शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

उन्हाळ्यात सांगोला, पंढरपूरला मिळणार मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:16 IST

उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अंबाबाई मंदिरासमोरील नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडविण्यात येते. या बंधाऱ्याची उंची ...

उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अंबाबाई मंदिरासमोरील नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडविण्यात येते. या बंधाऱ्याची उंची तीन मीटर आहे. या बंधाऱ्यातून पंढरपूरसह, सांगोला शहर व ८१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

मात्र प्रत्येक वर्षी ऐन उन्हाळ्यात बंधाऱ्यातील पाणीपातळी खालवली जाते. यामुळे नगरपरिषदेला शहरात एक व दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागतो. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

भीमा नदीला पूर आल्यानंतर बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. यामुळे पंढरपूर नगरपरिषदेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बंधाऱ्यांची उंची १ मीटर व लांबी १५० मीटरने वाढवण्याचा विषय नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्याबाबतचा तीन कोटींचा आरखडा तयार झाला असून तो सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव यांनी सांगितले.

बंधाऱ्याची सद्य:स्थिती

बंधाऱ्याची लांबी ३३० मीटर, उंची तीन मीटर, पाणी साठवण क्षमता १०६ द.ल.घ.फू., ४५ दिवस पुरते पाणी.

असा होणार बदल

बंधाऱ्याची लांबी ११० मीटरने तर उंची १ मीटरने वाढणार, पाणी साठवण क्षमता ७० द.ल.घ.फू. वाढणार. अधिक २५ दिवस पाणीपुरवठा होणार.