शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

अन्नदात्यावर येतोय चोरीचा डाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST

एल. डी. वाघमोडे माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात ...

एल. डी. वाघमोडे

माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात वीज चोरी, पाणीचोरी, बँकेचे कर्ज थकविल्याचे गुन्हे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस बळिराजा अडकत चालला आहे. यामध्ये बळिराजाला अभय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

या बाबतीत शेतीमालाला उपलब्ध होणाऱ्या खात्रीच्या बाजारपेठ, शेतीपूरक व्यवसायांना विशेष प्राधान्य, वीज व पाणी या बाबतीत योग्य पैशाची आकारणी अशा महत्त्वाच्या गोष्टींकडेे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

कृषी व्यवसाय तालुक्यातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, या व्यवसायावर नैसर्गिक आघातांबरोबर राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून पक्ष आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर, समांतर पाईपलाईन, औद्योगिक वसाहत व रेल्वे मार्ग अशा महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मृगजळावर कृषी व्यवसाय किती दिवस तग धरणार? घाम गाळूनही चोरीचा कलंक आणखी किती दिवस कपाळी मिरवावा लागणार? असाही सूर बळिराजामधून विचारला जाऊ लागला आहे.

----

कृषी उत्पन्नांची अनिश्चितता, नैसर्गिक संकटांचा आघात, बेभरवशाची कृषी धोरणे, शेतीशी निगडित क्षेत्रातील अधिकारी व लोकप्रतिनिधींची मनमानी व ध्येय धोरणे अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी जाऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. बळिराजाच्या माथी लागत असलेला कलंक कृषी व्यवसायाची धोक्याची घंटा आहे हे ओळखण्याची गरज आहे.

- बाजीराव काटकर, सरपंच धर्मपुरी