शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विशिष्ट हेतूनं आलेलं सरकार घालवा: हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:22 IST

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगाव, कासेगावसह मंगळवेढा तालुक्यांतील काही गावांमध्ये हर्षवर्धन पाटील ...

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगाव, कासेगावसह मंगळवेढा तालुक्यांतील काही गावांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी प्रचारसभा घेतल्या. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार समाधान आवताडे, भाजपचे संघटनमंत्री बाळा भेगडे, सुनील सर्वगोड, माउली हळणवर यांच्यासह घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हक्काच्या वीज, पाणी प्रश्नांवर राजकारण करीत आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे. सरकारमधील कोणत्याही गोष्टीमध्ये एकवाक्यता नाही. तर अधिकारी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करतात. रोहित्रे उतरवून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. पाणीप्रश्नावर राज्य सरकार याच न्यायाने वागत असल्याने राज्यातील सर्वसामान्य जनता, नागरिक सरकारच्या विरोधात वैतागले असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.

----

सरकारमधील बेबनावामुळे मंत्री घरी बसले

राज्य सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्ट आहेत. म्हणूनच त्यांच्याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या जात आहेत. त्याची दखल घेऊन न्यायालयाकडूनही चौकशी आयोग नेमून चौकशा केल्या जात आहेत. हा प्रकार मागील सरकारच्या काळात कधीही घडला नाही. सरकारमध्ये असलेल्या या बेबनावमुळे अनेक मंत्र्यांना घरी बसावे लागत असून त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उठत आहे. राज्याचा विकासाचा गाडा थांबला आहे, तो पुन्हा रुळांवर आणायचा असेल तर हे सरकार घालवले पाहिजे, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.