शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By admin | Updated: March 18, 2017 20:08 IST

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुखसोलापूर : सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सर्वांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सर्वसमावेश अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. या अर्थसंकल्पात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या अधिक बळकट करण्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतातून शेतमाल काढल्यानंतर तातडीने आडत्याला विकण्याऐवजी तो तारण ठेवून, पैशांची गरज भागावी आणि बाजारपेठेतील गरजेनुसार शेतमालाला योग्य आणि वाजवी दर मिळावा या उद्देशाने शेतमाल तारण योजनेसाठी ५० कोटी, आणि ग्रो मार्केटसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मिलवाईज निर्यात कोठा पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांना सन २०१५-१६ चा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित होते. केंद्र शासनाने साखर कारखान्याबाबतचे निर्यात कोटा धोरण मागे घेतले असल्याने सन २०१५-१६ या वषार्साठी नियार्तीची अट असणार नाही. शेतकऱ्यांना रास्त किफायतशीर भाव देता यावेत. याकरिता सन २०१५-१६ आणि २०१५-१६ साखर कारखान्यांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दोन्ही वषार्चा एकत्रित विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देण्याकरीता कारखान्यांकडे रु.७०० कोटी उपलब्ध होणार आहेत, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर कोकणात काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून नवीन गोदाम बांधकामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. एकंदरीत उद्योग, व्यवसाय, शिक्षण, शेती व रोजगार यासाठी सरकारने भरघोस निधी दिला आहे. राज्याचा विकासदर वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यातील ८२ हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्धारसुद्धा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न दुपट्ट वाढवून कर्जमुक्त करण्याचे स्वप्न सरकारचे आहे. सोलापूर विमानतळाचा विकास आणि सोलापुरी चादर व टॉवेल करमुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूरच्या रोजगाराला व विकासाला चालना मिळणार आहे. एकूणच अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करून व शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून झुकते माप दिले आहे. अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून स्वागतार्ह आहे.