजना रद्द केली म्हणजे याच्यामागे त्यांच्या मनात काहीतरी पाप आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे मत आ. परिचारक यांनी व्यक्त केले आहे.

८ आमदार, २ खासदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला नाही वेळ

उजनीच्या पाण्याच्या संदर्भात निर्णय झाला. त्यासाठी काय रुपरेषा करायची, असे धोरण ठरले. खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी २ मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली. त्यांना आठ आमदार व २ खासदार भेटायला येणार आहेत. वेळ देण्यात यावी, असा मेसेज पाठवण्यात आला होता. परंतु आठ दिवस झाले तरी वेळ देण्यात आला नाही. भेटी संदर्भात कसलाच निरोप मिळाला नाही. यामुळे संघर्ष करण्यासाठी निर्णय घेतला होता.

...म्हणून बदलला निर्णय

सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी पुणे जिल्ह्याला चाललं आहे, ते पाणी आम्ही वाचवू शकणार नाही. यासाठी श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीसमोर आम्ही आमदार पांडुरंगाची क्षमा मागणार होतो. उजनीचे पाणी पुणे जिल्ह्याला नेण्याच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील उरलेली सत्ता केंद्रे उद्ध्वस्त होतील, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असे आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले.