शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

शिंदेंचा निवडणूक संन्यास!

By admin | Updated: May 28, 2014 01:11 IST

स्वकीयांकडून दगा : समाजकारणात सक्रिय राहणार

सोलापूर: निवडणुकीत मला स्वकीयांनीच धोका दिला. सर्व ते प्रयत्न करूनही माझा पराभव झाला. माझे डिपॉझिट वाचले हे काय कमी नाही. यासाठी मी कोणाला जबाबदार धरणार नाही, मात्र यापुढच्या काळात निवडणुकीच्या राजकारणातून मी कायमची निवृत्ती घेत असल्याची घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिंदे हे प्रथमच सोलापुरात आले होते. सोमवारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर त्यांनी मंगळवारी आपली भूमिका विशद केली. माझ्याकडे गृहखाते असल्याने पराभव होणार याची मला पुसटशी कल्पना होती. यामुळेच मी सोलापुरात १२ दिवस तळ ठोकून राहिलो. निवडणुकीनंतर ती शंका खरी ठरली. स्वकियांनी दगा दिला. प्रचारात छोटे-छोटे मेळावे घेतले, यात सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच ३ लाख ६७ हजार मते मिळाली. माझे डिपॉझिट वाचले याचे मला समाधान आहे. फक्त वाढलेली मते मी मिळवू शकलो नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. निवडणुकीला उभे राहण्याची माझी इच्छा नव्हती, वारंवार तसे जाहीरपणे सांगितले होते. हायकमांडसमोर माझी भूमिका मांडली होती, हायकमांडने आदेश दिल्यानेच निवडणूक लढवावी लागली. पराभवामुळे सोलापूरच्या विकासापासून लक्ष काढून घेणार का? असा सवाल पत्रकारांनी करताच ते म्हणाले, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी सोलापूरची सेवा करीत राहीन. यापुढे निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेत असलो तरी समाजकारणातून सेवा करीत राहणार आहे. भाजपाचे नूतन खासदार शरद बनसोडे यांनी मदत मागितल्यास मी सहकार्य करण्यास तयार आहे. जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प रखडणार नाही, त्यासाठी मी स्वत: आग्रही राहणार आहे.

------------------------

कारणांचा शोध सुरू..

पराभवाला केवळ मोदी लाट हे एकमेव कारण नाही. त्यासाठी अनेक कारणे असू शकतात. आम्ही कुठे कमी पडलो, काय चुका घडल्या, तरुणांच्या संपर्कात कोणत्या त्रुटी राहिल्या, या सगळ्या कारणांचा शोध सुरू आहे. राज्यपातळीवरही अशी अनेक कारणे असू शकतात. त्यासाठीच सत्यशोधन समिती स्थापन करण्याची सूचना मी मुंबईच्या चिंतन बैठकीत मांडली आहे. सोलापुरातील कारणे वेगळी असू शकतात, त्याचा वेध घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत ती दुरुस्त करू. सोलापूरसाठी वेळ देणार.. सोलापूरच्या जनतेने मला खूप प्रेम दिले, निवडणुकीत हार झाली म्हणून सोलापूरकडे पाठ कधीच फिरविणार नाही. सोलापूरसाठी यापुढच्या काळातही वेळ देईल. त्याशिवाय इथल्या जनतेचे ऋण कसे फेडता येतील?

---------------------------

हात जोडून विनंती...

काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार असते. या विधानाचा दाखला देत शिंदे यांनी सोलापूरच्या काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची प्रांजळ कबुली दिली. ही गटबाजी संपविण्याची जबाबदारी एकट्याची नाही, सर्वांनीच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एकत्र काम करण्यात नेत्यांचे आणि पक्षाचे हित असते. मी स्वत: हात जोडून नम्रपणे विनंती करतो, बाबा..रे.. आतातरी गटबाजी करू नका., छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांच्या कष्टातून काँग्रेस उभी राहिली आहे. आता नेत्यांनी ती संपविण्याचा प्रयत्न करणे गैर आहे.

-----------------------

काय म्हणाले शिंदे...

निवडणुकीत अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच होता... शपथविधीला सार्क देशाच्या प्रतिनिधींना बोलावण्याची कल्पना चांगली... घुसखोरी, नक्षलवाद, जातीय दंगली ही नवीन सरकारची आव्हाने... राज्यात नेतृत्व बदल नाही मिलिंद देवरा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही.. जय-पराजयाला खिलाडूपणे सामोरे जाणार्‍यांपैकी मी... मोदींची पावले चांगल्या दिशेने पडत आहेत. भ्रष्टाचाराची झळ गरिबांना बसते, तो संपला पाहिजे... चिंतन बैठकातून सत्यशोधन झाले पाहिजे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास पुन्हा चांगले दिवस...