शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 11:53 IST

सोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावायलाही विरोधक विसरलेले नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी झालेली निवडणूक राजकीयदृष्ट्या चर्चेची ठरली. यात सात जागांसाठी आठ उमेदवार उभे होते. त्यातील सात जागांवर राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या चार जागा निवडून आल्या. तर तीन जागा सत्तापक्षाला मिळाल्या. सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंह शिंदे अखेरच्या फेरीतही ८२६ मतांचा कोटा गाठू शकले नाहीत. त्यामुळे यांचा अनपेक्षित पराभव झाला. नगरपालिका गटातही राष्टÑवादीनेच बाजी मारली. तीन उमेदवारांमधून मंगळवेढ्याचे नगरसेवक अजित जगताप यांनी ९८ मते मिळवून विजय संपादन केला. येथीलच शिवसेनेचे नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी यांना ९४ मते मिळाली. शिवसेनेसह असलेल्या महाआघाडीत असलेल्या १६० मतांवर नगरपरिषद प्रवर्गात मात केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले. सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी गटाचे चार उमेदवार रिंगणात होते. तीन विजयी झाले. रणजितसिंह शिंदे यांचा पराभव झाला. तर वसंतराव देशमुख, अतुल पवार, भारत शिंदे यांचा विजयझाला. राष्टÑवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे चारही उमेदवार निवडून आले. शेकापचे सचिन जाधव यांनी १३ मतांचा पल्ला गाठला. उमेश पाटील पहिल्या फेरीत विजयी झाले. विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांची मते दुसºया फेरीत वाढली. तर शिवसेनेचे नीलकंठ देशमुख यांना सहाव्या फेरीपर्यंत लढत देऊन विजय मिळवावा लागला.---------------------एक झालो, आता एकत्र राहणार - साठे४या विजयावर प्रतिक्रिया देताना पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ असूनही केवळ चुकीच्या नियोजनामुळे आम्हाला सत्ता स्थापन करता आली नव्हती. मात्र यावेळी सर्वांना सोबत घेऊन योग्य नियोजन केले. सर्वांची मते विचारात घेतली, त्यामुळे हे यश मिळाले आहे. आता एकत्र आलो आहोत, पुढेही एकत्र राहून काम करू, असे ते म्हणाले. विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दीपक साळुंखे, रश्मी बागल, राजूबापू पाटील, लतिफभाई तांबोळी या सर्वांच्या सहकार्यातून हे यश मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला.-------------------नियोजनात आम्ही चुकलो - संजय शिंदे४या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाले, आम्ही नियोजनात चुकलो हे मान्य करावेच लागेल. नियोजनाच्या काळात आपण गावात नव्हतो, त्यामुळे त्यात भाग घेता आला नाही. १० चा कोटा केला होता. त्याचाही फटका बसला असावा. आम्हाला अतिविश्वास नडला. केवळ एक-दोन मतांमध्ये गोंधळ झाल्याने सर्व जागांवर विजय मिळविता आला नाही, हे त्यांनी मान्य केले. नगरपालिका स्तरावरही राष्टÑवादीच्या उमेदवाराचा विजय झाल्याच्या मुद्यावर ते म्हणाले, स्थानिक स्तरावर विषय वेगळे असतात. त्यामुळे तिकडे आम्ही मागे पडलो, असे म्हणता येणार नाही.-------------आघाडीची नऊ मते फुटली४राष्टÑवादी आणि मित्रपक्षांकडे २७ मते असताना त्यांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ३६ मते मिळाली. यावरून सत्ताधारी गटाची नऊ मते फुटली, असे सांगितले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सचिन देशमुख यांनीही या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना पहिल्या पसंतीची १३ मते मिळाली. आपणास १५ मते मिळणार होती. मात्र दोन मते सहकारी उमेदवारांना देण्यासाठी आपणच सांगितले, असे देशमुख म्हणाले.