शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

आर्थिक चक्रव्यूहात फसलेल्या अन्नदात्यावर ‘थकीत’चा कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत ...

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत आहे. यासाठी इतर सुविधांचा आसरा घेऊन शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये कर्ज शेती व शेती व्यवस्थापनासाठी वापरले. मात्र, निसर्ग, वीज, पाणी या गोष्टींच्या चक्रव्यूहात सापडलेल्या बळीराजाला बँकेच्या कर्ज परतफेडीपर्यंत पोहोचताच येईना. त्यामुळे पुन्हा बळीराजा कर्ज थकविणारा अथवा बुडव्या असा कलंक त्यांच्या माथी लागला जातो.

कृषी धोरणांमध्ये आधुनिक बदल करण्याची गरज तज्ज्ञांनी मांडली. मात्र, यासाठी भाग भांडवल आवश्यक असून, हा पैसा उभा करण्यासाठी बळीराजाची भ्रमंती सुरू झाली. अनेक बँका शेकडो शेतकऱ्यांना कर्जाच्या आशेने झुलवत ठेवतात. त्यामुळे आवश्यक त्यावेळी पैसा हाती न आल्यामुळे पुन्हा कृषी व्यवसाय नुकसानीकडे झुकला जातो. काही शेतकऱ्यांना मिळालेली गरजांची रक्कम विविध संकटांच्या तडाख्यात शेतकऱ्यांना परतफेड आवाक्‍याबाहेर जाते. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारची कर्ज थकीत अवस्थेत अडकून पडतात.

सावकाराचा घ्यावा लागतोय आसरा

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना उभारी देण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न करण्यात आले. यात सावकारी कर्जापासून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला. विविध शेतीपूरक व्यवसाय व शेतीसाठी पतपुरवठा केला. मात्र, याबाबत शेतकऱ्यांच्या नियोजनात विविध अडथळ्यांनी वर्चस्व दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण कमकुवत झाले. नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा सावकारी कर्जाची वाट धरू लागला आहे.

कोट ::::::::::::::::

कृषी व्यवसायात वीज, पाणी व भांडवल याबरोबर हमीभाव, निसर्गाची साथ अत्यंत महत्त्वाची बाब आहे, शिवाय पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना अमर्याद खर्च करावा लागतो. त्यामुळे सरकारने धोरणात्मक, दूरगामी उपाययोजनांचा अवलंब करण्याची गरज आहे.

- के.के. पाटील