शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

जवळून जाणारे पाणी अन‌् जळणाऱ्या पिकांमुळे लागतोय पाणीचोरीचा कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून ब्रिटिश काळात नीरा उजवा कालवा कार्यान्वित झाला. बागायती जमिनीचे ...

शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून ब्रिटिश काळात नीरा उजवा कालवा कार्यान्वित झाला. बागायती जमिनीचे क्षेत्र तुटपुंजे होते. पुढे कालवाकाठच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. साहजिकच जवळून पाणी जात असतानाही अनेक पिकांना तिलांजली मिळत आहे. त्यामुळे शेतकरी पाणी व्यवस्थापनाच्या मदतीने अवैधरीत्या पैसे देऊन शेतीला पाणी घेतो. मात्र, नियमानुसार ही चोरी ठरल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर पाणीचोरीचे गुन्हे व दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गरजू शेतकऱ्यांना पर्यायच नाही

पाणीपट्टी मागणीपेक्षा विनामागणी पाण्याला मिळणारे प्राधान्य, गरजू, नव्या शेतकऱ्यांना पाणी उपशासाठी न मिळणारे परवाने, रोटेशननुसार पाणी मिळेपर्यंत पिकाची होणारी जाळपोळ, पाणी व्यवस्थापन संस्थेची उदासीनता, कालव्याची दुरवस्था, त्यामुळे संगनमताने अथवा जास्त पैसे मोजून चोरीचे पाणी शेतकऱ्याला घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.

कोट :::::::::::::::::::

तालुक्यात पाणी वाटपाबाबत धोरणात्मक नियोजन केले जात नाही. चोरी झालेल्या पाण्याच्या वसुलीचा मात्र भुर्दंड इतरांच्या माथी मारला जातो. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने पाणी घेतले की चोरीचा आळ ठरलेला आहे. यासाठी सरकारने नवी पॉलिसी विकसित करण्याची गरज आहे.

- बाळासाहेब सरगर

जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा