शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सोलापूर बाजार समिती; १७ आॅक्टोबरपूर्वी निवडणूक घ्या, उच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: July 13, 2017 14:36 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : विविध याचिकांमुळे गेली वर्षभर चर्चेत राहिलेल्या सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रशासकाची मुदत संपण्याअगोदर (१७ आॅक्टोबर २०१७) पूर्वी घेण्यात यावी, नवीन कायद्यान्वये निवडणूक घेण्याची जबाबदारी राज्य सहकारी प्राधिकरणाची असेल असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व रियाज छागला यांनी बुधवारी दिला.उच्च न्यायालयात बार्शी व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मागील वर्षी १७ आॅगस्ट २०१६ रोजी सोलापूर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले होते. प्रशासक नियुक्ती, मतदार यादी व निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबतच्या वेगवेगळ्या १७ ते १८ याचिका दाखल झाल्या होत्या. पुणे विभागाचे सहनिबंधक, सहकार मंत्री व उच्च न्यायालयात शासन विरोधात संघर्ष सुरू होता. कधी निवडणूक लांबवा तर कधी निवडणूक घ्या अशा प्रकारच्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. सरकार वेळकाढू धोरण घेत निवडणूक लांबवीत आहे, त्यामुळे प्रशासकाची मुदत संपण्याअगोदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी अशी याचिका श्रीकांत शिंदे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मंगळवार दिनांक ११ व बुधवार दिनांक १२ जुलै रोजी सलग सुनावणी झाली. याचिकेवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. प्राधिकरणाच्या वतीने शेतकऱ्यांना सभासद करून घेऊन नवीन कायद्यान्वये निवडणूक घेण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने नवीन कायद्यान्वये पात्र शेतकऱ्यांना सभासद करून घेऊन प्रशासकाची मुदत संपण्याअगोदर निवडणूक घेण्याची जबाबदारी राज्य सहकारी प्राधिकरणावर सोपविली. निवडणूक घेण्यासाठीचे निकष व सोपस्कार पूर्ण करून वेळेत निवडणूक घेण्यात येईल असे प्राधिकरणाने न्यायालयात स्पष्ट केले. शासनाचे महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी नवीन कायद्यानुसार निवडणूक घेऊ असे सांगितले. ---------------------पावसाळी अधिवेशनात अध्यादेश- प्रशासकाची मुदत १७ आॅक्टोबर २०१७ संपते.- धोरणात्मक, आर्थिक निर्णय प्रशासकांनी घेऊ नयेत असे न्यायालयाने नमूद केले.- शेतकऱ्यांना मताचा अधिकार देणारा अध्यादेश काढला असला तरी तो मंजुरीसाठी पावसाळी अधिवेशनात सादर होणार आहे.----------------बाजार समितीच्या न्यायालयीन निर्णयाबाबत मला माहीत नाही. कामावर मी बोलत असतो. बारीक-सारीक बाबीकडे मी बघत नाही. काम हेच उत्तर असते. शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्याबाबत सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री-------------------शेतकऱ्यांना सभासद करून मतदानाचा अधिकार दिला तर आनंदच आहे परंतु प्रशासकास मुदतवाढ न देता वेळेत निवडणूक झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. एका उताऱ्यावर एकापेक्षा अधिक नावे असतील, ऊस उत्पादक शेतकरी मतदार असेल का?, या व अन्य त्रुटीचे काय?- दिलीप माने, माजी अध्यक्ष, बाजार समिती------------------