शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आर्थिक चक्रव्यूहात फसलेल्या अन्नदात्यावर ‘थकीत’चा कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत ...

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत आहे. यासाठी इतर सुविधांचा आसरा घेऊन शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये कर्ज शेती व शेती व्यवस्थापनासाठी वापरले. मात्र, निसर्ग, वीज, पाणी या गोष्टींच्या चक्रव्यूहात सापडलेल्या बळीराजाला बँकेच्या कर्ज परतफेडीपर्यंत पोहोचताच येईना. त्यामुळे पुन्हा बळीराजा कर्ज थकविणारा अथवा बुडव्या असा कलंक त्यांच्या माथी लागला जातो.

कृषी धोरणांमध्ये आधुनिक बदल करण्याची गरज तज्ज्ञांनी मांडली. मात्र, यासाठी भाग भांडवल आवश्यक असून, हा पैसा उभा करण्यासाठी बळीराजाची भ्रमंती सुरू झाली. अनेक बँका शेकडो शेतकऱ्यांना कर्जाच्या आशेने झुलवत ठेवतात. त्यामुळे आवश्यक त्यावेळी पैसा हाती न आल्यामुळे पुन्हा कृषी व्यवसाय नुकसानीकडे झुकला जातो. काही शेतकऱ्यांना मिळालेली गरजांची रक्कम विविध संकटांच्या तडाख्यात शेतकऱ्यांना परतफेड आवाक्‍याबाहेर जाते. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारची कर्ज थकीत अवस्थेत अडकून पडतात.

सावकाराचा घ्यावा लागतोय आसरा

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना उभारी देण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न करण्यात आले. यात सावकारी कर्जापासून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला. विविध शेतीपूरक व्यवसाय व शेतीसाठी पतपुरवठा केला. मात्र, याबाबत शेतकऱ्यांच्या नियोजनात विविध अडथळ्यांनी वर्चस्व दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण कमकुवत झाले. नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा सावकारी कर्जाची वाट धरू लागला आहे.

कोट ::::::::::::::::

कृषी व्यवसायात वीज, पाणी व भांडवल याबरोबर हमीभाव, निसर्गाची साथ अत्यंत महत्त्वाची बाब आहे, शिवाय पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना अमर्याद खर्च करावा लागतो. त्यामुळे सरकारने धोरणात्मक, दूरगामी उपाययोजनांचा अवलंब करण्याची गरज आहे.

- के.के. पाटील