शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पाण्यासाठी उपोषण ही राजकीय स्टंटबाजी

By admin | Updated: June 2, 2014 00:33 IST

माजी आमदार शहाजी पाटील यांचा आरोप

सांगोला : टेंभू व म्हैसाळचे पाणी बुद्धेहाळ तलाव व माण कोरडा नदीत सोडणे संदर्भात सांगोला तालुक्यातील दोन आमदार मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, ही जनतेची निव्वळ फसवणूक असून, येणारी विधानसभा निवडणूक समोर ठेवून केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे, असा आरोप माजी आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. युती सरकारने १९९५-९६ साली दुष्काळी भागातील सर्व आमदारांच्या तीव्र मागणीनुसार टेंभू व म्हैसाळ या योजना तातडीने मंजूर केल्या. एवढेच नव्हे तर कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती करुन, मोठा निधी उपलब्ध केला व तातडीने सर्व कामे चालू केली. दुर्दैवाने १९९९ नंतर या कामांची गती गोगलगायप्रमाणे संथ सुरु झाली. त्यामुळे सांगोला तालुक्याचा कायापालट करणारी ही योजना गेली १५ वर्षे पूर्ण होऊ शकली नाही. टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्यात येऊन ४ महिने होत आहेत, तरीही सांगोला तालुका वंचितच आहे. करगणीच्या ओढ्यातून ३ महिन्यांपूर्वीच हे पाणी बुद्धेहाळच्या तलावात सोडणे आवश्यक होते, परंतु आमच्या फार मोठ्या प्रयत्नाने हे पाणी आले, असा आभास निर्माण करण्यासाठी बुद्धेहाळ कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले़ आता हा स्टंटबाजीचा देखावा निर्माण करुन दोन आमदार उपोषण करीत आहेत. वास्तविक आटपाडी तालुक्याला पाणी सोडण्याच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगोला तालुक्याला पाणी देण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले होते. पाणी सोडण्यास परवानगी द्यावी, असा सांगली कार्यालयाचा अहवाल कृष्णा खोरेचे अधिकारी उपासे यांच्याकडे सादरही झालेला आहे. पाटील यांनी म्हटले आहे

. ----------

मुख्यमंत्र्यांना भेटणार पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरिता सोमवार, २ जून रोजी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ भेटणार आहे. गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री दिल्लीत असल्याने भेट होऊ शकली नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.