शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अन्नदात्यावर येतोय चोरीचा डाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST

एल. डी. वाघमोडे माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात ...

एल. डी. वाघमोडे

माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात वीज चोरी, पाणीचोरी, बँकेचे कर्ज थकविल्याचे गुन्हे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस बळिराजा अडकत चालला आहे. यामध्ये बळिराजाला अभय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

या बाबतीत शेतीमालाला उपलब्ध होणाऱ्या खात्रीच्या बाजारपेठ, शेतीपूरक व्यवसायांना विशेष प्राधान्य, वीज व पाणी या बाबतीत योग्य पैशाची आकारणी अशा महत्त्वाच्या गोष्टींकडेे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

कृषी व्यवसाय तालुक्यातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, या व्यवसायावर नैसर्गिक आघातांबरोबर राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून पक्ष आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर, समांतर पाईपलाईन, औद्योगिक वसाहत व रेल्वे मार्ग अशा महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मृगजळावर कृषी व्यवसाय किती दिवस तग धरणार? घाम गाळूनही चोरीचा कलंक आणखी किती दिवस कपाळी मिरवावा लागणार? असाही सूर बळिराजामधून विचारला जाऊ लागला आहे.

----

कृषी उत्पन्नांची अनिश्चितता, नैसर्गिक संकटांचा आघात, बेभरवशाची कृषी धोरणे, शेतीशी निगडित क्षेत्रातील अधिकारी व लोकप्रतिनिधींची मनमानी व ध्येय धोरणे अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी जाऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. बळिराजाच्या माथी लागत असलेला कलंक कृषी व्यवसायाची धोक्याची घंटा आहे हे ओळखण्याची गरज आहे.

- बाजीराव काटकर, सरपंच धर्मपुरी