शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

वाखरी पालखी तळावरील कामांना गती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात होणार ...

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात होणार असला तरी या सोहळ्यासाठी वाखरी पालखी तळावर येणाऱ्या मानाच्या प्रमुख दहा पालख्या व त्यामधील भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.

स्वच्छता, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, चौथऱ्यांची दुरुस्ती ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

प्रत्येक वर्षी वाखरी पालखी तळावर सर्व प्रमुख संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. त्यासाठी प्रशासनाची मोठी तयारी असते. प्रत्येक वर्षी पायी चालत येणारे पालखी सोहळे गतवर्षीपासून मानाच्या संतांच्या पादुका घेऊन एसटी बसने वाखरीत येत आहेत. त्या ठिकाणी विसावा, भोजन, भजन कीर्तन झाल्यानंतर हे सर्व प्रातिनिधिक मोजके वारकरी पादुका घेऊन पंढरपूरला किमान ५ किमी चालत जाणार आहेत.

वाखरी पालखी तळावर काटेरी झुडपे तोडने, गवत काढून स्वच्छता केली जात आहे. पालखी तळावर पाणीपुरवठ्यासाठी असलेली स्टँडपोस्ट दुरुस्त केली जात आहेत. हायमास्ट दिवे सुरू केले आहेत. मानाच्या पालख्यांसाठी स्वतंत्र मंडप तयार केले जात आहेत. ज्या ठिकाणी चिखल होण्याची शक्यता आहे, आशा ठिकाणी कचखडी टाकली जाणार आहे. आजूबाजूच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून ते दुरुस्त केले जात आहेत. येत्या दोन-तीन दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पालखी तळावर २४ तास पोलिसांची गस्त

पालखी तळाला बॅरिकेडिंगने बंदिस्त करण्यात आले आहे. तळावर स्वच्छता करून हायमास्ट दिवे सुरू करण्यात आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांकडून टप्प्याटप्प्याने गस्त ासुरू केली आहे.

--

फोटो :

वाखरी पालखी तळावर वीज वितरणकडून हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती सुरू आहे.