शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: May 21, 2014 01:11 IST

संघर्ष समिती : लढा आणखी तीव्र करणार

दक्षिण सोलापूर: सीना नदीत उजनीतील पाणी सोडून १६ बंधारे भरुन घेण्याच्या मागणीसाठी सीना नदी पाणी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आवारात आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यापूर्वी ३ एप्रिल रोजी सोडलेले पाणी आठवडाभरात संपल्याने सीना नदीकाठचे बंधारे कोरडे पडले आहेत. सध्या पिके करपत असल्याने संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी वडकबाळ येथे एकत्र आले. त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला. विलास लोकरे, शिवानंद वरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये ठिय्या मांडला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तेथे आले आणि त्यांनी पाठिंब्यासाठी पोर्चमध्ये ठिय्या मारला. तासाभराने शेतकरी जलसंपदा कार्यालयाकडे गेले. अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. यावेळी अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील तेथे धावून आले. त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्याशी मोबाईलवरुन स्थितीची माहिती दिली आणि सीनेत पाणी सोडण्याची मागणी केली. अधिकार्‍यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.