शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अन्नदात्यावर येतोय चोरीचा डाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST

एल. डी. वाघमोडे माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात ...

एल. डी. वाघमोडे

माळशिरस : तालुक्यातील सुपीक जमीन व चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून ख्याती होती. मात्र, सध्या तालुक्यात वीज चोरी, पाणीचोरी, बँकेचे कर्ज थकविल्याचे गुन्हे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस बळिराजा अडकत चालला आहे. यामध्ये बळिराजाला अभय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

या बाबतीत शेतीमालाला उपलब्ध होणाऱ्या खात्रीच्या बाजारपेठ, शेतीपूरक व्यवसायांना विशेष प्राधान्य, वीज व पाणी या बाबतीत योग्य पैशाची आकारणी अशा महत्त्वाच्या गोष्टींकडेे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

कृषी व्यवसाय तालुक्यातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, या व्यवसायावर नैसर्गिक आघातांबरोबर राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून पक्ष आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण, नीरा देवधर, समांतर पाईपलाईन, औद्योगिक वसाहत व रेल्वे मार्ग अशा महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मृगजळावर कृषी व्यवसाय किती दिवस तग धरणार? घाम गाळूनही चोरीचा कलंक आणखी किती दिवस कपाळी मिरवावा लागणार? असाही सूर बळिराजामधून विचारला जाऊ लागला आहे.

----

कृषी उत्पन्नांची अनिश्चितता, नैसर्गिक संकटांचा आघात, बेभरवशाची कृषी धोरणे, शेतीशी निगडित क्षेत्रातील अधिकारी व लोकप्रतिनिधींची मनमानी व ध्येय धोरणे अशा अनेक गोष्टींच्या मुळाशी जाऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. बळिराजाच्या माथी लागत असलेला कलंक कृषी व्यवसायाची धोक्याची घंटा आहे हे ओळखण्याची गरज आहे.

- बाजीराव काटकर, सरपंच धर्मपुरी