शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदात्यावर येतोय चोरीचा डाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST

एल. डी. वाघमोडे माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात ...

एल. डी. वाघमोडे

माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात वीज चोरी, पाणीचोरी, बँकेचे कर्ज थकविल्याचे गुन्हे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस बळिराजा अडकत चालला आहे. यामध्ये बळिराजाला अभय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

या बाबतीत शेतीमालाला उपलब्ध होणाऱ्या खात्रीच्या बाजारपेठ, शेतीपूरक व्यवसायांना विशेष प्राधान्य, वीज व पाणी या बाबतीत योग्य पैशाची आकारणी अशा महत्त्वाच्या गोष्टींकडेे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

कृषी व्यवसाय तालुक्यातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, या व्यवसायावर नैसर्गिक आघातांबरोबर राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून पक्ष आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर, समांतर पाईपलाईन, औद्योगिक वसाहत व रेल्वे मार्ग अशा महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मृगजळावर कृषी व्यवसाय किती दिवस तग धरणार? घाम गाळूनही चोरीचा कलंक आणखी किती दिवस कपाळी मिरवावा लागणार? असाही सूर बळिराजामधून विचारला जाऊ लागला आहे.

----

कृषी उत्पन्नांची अनिश्चितता, नैसर्गिक संकटांचा आघात, बेभरवशाची कृषी धोरणे, शेतीशी निगडित क्षेत्रातील अधिकारी व लोकप्रतिनिधींची मनमानी व ध्येय धोरणे अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी जाऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. बळिराजाच्या माथी लागत असलेला कलंक कृषी व्यवसायाची धोक्याची घंटा आहे हे ओळखण्याची गरज आहे.

- बाजीराव काटकर, सरपंच धर्मपुरी