शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

बार्शीत दहा दिवसांसाठी कडक जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST

बार्शी शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, तसेच ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व लसींचा असलेला तुटवडा पाहून ...

बार्शी शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, तसेच ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व लसींचा असलेला तुटवडा पाहून सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांच्याशी विचारविनिमय करून,बार्शी शहर तालुक्यात किराणा दुकानासह सर्व उद्योग, बाजार समिती, भाजी मंडई बंद ठेऊन कडक लॉक डाऊन करण्यावर एकमत झाले. ही अंमलबजावणी मंगळवारी रात्रीपासून करण्यात येत असल्याचे आ. राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, विलास रेणके, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, गटविकास अधिकारी शेखर सावंत, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तालुका पोलीस स्टेशनचे शिवाजी जायपात्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे आदी उपस्थित होते.

बार्शीत सुसज्ज यंत्रणा असताना रुग्णसंख्या वाढत आहे. पाच दिवसात केवळ २० रेमडेसिविर मिळाली आहेत. ऑक्सिजन चा तुटवडा आहे. लस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात. पैसा हा गौण आहे, उद्योगधंदेही पुन्हा सुरू होतील. पण उपचारासाठी जीव जाणे हे पाहवत नाही. त्यामुळे आपण दहा दिवस सर्व व्यवहार बंद ठेवावेत. लॉकडाऊन नाही पाळला तर दहा दिवसाने काय अवस्था होईल. याचा विचार करवत नाही, असे आ. राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.

नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे म्हणाले की, परिस्थिती विदारक आहे. माणसांचे जीव वाचवणे काळाची गरज आहे. प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत स्थानिक प्रशासनाला दिलेल्या अधिकारातून निर्णय घेऊन आदेश पारित करावे. बेड मिळत नसल्यामुळे लोक पॅनिक झाले आहेत. या काळात तपासण्या वाढवाव्यात. हा लॉकडाऊन म्हणजे बार्शीकरांनी बार्शीकरांसाठी घेतलेला निर्णय आहे. यावेळी अजित कुंकुलोळ व काही नगरसेवकांनी सूचना केल्या.

----

भाजीपाला फिरुन विक्रीस मान्यता

या दहा दिवसांत भाजीपाला आणि फळे गावात फिरून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणताही उद्योग सुरु राहणार नाही. बाजार समिती बंद राहील. शेतीपूरक सर्व आस्थापना बंद राहतील. सर्वसामान्यासाठी पेट्रोल पंप ११ वाजेपर्यंत सुरू राहतील.

----