शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी सहा रेल्वे गाड्या

By admin | Updated: July 3, 2014 01:13 IST

रेल्वेची वारकरी सेवा : १३ जुलैपर्यंत विविध सुविधा

सोलापूर : आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्रासह परप्रांतातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १३ जुलैपर्यंत सहा गाड्या धावणार असून, यात्रा कालावधीत वारकऱ्यांना संरक्षण देण्याबरोबर त्यांना विविध सुविधा देणार असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी अमरावती-खामगाव-पंढरपूर, मिरज-उस्मानाबाद, दौंड-पंढरपूर आणि लातूर-पंढरपूर या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. अमरावती-पंढरपूर ही गाडी (क्रमांक- ०१२०१) ३ त ७ जुलै या कालावधीत अमरावती स्थानकावरून दुपारी २ वाजता सुटणार असून, तेथून ती बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, भिगवणमार्गे करमाळा तालुक्यातील जेऊर स्थानकावर सायंकाळी ६ वाजून ३८ मि. तर कुर्डूवाडीत तिचे रात्री साडेसात वाजता आगमन होणार आहे. पंढरपुरात ती रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी दाखल होणार आहे. ही गाडी पंढरपूर स्थानकावरून सायं. ४ वाजता सुटणार आहे. या गाडीमुळे विदर्भातील वारकऱ्यांची सोय होणार आहे. याशिवाय आषाढी यात्रेसाठी पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांसाठी जादा तिकीट खिडक्या उघडण्यात येणार असून, शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी जादा आरपीएफ जवानांची नियुक्ती केली असून, वरिष्ठ अधिकारी यात्रेतील गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत. पत्रकार परिषदेत एडीआरएम के. मधुसुदन, वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक नरपतसिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक आय. भास्करराव, जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार वालदे आदी उपस्थित होते. ----------------------------लातूर-पंढरपूर-लातूर विशेष पॅसेंजर गाडीलातूर-पंढरपूर-लातूर विशेष पॅसेंजर गाडी ३ ते १२ जुलैपर्यंत धावणार.लातूर स्थानकावरून तिचे दररोज सकाळी साडेसात वाजता प्रस्थान.औसा, ढोकी, कळंब, येडशीमार्गे उस्मानाबादेत सकाळी ९.२५ वा. आगमन.बार्शीत सकाळी १०.१२ वा., कुर्डूवाडीत १०.५५ वा. तर पंढरपुरात सकाळी ११.५० वा. आगमन.हीच गाडी पंढरपूरहून दुपारी २ वाजता सुटून लातूरला सायं. ७ वाजता पोहोचणार आहे. -------------------------------पंढरपूर-कुर्डूवाडी-पंढरपूर विशेष पॅसेंजर४४ ते १३ जुलैपर्यंत दररोज धावणार४पंढरपूर स्थानकावरून सकाळी १०.३५ वा. प्रस्थान. मोडनिंबला ११.०२ वा. तर कुर्डूवाडीला ११.२५ वा. आगमन. ४कुर्डूवाडीहून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी प्रस्थान. मोडनिंबला पावणेचारला आगमन, पंढरपूर स्थानकावर तिचे सायं. ४ वाजून २५ मिनिटांनी आगमन. ------------------------------------मिरज-उस्मानाबाद-मिरज गाडीमिरज-उस्मानाबाद :३ ते १२ जुलैपर्यंत धावणारमिरज स्थानकावरून सुटणार रात्री ७ वाजून ४० मिनिटांनीसांगोल्यात तिचे रात्री पावणेनऊ वाजता आगमनरात्री ११.२० वाजता पंढरपुरात दाखल. मोडनिंब, कुर्डूवाडी, बार्शीमार्गे उस्मानाबाद स्थानकावर रात्री १.०५ मिनिटांनी दाखल.उस्मानाबाद-मिरज :दुपारी ३.४० वाजता उस्मानाबादेतून प्रस्थान. पंढरपुरात सायं. ६.५० वा. आगमन, ७.१० वा. प्रस्थान.सांगोल्यात ७.३३ तर मिरजमध्ये रात्री ९.२० वाजता दाखल------------------------------------१३ जुलैपर्यंत दौंड-पंढरपूर-दौंडदौंडवरून सायं. ४.०५ वा. प्रस्थान. भिगवण, पारेवाडी, केममार्गे कुर्डूवाडीत सायं. ६.१० वाजता आगमन. मोडनिंबमध्ये ७.१२ वा. तर पंढरपूर स्थानकावर रात्री ८.३० वा. आगमन. हीच गाडी १६ ते २३ जुलैपर्यंत दररोज दौंड स्थानकावरून दुपारी १.३५ वा. सुटणार आहे. पंढरपुरात तिचे सायंकाळी पावणेसहा वाजता आगमन होणार आहे.