शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी उपोषण ही राजकीय स्टंटबाजी

By admin | Updated: June 2, 2014 00:33 IST

माजी आमदार शहाजी पाटील यांचा आरोप

सांगोला : टेंभू व म्हैसाळचे पाणी बुद्धेहाळ तलाव व माण कोरडा नदीत सोडणे संदर्भात सांगोला तालुक्यातील दोन आमदार मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, ही जनतेची निव्वळ फसवणूक असून, येणारी विधानसभा निवडणूक समोर ठेवून केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे, असा आरोप माजी आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. युती सरकारने १९९५-९६ साली दुष्काळी भागातील सर्व आमदारांच्या तीव्र मागणीनुसार टेंभू व म्हैसाळ या योजना तातडीने मंजूर केल्या. एवढेच नव्हे तर कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती करुन, मोठा निधी उपलब्ध केला व तातडीने सर्व कामे चालू केली. दुर्दैवाने १९९९ नंतर या कामांची गती गोगलगायप्रमाणे संथ सुरु झाली. त्यामुळे सांगोला तालुक्याचा कायापालट करणारी ही योजना गेली १५ वर्षे पूर्ण होऊ शकली नाही. टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्यात येऊन ४ महिने होत आहेत, तरीही सांगोला तालुका वंचितच आहे. करगणीच्या ओढ्यातून ३ महिन्यांपूर्वीच हे पाणी बुद्धेहाळच्या तलावात सोडणे आवश्यक होते, परंतु आमच्या फार मोठ्या प्रयत्नाने हे पाणी आले, असा आभास निर्माण करण्यासाठी बुद्धेहाळ कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले़ आता हा स्टंटबाजीचा देखावा निर्माण करुन दोन आमदार उपोषण करीत आहेत. वास्तविक आटपाडी तालुक्याला पाणी सोडण्याच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगोला तालुक्याला पाणी देण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले होते. पाणी सोडण्यास परवानगी द्यावी, असा सांगली कार्यालयाचा अहवाल कृष्णा खोरेचे अधिकारी उपासे यांच्याकडे सादरही झालेला आहे. पाटील यांनी म्हटले आहे

. ----------

मुख्यमंत्र्यांना भेटणार पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरिता सोमवार, २ जून रोजी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ भेटणार आहे. गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री दिल्लीत असल्याने भेट होऊ शकली नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.