शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सिमला मिरची, टोमॅटोचे दर गडगडले; नागरिकांना मोफत वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:24 IST

सांगोला तालुक्यात डाळिंबावरील तेल्या, मर, कुजवा रोगाने मेटाकुटीला आलेला शेतकरी डाळिंबाला पर्याय म्हणून सिमला मिरची, टोमॅटो लागवडीकडे वळला. सिमला ...

सांगोला तालुक्यात डाळिंबावरील तेल्या, मर, कुजवा रोगाने मेटाकुटीला आलेला शेतकरी डाळिंबाला पर्याय म्हणून सिमला मिरची, टोमॅटो लागवडीकडे वळला. सिमला मिरचीचे उत्पादन लागवडीपासून तीन महिन्यांत पहिला तोड सुरू होता, तो पुढे दोन महिने उत्पादन चालू राहते. तालुक्यातील अजनाळे लिगाडेवाडी, सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, बुद्धेहाळ, वाकी-शिवणे, हलदहिवडी, शिरभावी, वासूद-अकोला, वाटंबरे, बलवडी, चिकमहूद, महूद, गायगव्हाण, नरळेवाडी, मानेगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सिमला मिरची, टोमॅटोची लागवड केली आहे.

गतवर्षी याच सिमला मिरचीला किलोला ६५ ते ७० रुपये जास्तीत जास्त तर कमीत कमी २५ रुपये भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलली असून सिमला मिरचीला किलोचा दर ३ ते ५ रुपयांपर्यंत खाली उतरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे झालेला खर्चही निघणेही मुश्कील झाले आहे. सिमला मिरची लागवडीपासून ते तोड येईपर्यंत झालेला खर्च व मार्केटपर्यंत पाठवण्याचा खर्च भागवताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सिमला मिरची काढून टाकण्याबरोबरच मार्केटला पोहोचवण्याऐवजी रस्त्याच्या कडेला टाकून देत आहेत. तर काही शेतकरी टोमॅटो व सिमला मिरची नागरिकांना मोफत वाटून समाधान मानत आहेत.

कोट :::::::::::::::

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्य शहराच्या ठिकाणी लाॅकडाऊनमुळे व खेड्या-पाड्यातील आठवडा बाजार बंद असल्याचा परिणाम सिमला मिरचीच्या दरावर झाला आहे. सांगोल्यात दररोज १० किलोप्रमाणे ५०० कॅरेट सिमला मिरचीची आवक आहे. मात्र ३ ते ५ रुपये दर खाली आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनलॉकनंतरच भाजीपाल्याचे दर सुधारणार आहेत.

- सुरेश माळी

अडत व्यापारी, सांगोला

फोटो ओळ :::::::::::::::::::

महूद-सांगोला रोडवरील बायपास पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस शेतकऱ्यांनी सिमला मिरची टाकून दिल्याचे छायाचित्र.