शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कुरनूर धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:23 IST

आमदार सचिन कल्याणशेट्टी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा ...

आमदार सचिन कल्याणशेट्टी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार संबंधित विभागाने गुरुवारी सकाळी पाणी सोडण्याची कार्यवाही केली. यात धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ८०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.

सध्या धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक दरवाजे एक ते दीड इंचने उघडले आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू असेल. यामुळे धरणातून जवळपास २० ते २२ टक्के पाणी कमी होणार आहे. सोडलेले पाणी अक्कलकोट, सांगवी, ममदाबाद, निमगाव, सातनदुधनी, रुद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यात साठवले जाणार आहे. प्रत्येक बंधाऱ्यात अडीच मीटर उंचीपर्यंत पाणी साठवून घेण्यात येणार आहे. यामुळे पाणीटंचाई दूर होईल. सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठी असेल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

ऐन उन्हाळ्यात प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. बोरी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, शाखा अभियंता रोहित मनलोर, इकालवा निरीक्षक प्रशांत लोंढे, माजी बिटधारक एन.व्ही. उदंडे, राहुल काळे यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.

२२कुरनूर धरण