शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सोलापूर एसएमटीकडे राहिल्या फक्त ३१ बसेस,प्रवाशांना मिळतेय अपुरी सेवा

By admin | Updated: May 6, 2017 18:10 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : एसएमटीला (मनपा परिवहन) केंद्रीय योजनेतून मिळालेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ८७ जनबस चेसी क्रॅक झाल्यामुळे धक्क्याला लागल्याने ताफ्यात फक्त ३१ बस राहिल्याने प्रवासी सेवा धोक्यात आली आहे. एसएमटीला केंद्रीय योजनेतून १४५ बस मिळाल्या होत्या. त्यात १00 जनबस आहेत. या बस मार्गावर धावताना चेसी क्रॅक झाल्या. आरटीओने तपासणी करून बसचे फिटनेस रद्द केले. त्यानंतर सुनावणी घेऊन या बसची नोंदणी रद्द केल्याने बस भंगारात निघाल्या आहेत. उर्वरित ११ बसच्या चेसी क्रॅक झाल्याबाबत एसएमटीने आरटीओला कळविले आहे. त्यामुळे या बस डेपोत थांबविण्यात आल्या आहेत. शनिवारी आरटीओच्या पथकामार्फत या बसची तपासणी करून अहवाल दिला जाणार आहे. यातील एक जनबस अद्याप रस्त्यावर धावत आहे. याही बसची तपासणी केली जाणार असल्याने बस डेपोत थांबवून ठेवण्याबाबत आरटीओने कळविले आहे. त्यामुळे आता प्रवासी सेवा देण्यासाठी एसएमटीकडे फक्त ३0 बस शिल्लक राहिल्या आहेत. यातून ग्रामीण व शहरी भागात वेळेवर सेवा देणे एसएमटीला अशक्य होणार आहे. यातील बसचा खोळंबा झाला तर मार्गावरील प्रवासी लटकले जाणार आहेत. सध्या सुट्टी व लग्नसराईचा काळ आहे. असे असताना एसएमटीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. केंद्रीय योजनेतून १४५ बसचा ताफा आल्यावर एसएमटीने ३00 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली. शहरी सेवा देत बस शिल्लक राहिल्याने तुळजापूर, अक्कलकोटला सेवा देण्यासाठी ६0 किलोमीटरची मर्यादा वाढवून द्या म्हणून शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली. या विषयावर मंत्रालयात बऱ्याच वेळा बैठका झाल्या. पण यात्रा काळात एसएमटीला सेवा पेलवता आली नसती, याशिवाय राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील सेवेला हरकत घेतल्यावर प्रकरण शांत झाले. आज एसएमटीकडे शहरातील नागरिकांना पुरेशी सेवा देण्याइतपत बस नाहीत. ७ व ८ मार्गावर प्रवासी असूनही सेवा देण्यास बस नाहीत. त्यामुळे या मार्गावर रिक्षा भरून वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातील अनेक ठिकाणांच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ना एसटी, ना सिटीबस अशी या गावातील नागरिकांची आता अवस्था झाली आहे.