शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : ऊस दराचा तिढा कायम, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली 9 बैलगाड्या-3 ट्रॅक्टरची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 12:55 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि ४ : ऊस दरावर निर्णय झाला नसून तिढा कायम आहे. यामुळे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटला असून शुक्रवार व शनिवारी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणा-या नऊ बैलगाड्या व तीन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. अनेक ऊस वाहतूक वाहन चालकांना गुलाब ...

ठळक मुद्दे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटलापाऊस चांगला झाल्याने उसाची वाढऊस वाहतूक वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि ४ : ऊस दरावर निर्णय झाला नसून तिढा कायम आहे. यामुळे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटला असून शुक्रवार व शनिवारी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणा-या नऊ बैलगाड्या व तीन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. अनेक ऊस वाहतूक वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करीत ऊस वाहतूक करु नका, अशी विनवणी केली. 

शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे माढा तालुक्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहकारमंत्री व सचिवांच्या बैठकीत एफआरपीवर कारखानदार ठाम राहिल्यामुळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांना मान्य नसल्यामुळे बैठक फिस्कटली. 

आठवड्यापासून स्वाभिमानीचे कार्यकर्ते फिरुन भाव घोषित केल्याशिवाय ऊस उत्पादकांना ऊसतोड करु नका व वाहन चालकांना ऊस वाहतूक करु नका, अशी विनवणी हात जोडून करीत होते. सहकार मंत्र्यांच्या बैठकीनंतर आपण ऊसतोड करु, असे सांगत होते. मात्र बैठक फिस्कटूनही ऊस उत्पादकांनी ऊसतोड करुन आपली वाहने कारखान्याकडे पाठविण्याचा घाट घातला होता. त्याला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, तालुका कार्याध्यक्ष महावीर सावळे, प्रसिध्दीप्रमुख सत्यवान गायकवाड, दत्तात्रय पंडित, मुसा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाची वाढ अजून होत आहे. शेतक-यांनी उसाला तोडी घेऊ नये, कारखानदार एफआरपीवर ठाम आहेत. त्यांच्यात एकी दिसते. त्याप्रमाणे शेतकºयांनीही आपली एकजूट दखवावी. खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे उसाचा पहिला हप्ता ३४०० रुपये जोपर्यंत कारखानदार देत नाहीत तोपर्यंत ऊस वाहतूक करु देणार नाही. आजचे आंदोलन शांततेने व गांधीगिरीने केले आहे.-शिवाजी पाटील,  जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना