शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

कुरनूर धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:23 IST

आमदार सचिन कल्याणशेट्टी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा ...

आमदार सचिन कल्याणशेट्टी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार संबंधित विभागाने गुरुवारी सकाळी पाणी सोडण्याची कार्यवाही केली. यात धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ८०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.

सध्या धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक दरवाजे एक ते दीड इंचने उघडले आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू असेल. यामुळे धरणातून जवळपास २० ते २२ टक्के पाणी कमी होणार आहे. सोडलेले पाणी अक्कलकोट, सांगवी, ममदाबाद, निमगाव, सातनदुधनी, रुद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यात साठवले जाणार आहे. प्रत्येक बंधाऱ्यात अडीच मीटर उंचीपर्यंत पाणी साठवून घेण्यात येणार आहे. यामुळे पाणीटंचाई दूर होईल. सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठी असेल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

ऐन उन्हाळ्यात प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. बोरी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, शाखा अभियंता रोहित मनलोर, इकालवा निरीक्षक प्रशांत लोंढे, माजी बिटधारक एन.व्ही. उदंडे, राहुल काळे यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.

२२कुरनूर धरण