शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयामुळं ८० गावातील गोरगरिबांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:23 IST

टेंभुर्णी सोलापूर जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. सन २०११ च्या जनगणनेनुसार टेंभुर्णी शहराची लोकसंख्या १९ ...

टेंभुर्णी सोलापूर जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. सन २०११ च्या जनगणनेनुसार टेंभुर्णी शहराची लोकसंख्या १९ हजार होती ती आता ३० ते ३५ हजारांवर पोहोचली आहे. शिवाय टेंभुर्णी औद्योगिक वसाहत व जवळच असलला साखर कारखाना येथील कर्मचारीही टेंभुर्णी शहरातच राहत असल्याने येथील लोकसंख्या ४० हजाराच्या पुढे गेली आहे. या सर्व लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अपुरे पडत होते. आता ग्रामीण रुग्णालयायमुळे ही उणीव भरुन निघणार आहे.

टेंभुर्णी शहर हायवे जंक्‍शन असल्याने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून रात्रंदिवस वाहनांची ये-जा चालू असते. शहरातून जाणारे सर्वच रोड राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची वर्दळ असते.परंतु येथे अद्ययावत रुग्णालय नसल्याने जखमींना शहरातील रुग्णालयात घेऊन जावे लागते. आता उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाल्यामुळे भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. आपदग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळू शकेल.

सध्या टेंभुर्णी शहरात कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधीन ७ उपकेंद्र असून यावर टेंभुर्णी शहर व सभोवतालची ३० गावे अवलंबून आहेत. टेंभुर्णी शहरातील ३५ हजार व ३० गावातील सुमारे ४५ हजार अशा एकूण ८० ते ९० हजार लोकांना आरोग्यसेवा देणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याच्या आधीन ७ उपकेंद्रे यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे येथील जनतेस थोड्याशा गंभीर आजारासाठी इंदापूर, अकलूज, सोलापूर तसेच पुणे येथे जावे लागते.

---

अशी असेल रुग्णोपयोगी सुविधा

विशेष बाब म्हणून शासनाने नुकतेच मंजूर केलेले हे माढा तालुक्यातील पहिलेच उपजिल्हा रुग्णालय आहे. या उपजिल्हा रुग्णालयामुळे टेंभुर्णी शहरासह परिसरातील लोकांना गुणात्मक व दर्जात्मक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी प्रथम दर्जाचा १, द्वितीय दर्जाचे ८ वैद्यकीय अधिकारी तर वर्ग क चे २५ व वर्ग ड चे १३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. शिवाय स्वतंत्र दंत विभाग व स्त्रियांसाठी स्वतंत्र सोय असणार आहे.

रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. रुग्णांसह त्यांच्याबरोबर असणाऱ्या नातेवाईकांना राहण्याची सुविधा असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीचे उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे तर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करणे सुलभ व वेळेत होणार आहे. या उपजिल्हा रुग्णालयमुळे टेंभुर्णी शहराच्या वैभवात भर पडणार असून, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

यामुळे प्रश्न लागला मार्गी

टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी जनआंदोलन उभारले होते. या मागणीस पाठिंबा देऊन आमदार बबनराव शिंदे यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला होता. यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रश्न मार्गी लागला आहे.