शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

उन्हाळ्यामुळे पाणी पातळी खालावली भंडीशेगाव परिसर;

By admin | Updated: May 12, 2014 01:08 IST

पिके जळण्याच्या मार्गावर

 

पंढरपूर : भंडीशेगाव (ता. पंढरपूर) परिसरातील वाढत्या उन्हाळ्यामुळे विंधन विहीर, बोअरची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. उन्हाळी हंगामात नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याचे हक्काचे पाणी काही शेतकर्‍यांना न मिळाल्याने भंडीशेगाव परिसरातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. भंडीशेगाव परिसरात गेल्या दोन वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाणी पातळी वाढावी, पावसाचे पाणी त्या त्या परिसरात जिरावे यासाठी परिसरातील ओढे, नाले, बंधार्‍यातील गाळ काढण्याची मोहीम सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आली होती. त्यानंतर दुष्काळावर मात होईल, अशी आशा बाळगून असणार्‍या शेतकर्‍यांवर पुन्हा निराशाच आल्याचे चित्र आहे. उन्हाळी हंगामाचे नीरा उजवा कालवा व उजनी कालव्याची पाणी पाळी झाली. मात्र दोन्ही विभागाकडून पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन न झाल्याने काही शेतकर्‍यांना पाणी मिळाले, तर काहींना मिळालेच नाही. या नियोजनाचा फटकाही लहानमोठ्या शेतकर्‍यांना बसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणी पातळीही दिवसेंदिवस खालावत आहे. विहीर, बोअर व अन्य पाणी स्त्रोत दिवसेंदिवस कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. दिवसेंदिवस खालावत असलेल्या पाणी पातळीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. यामुळे भंडीशेगाव परिसरात पिण्याच्या पाण्याचीही कृत्रिम टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

--------------------------

शेतकर्‍यांवर पुन्हा संकट ४मागील दोन वर्षांच्या भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. या परिसराला वरदान ठरलेले वीर-देवधर व उजनी धरण १०० टक्के भरले होते. याशिवाय परिसरातील बंधारे, विहिरीही तुडुंब होत्या. त्यामुळे यावर्षी दुष्काळ जाणवणार नाही, या आशेवर या परिसरातील शेतकरी होता. मात्र पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने पुन्हा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा संकट ओढवल्याचे चित्र आहे.