शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सांडपाणी इंदापूरला न्या.. ४ हजार कोटी निधी द्या, पण उजनीचं पाणी घेऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST

पुढे परिचारक म्हणाले, गत महिन्यापासून हक्काचं उजनीचे पाणी पळवून नेल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे ...

पुढे परिचारक म्हणाले, गत महिन्यापासून हक्काचं उजनीचे पाणी पळवून नेल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुजोरा दिला हाेता. मुख्यमंत्र्यांनी उजनीतून पाणी नेण्याला परवानगी दिली. तसेच त्यासाठी सर्वेक्षण केले, ४०० कोटी रुपयांची तरतूद त्याकामासाठी केल्याची माहिती मुख्यमं‌त्र्यांनी दिली. यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये खदखद होती. यामुळे जिल्ह्यातील आमदार, खासदार व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलाच्या नामदेव पायरीजवळ उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उजनीचे पाणी पुणे जिल्ह्यात देण्याबाबतचा आदेश रद्द केल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

असे असले तरी, उजनीचे पाणी इंदापूर व पुण्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंजुरी जलसंपदा मंत्री रद्द करु शकतात, असा प्रश्न उपस्थित करत आदेश रद्द केला सांगण्यात येते, त्यात काही तरी लबाडी वाटत असल्याचे आ. परिचारक यांनी सांगितले.

कारण आदेशामध्ये पुण्यातून येणारे सांडपाणी उजनी धरणात मिसळते. ते पाणी उचलून आम्ही इंदापूर तालुक्यतील २२ गावांना देणार आहोत. उजनी धरणामधून पाणी देणार, या शब्दप्रयोगाला आमचा विरोध आहे. पुण्यातून येणारे पाणी उरळी कांचन जवळ पूल बांधून अडवून तेथून पाणी इंदापूरला द्यावे. परंतु पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकांना तुमच्या जिल्ह्याचे पाणी आम्ही घेऊन जाणार नाही, असे लेखी देऊन समजावून सांगणे गरजेचे होते. मात्र, योजना रद्द केली म्हणजे याच्यामागे त्यांच्या मनात काहीतरी पाप आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे मत आ. परिचारक यांनी व्यक्त केले आहे.

८ आमदार, २ खासदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला नाही वेळ

उजनीच्या पाण्याच्या संदर्भात निर्णय झाला. त्यासाठी काय रुपरेषा करायची, असे धोरण ठरले. खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी २ मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली. त्यांना आठ आमदार व २ खासदार भेटायला येणार आहेत. वेळ देण्यात यावी, असा मेसेज पाठवण्यात आला होता. परंतु आठ दिवस झाले तरी वेळ देण्यात आला नाही. भेटी संदर्भात कसलाच निरोप मिळाला नाही. यामुळे संघर्ष करण्यासाठी निर्णय घेतला होता.

...म्हणून बदलला निर्णय

सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी पुणे जिल्ह्याला चाललं आहे, ते पाणी आम्ही वाचवू शकणार नाही. यासाठी श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीसमोर आम्ही आमदार पांडुरंगाची क्षमा मागणार होतो. उजनीचे पाणी पुणे जिल्ह्याला नेण्याच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील उरलेली सत्ता केंद्रे उद्ध्वस्त होतील, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असे आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले.