शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शिवाजी विद्यापीठात फेब्रुवारीमध्ये रंगणार ‘शिवोत्सव’

By admin | Updated: January 10, 2017 00:32 IST

आंतरविद्यापीठ युवा महोत्सव : देशभरातील सुमारे दीड हजार विद्यार्थी कलाकारांचा सहभाग

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात तरुणाईच्या विविध कलागुणांचे दर्शन घडविणारा ‘शिवोत्सव-२०१७’ हा युवा महोत्सव दि. १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. असोसिएशन आॅफ इंडियन युनिर्व्हसिटीज् (एआययु) आणि केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयाच्या सहकार्याने आठ वर्षांनंतर विद्यापीठामध्ये हा महोत्सव होणार आहे. त्यात देशभरातील १२५ विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकार सहभागी होणार आहे.विविध कलाप्रकारांद्वारे भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एआययू आणि केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव घेण्यात येतो. गेल्यावर्षी म्हैसूरमध्ये महोत्सव झाला होता. यंदाचा ३२वा महोत्सव शिवाजी विद्यापीठात होणार आहे. त्यात संगीत, गायन, फाईन आर्टस्, नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, लघुनाटिका, मूकनाट्य, एकांकिका, अशा विविध २५ कलाप्रकारांमध्ये महोत्सवात स्पर्धा होतील. देशातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती विभागातील महोत्सवातील विविध कलाप्रकारांमधील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या विद्यापीठांचे संघ ‘शिवोत्सव’मध्ये सहभागी होतील. आतापर्यंत चार विभागांचे महोत्सव पूर्ण झाले असून, सध्या पाचव्या विभागाचा महोत्सव गुजरातमध्ये सुरू आहे. ‘शिवोत्सव’मध्ये देशातील विविध विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकार सहभागी होतील. त्यांच्या कला-गुणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे कोल्हापूरकरांना दर्शन घडणार आहे. या महोत्सवातील विजेत्यांची निवड दक्षिण आशियाई आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी होणार आहे. (प्रतिनिधी)विविध २६ समित्यांद्वारे महोत्सवाची तयारी सुरूशिवाजी विद्यापीठाने केलेल्या मागणीनुसार ‘एआययू’ने यावर्षीच्या महोत्सवाचे यजमानपद विद्यापीठाला दिले असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी सोमवारी दिली. ते म्हणाले, यंदाच्या युवा महोत्सवाला विद्यापीठाने ‘शिवोत्सव’ असे नाव दिले आहे. आठ वर्षांनंतर विद्यापीठाला या महोत्सवाचे संयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्याची तयारी गेल्या महिन्यापासून सुरू आहे. यासाठी निवास-जेवण, परीक्षक नियुक्ती, आदी स्वरुपातील विविध २६ समित्यांची नियुक्ती केली आहे. महोत्सवासाठी विद्यापीठात व्यासपीठांची उभारणी, आवश्यक साहित्यांची खरेदी, निमंत्रण पत्रिकांची छपाई, आदी स्वरुपातील तयारी सुरू आहे.