शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जवळून जाणारे पाणी अन‌् जळणाऱ्या पिकांमुळे लागतोय पाणीचोरीचा कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून ब्रिटिश काळात नीरा उजवा कालवा कार्यान्वित झाला. बागायती जमिनीचे ...

शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून ब्रिटिश काळात नीरा उजवा कालवा कार्यान्वित झाला. बागायती जमिनीचे क्षेत्र तुटपुंजे होते. पुढे कालवाकाठच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. साहजिकच जवळून पाणी जात असतानाही अनेक पिकांना तिलांजली मिळत आहे. त्यामुळे शेतकरी पाणी व्यवस्थापनाच्या मदतीने अवैधरीत्या पैसे देऊन शेतीला पाणी घेतो. मात्र, नियमानुसार ही चोरी ठरल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर पाणीचोरीचे गुन्हे व दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गरजू शेतकऱ्यांना पर्यायच नाही

पाणीपट्टी मागणीपेक्षा विनामागणी पाण्याला मिळणारे प्राधान्य, गरजू, नव्या शेतकऱ्यांना पाणी उपशासाठी न मिळणारे परवाने, रोटेशननुसार पाणी मिळेपर्यंत पिकाची होणारी जाळपोळ, पाणी व्यवस्थापन संस्थेची उदासीनता, कालव्याची दुरवस्था, त्यामुळे संगनमताने अथवा जास्त पैसे मोजून चोरीचे पाणी शेतकऱ्याला घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.

कोट :::::::::::::::::::

तालुक्यात पाणी वाटपाबाबत धोरणात्मक नियोजन केले जात नाही. चोरी झालेल्या पाण्याच्या वसुलीचा मात्र भुर्दंड इतरांच्या माथी मारला जातो. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने पाणी घेतले की चोरीचा आळ ठरलेला आहे. यासाठी सरकारने नवी पॉलिसी विकसित करण्याची गरज आहे.

- बाळासाहेब सरगर

जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा