शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

अक्कलकोट तालुक्यात खते अन्‌ बियाण्यांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST

अक्कलकोट हा अवर्षणग्रस्त दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. यंदा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे लॉकडाऊनमुळे अडचणीत असतानाही ...

अक्कलकोट हा अवर्षणग्रस्त दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. यंदा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे लॉकडाऊनमुळे अडचणीत असतानाही शेतकऱ्यांनी हातउसने पैसे घेत पेरणीसाठी जोमाने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र सध्या कोणत्याही कृषी दुकानात ना रासायनिक खते, ना बी-बियाणे, काहीच मिळत नसल्याने शेतकरी हतबल बनला आहे.

अक्कलकोट शहरासह, मैंदर्गी, दुधनी, चप्पळगाव, हन्नूर, शिरवळ, वागदरी, सलगर, जेऊर, करजगी, तडवळ, नागणसुर, सिंदखेड, अक्कलकोट स्टेशन, तोळणूर येथे तब्बल १०० कृषी दुकाने आहेत. यापैकी कोणाकडेही खते, बी-बियाणे मिळेनाशी झाली नसल्याने सुरेश सूर्यवंशी, मल्लिनाथ भासगी, महादेव बिराजदार, सत्तार शेख आदी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या खतांचा तुटवडा...

- खरीप पेरणीसाठी लागणारे उडीद, मूग, तूर, सोयाबीन, भुईमूग अशा महाबीज असो किंवा इतर, अशी विविध प्रकारची बी-बियाणे उपलब्ध नाहीत. सर्वत्र तुटवडा भासत आहे. तसेच युरिया, सुपर वगळता जय किसान असो किंवा इतर कंपनीचे डीएपी, १०:२६:२६, १२:३२:१६, २०:२०:१३, १८:१८:१०, १५:१५:१५ असे कोणत्याही कंपनीची खते मिळेनाशी झाली आहेत.

शेतकऱ्यांचा अडचणींशी सामना

मध्यंतरी १३०० वरून १९०० रुपयेपर्यंत मजल मारलेल्या जय किसानच्या १०:२६:२६ यासह सर्व खते मुबलक होती. तेव्हा शेतकरी बांधवांतून तीव्र विरोध व्यक्त होत असताना, दर कमी करण्यात आले असले तरी, खते न मिळता तुटवडा भासत आहे. शासन अनुदान दिल्याशिवाय खते, बियाणे कमी किमतीत देणे परवडत नसल्याचे कंपन्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

----

तालुक्यातील सर्व दुकानदारांनी मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे लाखो रुपये गुंतवून खते, बी-बियाण्यांची मागणी केली आहे. मात्र शासन व कंपनीच्या ध्येय-धोरणामुळे पुरेशा प्रमाणात खते, बियाणे मिळत नाहीत. मागणीच्या केवळ दहा टक्के आणि ठराविक कंपनीचीच खते मिळत आहेत. यामुळे सर्व शेतकऱ्यांना न्याय देणे कठीण होत आहे.

- आप्पासाहेब पाटील, अध्यक्ष, रासायनिक खते, बी-बियाणे असो., अक्कलकोट तालुका.

----

रासायनिक खतांच्या दराचे चढउतार झाल्यामुळे दुकानदारांनी मागणी केले नाही. वरूनच खताचे रॅक आले नाही. तसेच महाबीज बी बियाण्यांचे तुटवडा भासण्याची शक्यता आहे म्हणून मागच्या वर्षीच मी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे ठेवण्याचे व पेरण्याचे आवाहन केले होते. येत्या आठवडाभरात सर्व प्रकारचे टंचाई दूर होईल.

- सूर्यकांत वरखेडकर, तालुका कृषी अधिकारी