शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासन पैसे जमा करीत नसल्याने शेतकऱ्यांचे साडेचार कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST

शेतकरी पीक विम्यापोटी रक्कम भरतात. शेतकऱ्यांच्या हिस्स्याची रक्कम जमा झाली की त्यानुसार केंद्र सरकार व राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम ...

शेतकरी पीक विम्यापोटी रक्कम भरतात. शेतकऱ्यांच्या हिस्स्याची रक्कम जमा झाली की त्यानुसार केंद्र सरकार व राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा होते. केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा जमा झाला तरच विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊ शकते. गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत संततधार व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विमा कंपनीच्या नियमानुसार नैसर्गिक आपत्ती आल्यास तत्काळ फोनद्वारे किंवा अर्जाद्वारे कृषी खात्याकडे कळविणे आवश्यक आहे.

संततधार व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची रीतसर माहिती शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे ऑक्टोबर महिन्यात कळविली होती. त्यानुसार कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पिकाची पाहणी केली व आलेल्या अर्जातून पात्र, अपात्र शेतकरी ठरविले आहेत. पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना विम्यापोटी ४ कोटी ४६ लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीने मंजूर केली आहे. मात्र, राज्य शासनाचा हिस्सा जमा होत नसल्याने शेतकऱ्यांना विम्याची नुकसानभरपाई मिळू शकत नाही.

तालुकानिहाय शेतकरी संख्या

अक्कलकोट ५४०, बार्शी ५,३३३, माढा व मंगळवेढा प्रत्येकी ११, मोहोळ २९, उत्तर तालुका १९० व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३७५ असे ६,४८९ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ४६ लाख रुपये मंजूर आहेत. अपात्रमध्ये प्रामुख्याने बार्शी, अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी आहेत. मागील खरीप पिकांसाठी दोन लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी १ लाख ८९ हजार ८१६ हेक्टर पीक नुकसानीपोटी १० कोटी ३४ लाख ६४ हजार रुपये इतकी रक्कम भरली होती. आता यातील फोन व अर्जाद्वारे पात्र ४७,५३१ शेतकरी वगळता उर्वरित शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या अहवालाच्या आधारे नुकसानभरपाई अवलंबून आहे.

जिल्ह्यातील ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याचे कळविले.

विमा कंपनीने ४७ हजार ५३१ शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र, तर ८,३२० शेतकरी अपात्र ठरविले.

४१ हजार ४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३४ कोटी ७७ लाख रुपये तीन महिन्यांपूर्वी जमा झाले.

पात्र ६,४८९ शेतकरऱ्यांना ४ कोटी ४६ लाख रुपये मंजूर असले तरी शासन हिस्सा जमा होत नसल्याने त्यांना पैसे मिळत नाहीत.