शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

शिंदेंचा निवडणूक संन्यास!

By admin | Updated: May 28, 2014 01:11 IST

स्वकीयांकडून दगा : समाजकारणात सक्रिय राहणार

सोलापूर: निवडणुकीत मला स्वकीयांनीच धोका दिला. सर्व ते प्रयत्न करूनही माझा पराभव झाला. माझे डिपॉझिट वाचले हे काय कमी नाही. यासाठी मी कोणाला जबाबदार धरणार नाही, मात्र यापुढच्या काळात निवडणुकीच्या राजकारणातून मी कायमची निवृत्ती घेत असल्याची घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिंदे हे प्रथमच सोलापुरात आले होते. सोमवारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर त्यांनी मंगळवारी आपली भूमिका विशद केली. माझ्याकडे गृहखाते असल्याने पराभव होणार याची मला पुसटशी कल्पना होती. यामुळेच मी सोलापुरात १२ दिवस तळ ठोकून राहिलो. निवडणुकीनंतर ती शंका खरी ठरली. स्वकियांनी दगा दिला. प्रचारात छोटे-छोटे मेळावे घेतले, यात सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच ३ लाख ६७ हजार मते मिळाली. माझे डिपॉझिट वाचले याचे मला समाधान आहे. फक्त वाढलेली मते मी मिळवू शकलो नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. निवडणुकीला उभे राहण्याची माझी इच्छा नव्हती, वारंवार तसे जाहीरपणे सांगितले होते. हायकमांडसमोर माझी भूमिका मांडली होती, हायकमांडने आदेश दिल्यानेच निवडणूक लढवावी लागली. पराभवामुळे सोलापूरच्या विकासापासून लक्ष काढून घेणार का? असा सवाल पत्रकारांनी करताच ते म्हणाले, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी सोलापूरची सेवा करीत राहीन. यापुढे निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेत असलो तरी समाजकारणातून सेवा करीत राहणार आहे. भाजपाचे नूतन खासदार शरद बनसोडे यांनी मदत मागितल्यास मी सहकार्य करण्यास तयार आहे. जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प रखडणार नाही, त्यासाठी मी स्वत: आग्रही राहणार आहे.

------------------------

कारणांचा शोध सुरू..

पराभवाला केवळ मोदी लाट हे एकमेव कारण नाही. त्यासाठी अनेक कारणे असू शकतात. आम्ही कुठे कमी पडलो, काय चुका घडल्या, तरुणांच्या संपर्कात कोणत्या त्रुटी राहिल्या, या सगळ्या कारणांचा शोध सुरू आहे. राज्यपातळीवरही अशी अनेक कारणे असू शकतात. त्यासाठीच सत्यशोधन समिती स्थापन करण्याची सूचना मी मुंबईच्या चिंतन बैठकीत मांडली आहे. सोलापुरातील कारणे वेगळी असू शकतात, त्याचा वेध घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत ती दुरुस्त करू. सोलापूरसाठी वेळ देणार.. सोलापूरच्या जनतेने मला खूप प्रेम दिले, निवडणुकीत हार झाली म्हणून सोलापूरकडे पाठ कधीच फिरविणार नाही. सोलापूरसाठी यापुढच्या काळातही वेळ देईल. त्याशिवाय इथल्या जनतेचे ऋण कसे फेडता येतील?

---------------------------

हात जोडून विनंती...

काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार असते. या विधानाचा दाखला देत शिंदे यांनी सोलापूरच्या काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची प्रांजळ कबुली दिली. ही गटबाजी संपविण्याची जबाबदारी एकट्याची नाही, सर्वांनीच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एकत्र काम करण्यात नेत्यांचे आणि पक्षाचे हित असते. मी स्वत: हात जोडून नम्रपणे विनंती करतो, बाबा..रे.. आतातरी गटबाजी करू नका., छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून काँग्रेस उभी राहिली आहे. आता नेत्यांनी ती संपविण्याचा प्रयत्न करणे गैर आहे.

-----------------------

काय म्हणाले शिंदे...

निवडणुकीत अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच होता... शपथविधीला सार्क देशाच्या प्रतिनिधींना बोलावण्याची कल्पना चांगली... घुसखोरी, नक्षलवाद, जातीय दंगली ही नवीन सरकारची आव्हाने... राज्यात नेतृत्व बदल नाही मिलिंद देवरा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही.. जय-पराजयाला खिलाडूपणे सामोरे जाणार्‍यांपैकी मी... मोदींची पावले चांगल्या दिशेने पडत आहेत. भ्रष्टाचाराची झळ गरिबांना बसते, तो संपला पाहिजे... चिंतन बैठकातून सत्यशोधन झाले पाहिजे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास पुन्हा चांगले दिवस...