शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात ऊस गाळप ठरतोय कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:55 IST

त्यासाठी लहान-मोठ्या शेतकऱ्यांना कोणताही विचार न करता ऊस तोडणीसाठी टोळ्या दिल्या जात आहेत. काही कारखान्यांना आपल्याकडे तोडणी- वाहतूक यंत्रणा ...

त्यासाठी लहान-मोठ्या शेतकऱ्यांना कोणताही विचार न करता ऊस तोडणीसाठी टोळ्या दिल्या जात आहेत. काही कारखान्यांना आपल्याकडे तोडणी- वाहतूक यंत्रणा कमी असल्याने अडचणी येत असल्याने त्यांनी परजिल्हा, परतालुक्यातील कारखान्यांची मनधरणी करत ऊस गाळपाला भाग पाडत त्या शेतकऱ्यांचा फायदा आपल्याच गटाला कसा होईल, याचीही व्यूहरचना आखली जात आहे. शिवाय इतर गटातील आपल्याला समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही ऊस गाळपाला नेण्यासाठी धडपड सुरू आहे. कारखानदारांनी ऐन निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चांदी असून ऊस नेण्यासाठी प्रत्येक वेळी मनधरणी करावी लागणाऱ्या शेतकऱ्यांना निवडणुकीपुरते का असेना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.

भाऊभावकी, पाव्हण्या-रावळ्यांच्या राजकारणाला ऊत

स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोणत्याही एका पक्षाच्या नेत्याच्या नावावर न लढता स्थानिक आघाड्या करून लढविल्या जात असल्याचा आजवरचा इतिहास आहे. पाव्हणे-रावळे, भाऊभावकीच्या समीकरणामुळे या स्थानिक आघाड्या कमालीच्या यशस्वी झाल्याची आजवरची उदाहरणे आहेत. यावर्षीही तालुक्यात दुरंगी, तिरंगी लढतीसह काही गावांमध्ये बहुरंगी लढती लक्ष वेधून घेत आहेत. या निवडणुकांमध्ये गट-तट, स्थानिक आघाड्या झाल्यानंतरही पाव्हणे-रावळे, भाऊ-भावकी यांची समीकरणे जुळवून विजयासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी तर आपल्या पाव्हण्याचा पाव्हुणा त्यांच्यामार्फत निरोप देऊन किमान एक शिक्का तरी आपल्याला मिळावा, यासाठी हालचाली सुरू आहेत. या समीकरणांमुळे मागील कित्येक वर्षे कधीच एकत्र न दिसलेल्या भाऊभावक्या, पावणे-रावळे आपले मतभेद विसरत मदतीसाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत.