शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापूर-इंद्रायणी रेल्वे बंद, पुण्यासाठी सोलापूर आगाराकडून एसटीच्या १६ जादा गाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:17 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देइंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे चार महिने बंद राहणारसोलापूर-पुणे मार्गावर सोलापुरातून जाणाºया प्रवाशांची संख्या अधिकसोलापूरसह अक्कलकोट, बार्शी आणि कुर्डूवाडी आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. सोलापुरातून  दुपारच्यावेळी सुटणारी इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे चार महिने बंद राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर-पुणे मार्गावर सोलापुरातून जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे. दररोज जाणाºया चाकरमान्यांचाही यात समावेश आहे. दुपारी सोलापूर येथून निघणाºया इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. ही सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यांना सुलभ सेवा मिळावी या दृष्टीने विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सोलापूरसह अक्कलकोट, बार्शी आणि कुर्डूवाडी आगाराच्या वतीने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. या नियोजनाप्रमाणे सोलापूरच्या बसस्थानकातून स्वारगेटपर्यंत सकाळी ११ वाजता, दुपारी १२.१५, १२.४५, १.४५ आणि २.४५ या वेळेत पाच जादा गाड्यांच्या फेºया वाढवण्यात आल्या आहेत. याच गाड्या स्वारगेटहून सकाळी ६.१५, ७.१५, ८.१५, सायंकाळी ६.३०, ७.३० या वेळेत सुटणार आहेत. सोलापूर आगाराच्या जाण्यायेण्याच्या मिळून दररोज १० फेºया अधिक वाढल्या आहेत.अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अक्कलकोट ते स्वारगेट पाच फेºया वाढवल्या आहेत. पहिली गाडी सकाळी १० वाजता सुटेल. त्यानंतर दुपारी १२, १२.४५, ३.१५ आणि ४.१५ असे वेळापत्रक ठरले आहे. स्वारगेटहून अक्कलकोटला येणारी पहिली गाडी तेथून पहाटे ५.१५ ला सुटेल. त्यानंतर सकाळी ७.१५, ८.१५, सायंकाळी ५.१५ आणि ७.१५ अशी सुटणार आहे. भगवंतनगरी बार्शी येथून स्वारगेटसाठी कुर्डूवाडीमार्गे जादा तीन फेºया वाढवण्यात आल्या आहेत. यात पहिली गाडी दुपारी ३.३० ला सुटणार आहे. दुसरी ४.१५ आणि सायंकाळी ५ वाजता सटेल. स्वारगेटहून सकाळी ८.१५, ९.१५ आणि १०.१५ वाजता या गाड्या बार्शीकडे येण्यासाठी सुटणार आहेत. कुर्डूवाडी बसस्थानकावरुन दुपारी ३.३० वाजता स्वारगेटकडे पहिली बस सुटणार आहे. त्यानंतर ४.१५ आणि सायंकाळी ५ वाजता तर स्वारगेटहून कुर्डूवाडीसाठी सकाळी ८.१५, ९.४५ आणि १०.४५ अशा परतीच्या गाड्यांचे वेळापत्रक ठरले असल्याचे विभाग नियंत्रक गायकवाड यांनी स्पष्ट केले. -----------------------दिवसभरात ३२ फेºयांचे नियोजन...आजपासून जिल्ह्यातील ४ आगारातून पुणे स्वारगेटसाठी १६ फेºयांचे नियोजन आखले आहे आणि स्वारगेटहून परतीच्या १६ फेºया अशा ३२ फेºया वाढवण्यात आल्या आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेसने पुण्याकडे जाणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यांना सुलभ सेवा मिळावी या दृष्टीने तो प्रवासी आकर्षित करण्यासाठी एस. टी. प्रशासनाने हे नियोजन आखले आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.