शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By admin | Updated: March 18, 2017 20:08 IST

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुखसोलापूर : सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सर्वांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सर्वसमावेश अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. या अर्थसंकल्पात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या अधिक बळकट करण्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतातून शेतमाल काढल्यानंतर तातडीने आडत्याला विकण्याऐवजी तो तारण ठेवून, पैशांची गरज भागावी आणि बाजारपेठेतील गरजेनुसार शेतमालाला योग्य आणि वाजवी दर मिळावा या उद्देशाने शेतमाल तारण योजनेसाठी ५० कोटी, आणि ग्रो मार्केटसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मिलवाईज निर्यात कोठा पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांना सन २०१५-१६ चा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित होते. केंद्र शासनाने साखर कारखान्याबाबतचे निर्यात कोटा धोरण मागे घेतले असल्याने सन २०१५-१६ या वषार्साठी नियार्तीची अट असणार नाही. शेतकऱ्यांना रास्त किफायतशीर भाव देता यावेत. याकरिता सन २०१५-१६ आणि २०१५-१६ साखर कारखान्यांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दोन्ही वषार्चा एकत्रित विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देण्याकरीता कारखान्यांकडे रु.७०० कोटी उपलब्ध होणार आहेत, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर कोकणात काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून नवीन गोदाम बांधकामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. एकंदरीत उद्योग, व्यवसाय, शिक्षण, शेती व रोजगार यासाठी सरकारने भरघोस निधी दिला आहे. राज्याचा विकासदर वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यातील ८२ हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्धारसुद्धा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न दुपट्ट वाढवून कर्जमुक्त करण्याचे स्वप्न सरकारचे आहे. सोलापूर विमानतळाचा विकास आणि सोलापुरी चादर व टॉवेल करमुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूरच्या रोजगाराला व विकासाला चालना मिळणार आहे. एकूणच अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करून व शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून झुकते माप दिले आहे. अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून स्वागतार्ह आहे.