शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

अवघी ४४ टक्के पेरणी

By admin | Updated: October 23, 2014 14:38 IST

उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

अरुण बारसकर ■ सोलापूर

 
उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे; मात्र परतीचा पाऊस पडला नसल्याने पेरणी झालेल्या उगवणीवर परिणाम होणार असल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती बागायती बिनभरवशाची झाली आहे. सीना नदीकाठच्या गावातील शेती बागायती करण्यासाठी मोठा खर्च करुनही नदीत बारमाही पाणी नसल्याने पिके अडचणीत येत आहेत. सीनेत कधी तरी पाणी असते. बंधारे असूनही पाण्याअभावी कोरडे असतात. त्यामुळे नदीकाठची शेतीही भरवशाची राहिली नाही. नदीकाठची पाच-सहा गावे वगळली तर अन्य गावे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पावसावर अवलंबून असलेली शेती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अडचणीची ठरणार आहे. पूर्ण पावसाळ्यात तालुक्यात ७५ टक्के पाऊस पडला असला तरी तो सर्वत्र नाही. 
एकाचवेळी धो-धो पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेले अन् महिनाभरात उन्हाळ्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात रब्बी ज्वारीची पेरणी उशिराच सुरू होते. उशिरा सुरु होणार्‍या पेरणीने यावर्षी परतीचा पाऊस न पडल्याने म्हणावा तसा वेग घेतला नाही. अवघ्या ४४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. यावर्षी संपूर्ण क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता नाही. संपूर्ण पावसाळ्यात एकाच आठवड्यात काही भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडला. खरीप पेरणीवेळी व नंतर पाऊस न पडल्याने खरीप पिकांना पोषक वातावरण राहिले नाही. परतीचा पाऊस न पडल्याने रब्बी पेरणी व उगवणीवर परिणाम होणार आहे.
- एम. वाय.साठे, तालुका कृषी अधिकारी 
अशी आहे स्थिती.. 
■ रब्बी पेरणी झालेले क्षेत्र- १७२.३१ हेक्टर
■ ज्वारी, मका, सूर्यफुल आदींचा समावेश
■ उत्तर तालुक्याचा सरासरी पाऊस- ५४२ मि.मी.
■ प्रत्यक्षात पडलेला पाऊस- ३८३ मि.मी.
■ मागील वर्षी पडलेला पाऊस- ५२८ मि.मी. पेरणीचे क्षेत्र कमी होतेय 
■ ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर, मूग, मटकी यासारखी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल नाही. कमी पाण्यावर कमी दिवसात चार पैसे मिळतील अशी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. यामुळेच रब्बीचे क्षेत्र कमी होत आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी झाले असले तरी उशिरा गहू व हरभर्‍याची काही क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे.