शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

उन्हाळ्यामुळे पाणी पातळी खालावली भंडीशेगाव परिसर;

By admin | Updated: May 12, 2014 01:08 IST

पिके जळण्याच्या मार्गावर

 

पंढरपूर : भंडीशेगाव (ता. पंढरपूर) परिसरातील वाढत्या उन्हाळ्यामुळे विंधन विहीर, बोअरची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. उन्हाळी हंगामात नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याचे हक्काचे पाणी काही शेतकर्‍यांना न मिळाल्याने भंडीशेगाव परिसरातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. भंडीशेगाव परिसरात गेल्या दोन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाणी पातळी वाढावी, पावसाचे पाणी त्या त्या परिसरात जिरावे यासाठी परिसरातील ओढे, नाले, बंधार्‍यातील गाळ काढण्याची मोहीम सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आली होती. त्यानंतर दुष्काळावर मात होईल, अशी आशा बाळगून असणार्‍या शेतकर्‍यांवर पुन्हा निराशाच आल्याचे चित्र आहे. उन्हाळी हंगामाचे नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याची पाणी पाळी झाली. मात्र दोन्ही विभागाकडून पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन न झाल्याने काही शेतकर्‍यांना पाणी मिळाले, तर काहींना मिळालेच नाही. या नियोजनाचा फटकाही लहानमोठ्या शेतकर्‍यांना बसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणी पातळीही दिवसेंदिवस खालावत आहे. विहीर, बोअर व अन्य पाणी स्त्रोत दिवसेंदिवस कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. दिवसेंदिवस खालावत असलेल्या पाणी पातळीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. यामुळे भंडीशेगाव परिसरात पिण्याच्या पाण्याचीही कृत्रिम टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

--------------------------

शेतकर्‍यांवर पुन्हा संकट ४मागील दोन वर्षांच्या भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. या परिसराला वरदान ठरलेले वीर-देवधर व उजनी धरण १०० टक्के भरले होते. याशिवाय परिसरातील बंधारे, विहिरीही तुडुंब होत्या. त्यामुळे यावर्षी दुष्काळ जाणवणार नाही, या आशेवर या परिसरातील शेतकरी होता. मात्र पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पुन्हा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा संकट ओढवल्याचे चित्र आहे.