शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जवळून जाणारे पाणी अन‌् जळणाऱ्या पिकांमुळे लागतोय पाणीचोरीचा कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून ब्रिटिश काळात नीरा उजवा कालवा कार्यान्वित झाला. बागायती जमिनीचे ...

शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून ब्रिटिश काळात नीरा उजवा कालवा कार्यान्वित झाला. बागायती जमिनीचे क्षेत्र तुटपुंजे होते. पुढे कालवाकाठच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. साहजिकच जवळून पाणी जात असतानाही अनेक पिकांना तिलांजली मिळत आहे. त्यामुळे शेतकरी पाणी व्यवस्थापनाच्या मदतीने अवैधरीत्या पैसे देऊन शेतीला पाणी घेतो. मात्र, नियमानुसार ही चोरी ठरल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर पाणीचोरीचे गुन्हे व दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गरजू शेतकऱ्यांना पर्यायच नाही

पाणीपट्टी मागणीपेक्षा विनामागणी पाण्याला मिळणारे प्राधान्य, गरजू, नव्या शेतकऱ्यांना पाणी उपशासाठी न मिळणारे परवाने, रोटेशननुसार पाणी मिळेपर्यंत पिकाची होणारी जाळपोळ, पाणी व्यवस्थापन संस्थेची उदासीनता, कालव्याची दुरवस्था, त्यामुळे संगनमताने अथवा जास्त पैसे मोजून चोरीचे पाणी शेतकऱ्याला घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.

कोट :::::::::::::::::::

तालुक्यात पाणी वाटपाबाबत धोरणात्मक नियोजन केले जात नाही. चोरी झालेल्या पाण्याच्या वसुलीचा मात्र भुर्दंड इतरांच्या माथी मारला जातो. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने पाणी घेतले की चोरीचा आळ ठरलेला आहे. यासाठी सरकारने नवी पॉलिसी विकसित करण्याची गरज आहे.

- बाळासाहेब सरगर

जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा