शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटल्या !

By admin | Updated: July 21, 2014 01:26 IST

उद्धव ठाकरे : अजित पवारांवरही घणाघात

बार्शी : शरद पवारांनी बारामतीतील गायरान जमिनी लाटून त्यावर विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्याचे टीकास्त्र रविवारी येथील जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीकेची झोड उठविली. भगवंताच्या बार्शीतला भगवा राज्यात फडकवा, असे आवाहन त्यांनी केले.सत्तेत असताना शरद पवारांनी कधीही दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी आपले वजन वापरले नाही. पण मोदी सत्तेवर येताच राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पंतप्रधानांना सांगण्यासाठी भेटल्याचे सांगून आपले फोटो ते छापून आणत आहेत. सत्ता असताना महाराष्ट्राचे भले का केले नाही? असा सवाल करतानाच उद्धव यांनी दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांऐवजी पवारांना राज्यात २६ लवासासारखे प्रकल्प उभे करण्यात जास्त रस असल्याचा आरोप केला. गरिबांविषयी त्यांना कळवळा नाही. तर ‘हिल स्टेशन’ उभारण्यात त्यांना धन्यता वाटते, अशीही टीका त्यांनी केली.शिवसेना सोडून गेलेले तडफडत आहेत. त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. शिवसेनेमध्ये प्रेम आहे, असे सांगत सत्ताधाऱ्यांची पैशांची मस्ती वाढत आहे. त्यामुळे आपले सरकार येणारच आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला. -----------------स्वीट डिशची काळजीगेल्या १५ वर्षांपासून आघाडी सरकारने खाण्याचेच काम केले आहे. सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र त्याचा परिणाम किती झाला हे दिसत नाही. अजित पवारांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वीट डिशची चिंता जास्त आहे, असा टोला त्यांनी लगावला. नारायण राणे यांची सद्दी संपली असून त्यांना अस्तित्वासाठी सध्या लढावे लागत असल्याचे ते म्हणाले.