शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सोलापुरात पाणी फाउंडेशनच्या कामाचं ‘तुफान आलंया..’

By admin | Updated: April 13, 2017 14:38 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरअरुण बारसकर - सोलापूरआमच्या गावाला विशेष अशी ओळखच नव्हती, आम्ही राळेरासचे़़़ असे सांगितल्यानंतर बार्शी तालुक्यातील का?, असे लोक विचारायचे, आता आमच्या गावाला आमीर खानने श्रमदान केलेले राळेरास, अशी नवी ओळख निर्माण झाल्याची भावना युवा वर्गाने व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर आमीर खानने हात जोडून गावकऱ्यांचे आभार मानले.पानी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या राळेरास येथे ग्रामसभेत आमीर खान यांनी संवाद साधताना गावकऱ्यांनी या भावना व्यक्त केल्या. सत्यमेव जयते पानी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील ३० गावांनी भाग घेतला असून, यापैकी राळेरास गावात सुरू असलेल्या श्रमदानात आमीर खान, त्यांच्या पत्नी किरण राव, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, डॉ. सत्यजित भटकळ, वेळू गावचे सुखदेव भोसले, उत्तरच्या उपसभापती रजनी भडकुंबे, संभाजी भडकुंबे, गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे आदींसह पाणी फाउंडेशन सदस्य व गावकरी उपस्थित होते. आमीर खान यांनी ग्रामस्थांना ४० लोकांच्या सततच्या श्रमदानातून अजिंक्यतारा भागाचे पाण्याचे चित्र बदलले, तुमच्या-आमच्या दोन हाताच्या श्रमदानातून पुढील पाच-सहा वर्षांत संपृूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त व पाणीदार होईल, हे राळेरास ग्रामस्थांच्या आत्मविश्वासातूनच दिसत असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते व पानी फाउंडेशनचे आमीर खान यांनी केले. ग्रामसभेचा समारोप करताना दंगल चित्रपटातील कल सुबह पाच बजे आना या डायलॉगची आठवण करुन देत गावकऱ्यांना सकाळी पाच वाजता श्रमदानासाठी येण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामसेविका माधुरी सुरवसे, फाउंडेशनच्या तृप्ती शिंदे, सचिन सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच नंदिनी माने, उपसरपंच सीताराम साबळे, कैलास नागवडे, शाहीर डांगे, सचिन सूर्यवंशी, विमल माने, संगीता डांगे, नागनाथ मानेंसह ग्रामस्थ, महिला व बालक उपस्थित होते.--------------------------- आमीर खान व किरण राव यांनी वृक्षारोपणासाठीचा खड्डा तसेच शोषखड्डे खोदणे व भरण्यासाठी श्रमदान केले.पाणी नक्की मिळेल : किरण राव- यावेळी आमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी आपल्या गावातून चांगली वागणूक व प्रेम मिळाले, एकत्र येऊन पाणलोटचे काम करताहेत हे चांगले आहे, तुम्हाला पाणी नक्की मिळेल, कपही जिंकाल, असा संवाद साधला.- हे काम खूप मोठे आहे, जे तुम्ही आज करीत आहात, गावाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही परंतु गरिबांच्या हाताचे काम संपूर्ण महाराष्ट्र पाहील व राज्याला प्रेरणा मिळेल, असे पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. - मी पानी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेतल्यानंतर झपाटल्यागत कामाला लागलो, मिलिटरीतला असल्याने गुडघ्यात मेंदू आहे असे लोक म्हणायचे,वेड्यात काढायचे, मात्र गावात काम झाल्यानंतर १० वर्षे सुरु असलेला टँकर बंद झाला, आज म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे, वेडेच लोक इतिहास घडवितात असे मागील वर्षी राज्यात प्रथम आलेल्या वेळू गावचे सुखदेव भोसले यांनी सांगितले.- तालुक्यातील प्रशिक्षण घेतलेल्या ३० गावांपैकी १२ गावांत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून उर्वरित गावांतही कामे सुरू होतील व वॉटर कप जिंकण्यापर्यंत काम करतील, असा विश्वास गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे यांनी व्यक्त केला.