शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

घेरडीत १४ जणांमध्ये झालेल्या भांडणात सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

फिर्यादी सुरेश पडुळकर यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी व त्याचा भाऊ विलास पडळकर यांची आठ ...

फिर्यादी सुरेश पडुळकर यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी व त्याचा भाऊ विलास पडळकर यांची आठ तोळ्यांची सोन्याची चेन असे १२ तोळे सोने कोणीतरी हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत सुरेश दादासाहेब पडळकर (रा. पारे) व दादासो भगवान करे (रा. घेरडी, ता. सांगोला) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

पारे येथील सुरेश पडळकर हा आई रुक्मिणी व पत्नी मनीषा यांच्यासह कारमधून रक्षाबंधनासाठी बुरूंगलेवाडीकडे निघाला होता. दुपारी १.३०च्या सुमारास घेरडी-जवळा रोडवर दुचाकी उभी करून बापू करे व दादा करे हे बोलत थांबले होते. त्यावेळी सुरेश पडळकर यांनी कार थांबवून त्यांना बाजूला व्हा, असे म्हणाले असता त्यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर प्रकाश मोटे, नंदू बाळू पुकळे, अंकुश कुंडलिक मोटे, विलास माने, बिरा घुटुकडे, नाना खताळ यांनीही मारहाण केली. यावेळी सुरेशची आई व पत्नी भांडण सोडवत असताना त्यांनाही धक्काबुक्की केली. यावेळी पत्नी मनीषा हिने सुरेशचे भाऊ शरद व विलास यांना फोन करून बोलावून घेतले असता त्यांनाही काठीने मारहाण केली. या भांडणात सुरेश व विलास यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कोणीतरी काढून घेतले. यावेळी कारचे बॉनेट, आरशावर काठीने मारून नुकसान केले.

घेरडी येथील दादासो करे हा टमटमच्या टायरचे डिस्क बदलण्यासाठी थांबला होता. त्यावेळी एक स्विफ्ट गाडी थांबली. चालक सुरेश पडळकर याने गाडीचा हॉर्न वाजवत बापू करे यास तुझी दुचाकी बाजूला घे म्हणून शिवीगाळी करीत श्रीमुखात लगावल्या. तर दादासो करे यांनाही हाताने मारहाण केली. त्याच वेळी कारमधील मनीषा पडळकर व रुक्मिणी पडळकर या दोघींनी त्या दोघांना हाताने मारहाण केली. दरम्यान, दुपारी २ च्या सुमारास चुलत भावाचा मावस भाऊ बिराप्पा माने यांच्याशी बोलत थांबले होते. यावेळी बिराप्पा माने म्हणाला की, थोड्या वेळीपूर्वी भांडण झालेले हे लोक आपले पाहुणे आहेत. आपण आपापसात मिटवून घेऊ, असे म्हणत असताना पाठीमागून इनोव्हा गाडीतून आलेल्या शरद पडळकर, विलास पडळकर, अनिकेत गोरड यांनी नितीन रामचंद्र खताळ याच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. व इतर दोघे जण त्याला व त्याच्या भावास काठीने मारणार तेव्हा त्यांच्या काठ्या आम्ही धरल्या. त्यावेळी गावातील बिरुदेव पुकळे, सुभाष तळे, बापू काकेकर यांनी भांडणे सोडवासोडवी केली.