शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

आर्थिक चक्रव्यूहात फसलेल्या अन्नदात्यावर ‘थकीत’चा कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत ...

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत आहे. यासाठी इतर सुविधांचा आसरा घेऊन शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये कर्ज शेती व शेती व्यवस्थापनासाठी वापरले. मात्र, निसर्ग, वीज, पाणी या गोष्टींच्या चक्रव्यूहात सापडलेल्या बळीराजाला बँकेच्या कर्ज परतफेडीपर्यंत पोहोचताच येईना. त्यामुळे पुन्हा बळीराजा कर्ज थकविणारा अथवा बुडव्या असा कलंक त्यांच्या माथी लागला जातो.

कृषी धोरणांमध्ये आधुनिक बदल करण्याची गरज तज्ज्ञांनी मांडली. मात्र, यासाठी भाग भांडवल आवश्यक असून, हा पैसा उभा करण्यासाठी बळीराजाची भ्रमंती सुरू झाली. अनेक बँका शेकडो शेतकऱ्यांना कर्जाच्या आशेने झुलवत ठेवतात. त्यामुळे आवश्यक त्यावेळी पैसा हाती न आल्यामुळे पुन्हा कृषी व्यवसाय नुकसानीकडे झुकला जातो. काही शेतकऱ्यांना मिळालेली गरजांची रक्कम विविध संकटांच्या तडाख्यात शेतकऱ्यांना परतफेड आवाक्‍याबाहेर जाते. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारची कर्ज थकीत अवस्थेत अडकून पडतात.

सावकाराचा घ्यावा लागतोय आसरा

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना उभारी देण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न करण्यात आले. यात सावकारी कर्जापासून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला. विविध शेतीपूरक व्यवसाय व शेतीसाठी पतपुरवठा केला. मात्र, याबाबत शेतकऱ्यांच्या नियोजनात विविध अडथळ्यांनी वर्चस्व दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण कमकुवत झाले. नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा सावकारी कर्जाची वाट धरू लागला आहे.

कोट ::::::::::::::::

कृषी व्यवसायात वीज, पाणी व भांडवल याबरोबर हमीभाव, निसर्गाची साथ अत्यंत महत्त्वाची बाब आहे, शिवाय पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना अमर्याद खर्च करावा लागतो. त्यामुळे सरकारने धोरणात्मक, दूरगामी उपाययोजनांचा अवलंब करण्याची गरज आहे.

- के.के. पाटील