शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

जिल्हाधिकार्‍यांचा शाळेत मुक्काम

By admin | Updated: May 25, 2014 00:43 IST

ग्रामस्थांशी संवाद: समस्यांवर चर्चा

टेंभुर्णी: जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले जावेत, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी उजनी (टें) येथील जि. प. शाळेत मुक्काम ठोकून ग्रामस्थांशी संवाद साधला व लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देऊन जनतेला दिलासा दिला. दोन तास साधला संवाद जिल्हाधिकारी गेडाम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजता उजनी (टें.) गावात आगमन झाले. प्रांताधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार रमेश शेंडगे त्यांच्यासमवेत होते. महसूल, कृषी, विद्युत, खात्याचे अधिकारी अगोदर हजर होते. सव्वानऊ वाजता गेडाम यांनी उजनी (टें) ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पाटील यांनी उजनी या विस्थापित गावाबद्दल माहिती देऊन येथील जनतेच्या मूलभूत प्रश्नांबद्दल वाचा फोडली. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी लोकांना प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तास ही चर्चा सुरु होती. यातून त्यांनी विविध स्तरावरील माहिती जाणून घेतली. गावातील मुले शिक्षणासाठी कोठे जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडते का?, गावात किती ट्रॅक्टर आहेत, सिंचनाची सोय काय आहे, ठिबक सिंचन केले आहे का?, गावात दारुभट्ट्या आहेत काय? असे प्रश्न विचारुन गेडाम यांनी ग्रामस्थांना बोलते केले. ग्रामस्थांनी केल्या मागण्या उजनी धरणाच्या बांधकामासाठी लागणारा दगड काढण्यासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनी त्याच शेतकर्‍यांना परत कराव्यात, दारिद्र्यरेषेखालील लोकांचा सर्व्हे २००७ साली झाला आहे; परंतु अद्याप यादीच तयार झाली नाही. ती त्वरित तयार करावी, १५ वर्षांपूर्वी दिलेले रेशनकार्ड सध्या जीर्ण झाली आहेत ती नवीन देण्यात यावीत, १९९४ साली दिलेल्या मतदान कार्डावरील चेहरे आता ओळखता येत नाहीत ती नव्याने देण्यात यावीत, उजनी धरणाच्या निर्मितीसाठी उजनी (टें) गाव पूर्णपणे विस्थापित झाले आहे. येथील लोकांचा त्याग मोठा आहे याच धरणातून सोलापूर येथील एन. टी. पी. सी. मध्ये येथील बेरोजगार तरुणांना संधी देण्यात यावी, या मागण्यांवर जिल्हाधिकार्‍यांनी विचार करुन यशस्वी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी चर्चेद्वारे केली.

------------------------

महिलांना सामावून घ्या

बैठकीला महिलांची उपस्थिती नगण्य होती. उजनीच्या सरपंच महिला असूनही उपस्थिती कमी असल्याचे डॉ. गेडाम म्हणाले. ग्रामसभा व इतर कार्यक्रमात महिलांना मोठ्या प्रमाणावर सामावून घ्या. त्यांचे सबलीकरण विकासासाठी महत्त्वाचे आहे.

---------------------------------

रेशन दुकानाची तपासणी

रात्री ११ वाजता बैठक आटोपल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शाळेतच मुक्काम ठोकला. शनिवारी पहाटे पाचला उठून थंड पाण्यानेच आंघोळ केली. सहा वाजता येथील रेशन दुकानाचे दफ्तर तपासले आणि गावकर्‍यांचा निरोप घेतला.