शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पंढरपूर तालुक्यावर सलग तिसऱ्या वर्षी महापुराची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

यावर्षी तरी पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. ...

यावर्षी तरी पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने वेळेवर हजेरी लावली. जूनमध्ये काहीशी संथगतीने वाटचाल केलेल्या पावसाने मागील आठवड्यात झोप उडवून दिली. त्यामुळे मायनसमध्ये आलेले धरण रातोरात प्लसमध्ये आले होते. अवघ्या ५ दिवसांत उजनी धरणात तब्बल ४० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर पाण्याचा वेग मंदावला असला तरी धरण ५० टक्क्यांवर आले आहे. तर पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे वेगाने भरत आहेत.

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांत जवळपास १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पुुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांतून उजनीमध्ये हळूहळू पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे.

पावसाळा आणखी किमान दोन महिने बाकी आहे. वरील सर्व धरणे भरल्याने उजनी धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरू शकते, अशी परिस्थिती आहे.

नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो असल्याने त्यामधून कमी-जास्त करून विसर्ग सोडणे सुरू आहे. येत्या काही दिवसात उजनी धरणातूनही भीमा नदीत पाणी सोडण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. नीरा व भीमा नरसिंहपूर येथील संगमावरून पुढे एकत्रित वाहत असल्याने भीमा दुथडी भरून वाहते. त्यामुळे नदीकाठच्या गावावर सलग तिसऱ्या वर्षी महापुराचे सावट गडद होत आहेत.

मात्र गेल्या दोन वर्षांचा धरण व्यवस्थापनाचा अनुभव पाहता पूरस्थिती टाळण्यासाठी पक्क्या नियोजनाची गरज आहे.

मागील वर्षी व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले

२०१९ आणि २०२० या दोन्ही साली भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी भीमेच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांचे, शेतकऱ्यांचे व पंढरपूर शहरातील नागरिकांचे शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे आणि त्या नुकसानीला, पूरस्थितीला केवळ धरण व्यवस्थापन जबाबदार होते. उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग मोठा असताना, धरण १०७ टक्के भरलेले असतानाही उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन केले नव्हते. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी धरणातील फुगवट्याचे पाणी येऊन वाहतूक बंद पडली होती. आणि रात्रीत उजनीतून २ लाख २५ हजार क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग सोडल्याने भीमा नदीकाठच्या लोकांना हातचे सोडून सुरक्षित ठिकाणी पळ काढावा लागला होता. यावर्षी तरी पूरनियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

कालव्याद्वारे पाणी सोडून तळी, तलाव भरून घ्यावेत

यावर्षी धरणे लवकर भरल्याने पूरस्थितीचा धोका मागील दोन वर्षाप्रमाणे अधिक आहे. मागील दोन वर्षीच्या अनुभवातून धरण व्यवस्थापनाने धडे घेऊन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूरस्थिती आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी आतापासूनच लक्ष घालण्याची गरज आहे. धरणाची पातळी जवळपास ७० टक्के झाल्यानंतर त्यामध्ये अधिकचे पाणी न अडविता वरून येणारा विसर्ग लक्षात घेऊन धरणातून दोन्ही कालव्यांद्वारे पाणी सोडून त्या माध्यमातून तळी, तलाव भरून घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने उजनीतील पाणी साठ्यावरही काही प्रमाणात नियंत्रण राखता येणार आहे.

कोट ::::::::::::::::::

मागील दोन वर्षे नदीला आलेल्या पुराचा अनुभव लक्षात घेता यावर्षी धरणातून पाणी सोडून वरून येणारा विसर्ग साठविण्याएवढी जागा शिल्लक ठेवणे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी साठवून ठेवता येईल. धरणात येणारा पाण्याचा प्रवाह आणि धरणातून सोडला जाणारा पाण्याचा प्रवाह यावर सतत लक्ष ठेवून पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. यासाठी आम्ही पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून आहोत. भविष्यातही योग्य नियोजन करू. पूरपरिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक ते आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- सचिन ढोले

प्रांताधिकारी, पंढरपूर

फोटो ::::::::::::::::

नीरा खोरे, व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी अशी भरून वाहत आहे. (छायाचित्र : मोहन डावरे)