शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 11:53 IST

सोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी झालेली निवडणूक राजकीयदृष्ट्या चर्चेची ठरली. यात सात जागांसाठी आठ उमेदवार उभे होते. त्यातील सात जागांवर राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या चार जागा निवडून आल्या. तर तीन जागा सत्तापक्षाला मिळाल्या. सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंह शिंदे अखेरच्या फेरीतही ८२६ मतांचा कोटा गाठू शकले नाहीत. त्यामुळे यांचा अनपेक्षित पराभव झाला. नगरपालिका गटातही राष्टÑवादीनेच बाजी मारली. तीन उमेदवारांमधून मंगळवेढ्याचे नगरसेवक अजित जगताप यांनी ९८ मते मिळवून विजय संपादन केला. येथीलच शिवसेनेचे नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी यांना ९४ मते मिळाली. शिवसेनेसह असलेल्या महाआघाडीत असलेल्या १६० मतांवर नगरपरिषद प्रवर्गात मात केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले. सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी गटाचे चार उमेदवार रिंगणात होते. तीन विजयी झाले. रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला. तर वसंतराव देशमुख, अतुल पवार, भारत शिंदे यांचा विजयझाला. राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे चारही उमेदवार निवडून आले. शेकापचे सचिन जाधव यांनी १३ मतांचा पल्ला गाठला. उमेश पाटील पहिल्या फेरीत विजयी झाले. विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांची मते दुसºया फेरीत वाढली. तर शिवसेनेचे नीलकंठ देशमुख यांना सहाव्या फेरीपर्यंत लढत देऊन विजय मिळवावा लागला.---------------------एक झालो, आता एकत्र राहणार - साठे४या विजयावर प्रतिक्रिया देताना पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ असूनही केवळ चुकीच्या नियोजनामुळे आम्हाला सत्ता स्थापन करता आली नव्हती. मात्र यावेळी सर्वांना सोबत घेऊन योग्य नियोजन केले. सर्वांची मते विचारात घेतली, त्यामुळे हे यश मिळाले आहे. आता एकत्र आलो आहोत, पुढेही एकत्र राहून काम करू, असे ते म्हणाले. विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दीपक साळुंखे, रश्मी बागल, राजूबापू पाटील, लतिफभाई तांबोळी या सर्वांच्या सहकार्यातून हे यश मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला.-------------------नियोजनात आम्ही चुकलो - संजय शिंदे४या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाले, आम्ही नियोजनात चुकलो हे मान्य करावेच लागेल. नियोजनाच्या काळात आपण गावात नव्हतो, त्यामुळे त्यात भाग घेता आला नाही. १० चा कोटा केला होता. त्याचाही फटका बसला असावा. आम्हाला अतिविश्वास नडला. केवळ एक-दोन मतांमध्ये गोंधळ झाल्याने सर्व जागांवर विजय मिळविता आला नाही, हे त्यांनी मान्य केले. नगरपालिका स्तरावरही राष्टÑवादीच्या उमेदवाराचा विजय झाल्याच्या मुद्यावर ते म्हणाले, स्थानिक स्तरावर विषय वेगळे असतात. त्यामुळे तिकडे आम्ही मागे पडलो, असे म्हणता येणार नाही.-------------आघाडीची नऊ मते फुटली४राष्टÑवादी आणि मित्रपक्षांकडे २७ मते असताना त्यांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ३६ मते मिळाली. यावरून सत्ताधारी गटाची नऊ मते फुटली, असे सांगितले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सचिन देशमुख यांनीही या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना पहिल्या पसंतीची १३ मते मिळाली. आपणास १५ मते मिळणार होती. मात्र दोन मते सहकारी उमेदवारांना देण्यासाठी आपणच सांगितले, असे देशमुख म्हणाले.