शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

विशिष्ट हेतूनं आलेलं सरकार घालवा: हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:22 IST

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगाव, कासेगावसह मंगळवेढा तालुक्यांतील काही गावांमध्ये हर्षवर्धन पाटील ...

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गादेगाव, कासेगावसह मंगळवेढा तालुक्यांतील काही गावांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी प्रचारसभा घेतल्या. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार समाधान आवताडे, भाजपचे संघटनमंत्री बाळा भेगडे, सुनील सर्वगोड, माउली हळणवर यांच्यासह घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हक्काच्या वीज, पाणी प्रश्नांवर राजकारण करीत आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे. सरकारमधील कोणत्याही गोष्टीमध्ये एकवाक्यता नाही. तर अधिकारी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करतात. रोहित्रे उतरवून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. पाणीप्रश्नावर राज्य सरकार याच न्यायाने वागत असल्याने राज्यातील सर्वसामान्य जनता, नागरिक सरकारच्या विरोधात वैतागले असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.

----

सरकारमधील बेबनावामुळे मंत्री घरी बसले

राज्य सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्ट आहेत. म्हणूनच त्यांच्याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या जात आहेत. त्याची दखल घेऊन न्यायालयाकडूनही चौकशी आयोग नेमून चौकशा केल्या जात आहेत. हा प्रकार मागील सरकारच्या काळात कधीही घडला नाही. सरकारमध्ये असलेल्या या बेबनावमुळे अनेक मंत्र्यांना घरी बसावे लागत असून त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उठत आहे. राज्याचा विकासाचा गाडा थांबला आहे, तो पुन्हा रुळांवर आणायचा असेल तर हे सरकार घालवले पाहिजे, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.