शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

दमदार पावसाने सोलापूर जिल्हा पाणीदार, ३० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:20 IST

काही वर्षांनंतर पडलेल्या दमदार पावसाने जमिनीत तर पाणी मोठ्या प्रमाणात मुरलेच शिवाय मध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. मध्यम व लघू असे ३० प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात यंदा ४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली होतीमध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा लघू प्रकल्पात पाणीसाठा ५६.९१ टक्के इतका झालासात तलावाची पाणी पातळी ७८.११ टक्के इतकी झालीबार्शी तालुक्यातील शेळगाव हा एकमेव तलाव कोरडा

अरुण बारसकरसोलापूर दि ६ : काही वर्षांनंतर पडलेल्या दमदार पावसाने जमिनीत तर पाणी मोठ्या प्रमाणात मुरलेच शिवाय मध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. मध्यम व लघू असे ३० प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत.सोलापूर जिल्ह्यात यंदा ४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली होती. साधारण १७ जूनपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यानंतर तब्बल दोन महिने पावसाने विश्रांती घेतली होती. दोन महिन्यानंतर सुरु झालेला पाऊस २८ आॅक्टोबरपर्यंत सुरू होता. यावर्षी पुणे जिल्ह्यात व उजनी धरणाच्या परिसरात चांगला पाऊस पडत राहिल्याने भीमा व सीना नदी तसेच कालव्याद्वारे तब्बल दोन महिने पाणी वाहत आहे. याशिवाय मध्यम व लघू तलाव भरल्याने त्याचे पाणी सांडव्यातून मागील काही महिन्यांपासून आजही वाहत आहे. यामुळे नदी कालवा व तलाव भरलेल्या परिसरात आजही पाणीच पाणी आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, कृष्णा खोरे महामंडळ, लघुपाटंबाधारे आदी विभागाने मोठ्या प्रमाणावर लहान-लहान साठवण तलाव केले आहेत. त्या तलावातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. त्याची कागदोपत्री नोंद मात्र दिसत नाही; मात्र उजनी धरण, मध्यम प्रकल्प तसेच लघुप्रकल्पातील पाणीसाठ्याची नोंद केली जाते. तीच आकडेवारी यावर्षी समाधानकारक आहे. कृष्णा खोरे विकास मंडळाच्या अखत्यारित जिल्हाभरात ५६ लघू प्रकल्प असून त्यापैकी २६ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा,  सांगोला, अक्कलकोट तालुक्यातील तलावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी हिंगणी, पिंपळगाव-ढाळे,बोरी हे पूर्ण क्षमतेने तर  आष्टी व मांगी तलावात ९५ टक्के पाणीसाठा आहे.जवळगाव प्रकल्पात ८१ टक्के तर हिप्परगा तलावात ४० टक्के पाणीसाठा झाला आहे.--------------------------उपसा सिंचनाचा आधार- शिरापूर उपसा सिंचन सुरू ठेवल्याने कालव्याला महिनाभर पाणी राहिले. हे पाणी जिरल्याने बीबीदारफळ, नान्नज, वडाळा व गावडीदारफळ परिसरात पाणी पातळी वाढली. याशिवाय बीबीदारफळ, वडाळा ,नान्नज व गावडीदारफळचे लहान-मोठे तलाव भरुन घेतले. यामुळे  या गावांचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे. ------------------------सांगोल्याचेही तलाव भरले- बीबीदारफळ (उत्तर सोलापूर), पोखरापूर(मोहोळ), शिरवळवाडी, बोरगाव(अक्कलकोट), पाथरी, कोरेगाव, गोरमाळे, कारी, वालवड, काटेगाव, तावडी, ममदापूर, वैराग, कळंबवाडी(बार्शी), पारेवाडी, हिंगणी(के), म्हसेवाडी, वीट, राजुरी, कुंभेज, सांगवी(करमाळा), अचकदाणी, चिंचोली, जुनोनी (सांगोला), पडवळकरवाडी(मंगळवेढा) आदी लघू तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.- होटगी, शिरवळवाडी, चिक्केहळ्ळी, भुरीकवठे, निमगाव, जवळा, तळसंगी,चिखलगी, डोंगरगाव  या तलावात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. - ५६ लघू प्रकल्पांची साठवण क्षमता ४.२४ टी.एम.सी. इतकी असून प्रत्यक्षात २.४१ टी. एम.सी. पाणीसाठा झाला आहे.- लघू प्रकल्पात पाणीसाठा ५६.९१ टक्के इतका झाला आहे.- सात मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ७.२३ टी.एम.सी. इतकी असून प्रत्यक्षात ५.६५ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.-  मध्यम सात तलावाची पाणी पातळी ७८.११ टक्के इतकी झाली आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव हा एकमेव तलाव कोरडा आहे.