शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

शिवसेनेचीही होणार ऊस परिषद ?

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करून दाखविण्यासाठी

गणपती कोळी - कुरुंदवाड -विधानसभा निवडणूक तिकीट वाटपावरून ‘स्वाभिमानी’त फूट पडून खंदे फलंदाज उल्हास पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेतले व त्यामध्ये यशस्वीही झाले. ऊस आंदोलन चळवळीतील भक्कम व अनुभवी नेतृत्व शिवसेनेला मिळाल्याने शिवसेनेमध्ये उल्हासमय वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करून दाखविण्यासाठी आम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीही ऊस परिषद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदापासून तालुक्यात दोन ऊस परिषद होण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जातो. ऊस उत्पादनाचा खर्च व साखर कारखान्याकडून मिळणारा दर यामध्ये तफावत राहत नसल्याने शेतकरी चळवळीतून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना उदयास आली. ऊस उत्पादनासाठी येणारा एकरी खर्च तसेच एका टनापासून साखर कारखान्यांना मिळणारे साखर व उपपदार्थ यांच्या हिशेबाचा ताळमेळ सांगून शेतकऱ्यांमध्ये चळवळीच्या माध्यमातून खा. शेट्टी यांनी जागृती केली अन् योग्यवेळी आंदोलन केले. बऱ्याचअंशी आंदोलनाला यश आल्याने शेतकऱ्यांचा स्वाभिमानीबरोबर विश्वास अधिक दृढ झाला. त्यातूनच खा. शेट्टी यांना शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येकवेळी निवडणुकीतही यश येत गेले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर खा. शेट्टी यांचा आदरयुक्त दबाव असल्याने ऊस परिषद झाल्याशिवाय कोणताही शेतकरी उसाला तोड घेत नाही. त्यामुळे या ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदार, प्रशासनाचे लक्ष लागून राहत असे. यंदा ऊस हंगाम प्रारंभीच विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, ‘स्वाभिमानी’च्या शिरोळ विधानसभेच्या तिकीट वाटपावरून खा. शेट्टी यांचे खंदे फलंदाज उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची त्यांनी उमेदवारी घेऊन यशही प्राप्त केले. या निवडणुकीत स्वाभिमानीत फूट पडल्याने तसेच खा. शेट्टी यांच्यावर जातीयवादाचा आरोप केल्याने खा. शेट्टी नाराज होते. तसेच निवडणुकीत पाटील यशस्वी झाल्याने स्वाभिमानीवरच आत्मचिंतन करण्याची वेळ आली.शेतकऱ्यांवरील पे्रम दाखविण्यासाठी प्रत्येक वर्षी शिवसेना स्वतंत्ररीत्या ऊस आंदोलन करीत असे. मात्र, यंदा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याने तसेच आ. पाटील यांच्या रूपाने ऊस आंदोलन चळवळीतील भक्कम व अनुभवी नेतृत्व मिळाल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आ. पाटील शिरोळ येथे शिवसेनेची ऊस परिषद घेण्याच्या तयारीत आहेत. असे झाले तर यंदापासून तालुक्यातून दोन ऊस परिषद गाजण्याची शक्यता आहे.